मंगळवार, २६ एप्रिल, २०११

रेवणीचे अवशेष आढळणारा ... कंधार

मराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे.त्याची तटबंदी शाबूत आहे.खंदक पाण्याने भरलेला आहे.खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे.तीस मीटर्स तरी असेल.खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते! काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी.राष्ट्रकुट,यादव,खलजी,तुघलक,बहमनी,बरीद्शाही,निजामशाही,मुघल,निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून  राज्य केले.
 कंधारच्या या स्थलदुर्गात जुने अवशेष इतस्ततः पडलेले आहेत.राणीमहाल,बुरुज,तटबंदी,तोफांचे गाडे,दगडी जिने,बारादरी,मशीद,मूर्तीचे अवशेष,बारुदखाना,शीशमहाल,हौद,कारंजी असे बरेच कंधारमध्ये बघण्यासारखे आहे.
 लालमहाल आणि जवळची विहीर हि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.मूर्तीचे जे अवशेष आहेत,त्यापैकी एका मूर्तीचा एक पायाचा पंजाच काय तो राहिला आहे.पण त्यावरून ती मूर्ती किती विशाल असेल याची कल्पना आपल्याला येते.ती मूर्ती अंदाजे २२ मीटर्स उंच असावी !
  कंधार दुर्गाची उभारणी,तोफा हिंदुस्तानात येण्याच्या आधीची अस्लुअने त्याच्या प्रवेश्द्वाराविषयी चर्चा करणे आवश्यक आहे.हा द्वारसमूह देखणा आणि बळकटहि आहे.लाकडी दरवाजा हा पूर्वी बाहेरून दिसत असल्याने ज्यावेळी शत्रुजवळ तोफा आल्या आणि दरवाज्यावर मारा होऊ लागला,त्यावेळी त्याचे रक्षण करण्याची गरज भासू लागली.त्या लाकडी दरवाजासमोर एक अतिशय भक्कम भिंत उभारण्यात आली.अशा बांधकामाला जीभी अथवा हस्तीनख असे म्हणतात.असे बांधकाम कंधारच्या दुर्गाला आहे.
 दुर्ग अभ्यासकांनी कंधार अवश्य पाहिलाच हवा.स्थलदुर्गाला आवश्यक अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण दुर्गबांधणीचे आवशेष पाहावेत.एक गोष्ठी इथेच आहे परंतु खूप शोध घेतल्यावर दिसते.खंदकाच्या भोवतीच वलय म्हणजे रेवणी.रेवणीचे अवशेष येथे आढळतात.ते पाहण गरजेचे आहे.इंग्रजीमध्ये त्याला 'कव्हर्ड वे' असे म्हणतात .

सोमवार, २५ एप्रिल, २०११

कूछ तो बात हें बॉस...

जगभरातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सत्यसाईबाबा यांचे काल निधन झाले. त्यावेळी त्यांची संपत्ती,त्यांचे अनुयायी  आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचीही चर्चा झाली.अशा बाबागिरीवर आम्हा मित्रांमध्ये यापूर्वीही खूपवेळा चर्चा वाद झाले आहेत. परंतु एका गोष्टीचे आश्चर्य राहून राहून वाटते ते म्हणजे बाबांचे अनुयायी सेलेब्रिटीज,खेळाडू,उद्योगपती,राजकारणी,गायक,संगीत क्षेत्रातले दिग्गज कोण कोण म्हणून सांगू सगळी बाप मानस.
 ज्या लोकांना भेटण्यासाठी लोक महिनोन महिने त्यांच्या ऑफिसचे उंबरे झिझवतात असे मंत्री,राजकारणी या बाबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून रांगेत उभे राहतात त्यांचे पाय धरतात. काय कमी असते या लोकांना पैसा,प्रसिद्धी,अधिकार सर्व काही मनासारखे असते तरीही यांना बाबांची गरज का भासत असावी ?
 बरे आपल्या देशातीलच सोडा बाहेरील देशातील लोकसुद्धा यांचे अनुयायी तेही एक दोन नाही हजारो लाखो तेही कित्येक देशामधले या गोष्टीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
 आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोदुगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो युटूबवरील त्याचे विडीओ शेअर करतो या गोष्टी या लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का? अशोक चव्हाण , सचिन तेंडूलकर,रतन टाटा यांना तरी कळायला हव ना, बर गेला बाजार अब्दुल कलाम यानाही हे समजत नसावे का ? कि या चमत्कारा व्यतिरिक्त दुसरी अशी काही गोष्ट असावी जी या लोकांना बाबांपर्यंत घेऊन जात असावी ? कारण हि सर्व लोक एवढी मूर्ख वाटत नाहीत. काय असावी ती गोष्ट... 'मानसिक समाधान' ?
 मी सत्य साई बाबांचा एक कार्यक्रम 'आस्था'वर पाहिला होता त्यात कितीतरी आलिशान आणि लाखो करोडो किंमत असलेल्या नवीन गाड्या घेऊन मोठ मोठे उद्यागपति उभे होते फक्त बाबांनी त्यांच्या गाडीत बसावे म्हणून बाबा यायचे आणि फक्त जास्तीत  जास्त आर्धा फुट गाडी चालली कि थांबवून उतरायचे कि लगेच पुढील गाडीत तिथेही सेम त्यानंतर सर्वजण येऊन त्यांच्या पायावर डोके टेकायचे ... अरे याला काय म्हणावे बाबा त्या माणसाची नाहीतर त्या गाडीची तरी किंमत ठेवा ना राव. त्यानंतर बाबा चालत चालत प्रसाद वाटत होते वाटत कसला फेकत होते आणि सर्व लोक तो मिळवण्यासाठी उड्या  मारत होते जणू सलमानने आपला शर्ट काढून फेकावा आणि मुलीनी तो मिळवण्यासाठी उड्या माराव्यात.
 अशा बाबांकडे आणि त्यांच्या अनुयायांकडे पाहिल्यावर मला त्या बाबांना दाद द्यावीशी वाटते त्यांच्यात असे काहीतरी वेगळे आहे, माणसे आपल्याकडे खेचण्याची ताकत आहे हे नक्की IAS ,IPS अधिकारीही उगीच आपली नोकरी सोडून यांची सेवा करत असतात का ? कूछ तो बात हें बॉस.
तसेही आपणही साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जातोच कि तेही बाबाच  आहेत त्यांनीही त्याकाळी चमत्कारच दाखवले  होते. स्वामी समर्थ हि बाबाच आणि गोंदवलेकरहि बाबाच ! आज आपल्या काळात सत्य साई होऊन गेले म्हणून नाहीतर आपणही शिर्डीला जातो तसे त्यांच्या समाधीच्या दर्शनाला गेलोच असतो कि किंवा काही वर्षानंतर आपली पुढची पिढी त्यांच्या समाधीच्या दर्शनाला जाणार नाही कशावरून ?
 बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहत आलो आहोत आणि पहार राहणार आहोत असेच दिसून  येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहुयात.

सोमवार, ११ एप्रिल, २०११

मास्टर माइंड... अरविंद केजरीवाल

जन लोकपाल विधेयकासाठी आण्णा हजारे यांनी जे आंदोलन जंतर मंतर येथे केले त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे पूर्ण देशात आण्णांचा गाजावाजा सुद्धा झाला परंतु हे सर्व होत असताना एक साध्या वेशातील उत्कृष्ट इंग्लिश आणि हिंदी बोलणारा कार्यकर्ता लक्ष वेधून घेत होता.त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे नाव अरविंद केजरीवाल आहे असे समजले तेच ते केजरीवाल ज्यांना २००६ साली सामाजिक कार्यासाठी मैग्सेस पुरस्कार मिळाला आहे.
 अरविंद केजरीवाल यांनी माहितीच्या अधिकारामध्ये खूप मोठे काम केले आहे आणि जन लोकपाल विधेयाकासाठीची व्युव्हरचना सुद्धा त्यांचीच होती त्यांनीच आण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या आंदोलनात भाग घ्यायला लावला व आंदोलन दिल्लीमध्ये घेऊन गेले.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला नाहीतर आण्णांनी महाराष्ट्रामध्ये असे आंदोलन करून पाहिजे असा परिणाम साध्य झाला नसता. केजरीवाल यांच्यामुळेच हे आंदोलन फेसबुक,ट्विटर तसेच सर्वत्र नेटवर पोहचले.सरकार बरोबरील वाटाघाटीतहि केजरीवाल सर्वात पुढे होते एवढेच काय पत्रकार परिषदमध्ये  सुद्धा ते आण्णांना मार्गदर्शन करताना दिसून येत होते.
 केजरीवाल यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यावर समजले कि त्यांनी १९८९ साली आईआईटी खडगपूर येथून मेकेनिकलची बीटेक डिग्री घेतली आहे आणि ते मुळचे हिसार हरियाना येथील आहेत.त्यानंतर ते १९९२ मध्ये सिव्हील सर्विसेस मध्ये गेले आणि दिल्लीचे सहायक आयकर आयुक्त झाले.त्यावेळी त्यांचा खरा संबंध सरकारी व्यवस्थेशी आला आणि तेथूनच त्यांचा संघर्ष सुरु झाला.आयकर विभागात चालू असलेल्या गैरकारभाराला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्याची बदली करण्यात आली आणि त्यामुळे त्यांचे मन सरकारी नोकरीवरून उठले व ते सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचाराची भरपूर प्रकरणे बाहेर काढली आणि त्याच वेळी त्यांनी लोकपाल विधेयक पास करून घेण्यासाठीचे प्रयत्न चालू केले परंतु सरकार घेऊन येत असलेले लोकपाल विधेयकात खूप त्रुटी आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी जन लोकपाल बिलाची मागणी लावून धरली आणि त्याचा मसुदा तयार केला आणि आण्णा आणि समविचारी कार्यकर्त्यांना घेऊन जंतर मंतरवर आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश मिळाले असून  लवकरच जन लोकपाल विधेयक पास होईल अशी आशा करूयात आणि त्यामुळे देशातील भ्रष्टाचार कमी होऊन भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा मिळावी हीच इच्छा.
 केजरीवाल यांच्या सारख्या लोकांमुळेच हे आंदोलन एवढे भव्य रूप घेऊ शकले आणि त्याला यश मिळू शकले साधी राहणी आणि उच्च विचार असणारया या सामाजिक कार्यकर्त्याला सलाम !

रविवार, ३ एप्रिल, २०११

याच क्षणाची तर वाट पाहत होतो ...

काल श्रीलंकेला हरवून आपण क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले. आपला त्याच्यावर हक्क होताच अजून किती दिवस वाट पहायची होती ? सचिन सारखा महान खेळाडू संघात असूनहि आपल्याला हे मागील ६ विश्वकप मालिकांमध्ये साध्य करता आले नव्हते.तसेच सचिनच्याही मनात याची सल होतीच. या मालिकेपूर्वी धोनी बोललाही होताच कि 'सचिनसाठी आम्हाला हा कप जिंकायचाच आहे' आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यावर युवी सुद्धा म्हणाला कि 'माझी सर्व कामगिरी हि सचीनसाठीच होती'.
 भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि तमाम क्रिकेटप्रेमीना सचिनच्या  कारकिर्दीत विश्वकप जिंकलेला पहायचा होता.तसे या लंकेमुळेच  हे स्वप्न १९९६ मध्ये भंगले होते आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली होती व ती जुनी देणी 'सुत'समेत वापस केलीही. अंतिम सामना जिंकल्यावरचा देशाचा आणि सचिनचा जल्लोष पाहता  'याच क्षणाची तर वाट पाहत होतो' हे तर त्यांना सांगायचे नाही न असे वाटून गेले.
  विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते आपल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. युवीला आणि भज्जीला त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता जणू 'यासाठीच केला होता सर्व अटहास' असेच त्याला भासवायचे  होते.
 १९८३ चा विश्वकप जिंकलेला मी पाहिलेले नाही परंतु विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते मी काल अनुभवले आहे त्या क्षणाचा  आनंद घेतला आहे आणि मी त्या इतिहासातील सोनेरी पान  होणारया    क्षणाचा भाग्यवंत साक्षीदार आहे :)
त्यामुळे  मला याचा अभिमान असेल - ' I was alive when India lifted the world cup २०११'.
(काही छायाचित्रे )