मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

भारतीय अभियांत्रिकीचे जनक

डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चीक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहल्ली या गावी १५ सप्टेंबर १७८६१ रोजी झाला. त्यांच्या वडलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकचम्मा होते.

डॉ.विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले.पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ मध्ये पदवी परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यानंतर ते मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर रुजू झाले.

१९८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'सक्कर' बंधाऱ्याची योजना केली.१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टीम शोधून काढली तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची रचना केली.
हैद्राबाद येथील 'मुसा' आणि 'ईसा' या नद्यांवर धरण बांधले.तसेच नदीच्या काठावर बाग बनवून पुरापासून शहराचे संवरक्षण केले.
म्हैसूरच्या राज्यांनी त्यांना संस्थांचे मुख्य अभियंता आणि नंतर दिवाण म्हणून नेमले होते.१९९२ साली डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली.

Bharatha Ratna Mokshagundam VishveshwaraiahImage via Wikipedia



डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान,दारिद्र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.
म्हैसूरमधील The Sandal oil Factory , The Metals Factory,The soap Factory,The crome tyning factory,Bhdravati Aryans and Steel Works हे सारे उद्योग त्यांच्या मेहनतीचे फलित आहेत.
त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटा यांनी टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.
बंगलोरमधील दि हिंदुस्तान एअरक्राफ्ट फेक्टरी आणि मुंबईची प्रीमियर हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे.

देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे,यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते.त्यांनी या विषयावर 'प्लांड इकोनोमी फॉर इंडिया' हे पुस्तक लिहिले आहे.
व्यापार आणि उद्योगधंदे वाढीसाठी त्यांनी 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना केली.

डॉ.विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी.लिट उपाधी मिळाल्या होत्या.
ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' उपाधीने गौरीवलेले तसेच १९५५ साली देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेन्द्रप्रसाद यांनी 'भारतरत्न' उपाधीने सन्मानित केले होते.तसेच त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशन हि करण्यात आले आहे.

देशात तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर हा 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो.



Reblog this post [with Zemanta]

रविवार, २७ सप्टेंबर, २००९

दसरा एक सुदिन

भारतीय प्रत्येक सणाला सामाजिक,सांस्कृतिक महत्व आहे त्याला दसरा हि अपवाद नाही.दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेल्या विजयाच स्मरण म्हणून दसरा साजरा केला जातो.
मराठ्यांनी दसर्याच्या मुहर्तावरच राज्याच्या सीमा ओलांडून देशाच्या विविध भागावर आपले निशाण फडकावले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने दसर्याचे विशेस महत्व आहे.

साडेतीन मुहर्तापैकी एक दसरा हा एक महत्वाचा मुहर्त आहे.नवरात्रीचे ९ दिवस देवीचा जागर केल्यानंतर विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. याच दिवशी मोठ्याप्रमाणात लोक आपल्या नवीन कामाचा शुभारंभ जादाकरून करतात.

प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी देवीची पूजा केली होती.रावणाचा वध के

Dasara Idol from Kundurumotte TempleImage via Wikipedia

ल्यावर त्याच्या आनंदप्रीत्यर्थ विजयादशमी वा दसरा साजरा केला जातो.त्यामुळेच हा सण दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेला विजय याचे प्रतिक आहे.
महिषासुर्मादिनीने महिषासुराचा वध केला याचे प्रतिक म्हणून हि हा सण साजरा केला जातो.

कोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.
'पवित्र सुदिन उत्तम दसरा' असा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे.

अशा या दसऱ्याच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छ्या.
या निमित्ताने समाजातील दृष्ट प्रवृतींवर चांगल्या वृतींचा विजय होवो हीच आई जगदंब चरणी प्रार्थना.

दसऱ्यानिम्मित पुन्हा सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा ...सोने घ्या सोन्यासारखे रहा.

Reblog this post [with Zemanta]

गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

तरुण पिढी देशाला नवसंजवनी देईल?

भारतीय संविधानाची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे १९५१ पूर्वी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी एकसंध भारत निर्माण करणे हेच एकमेव ध्येय होते. संविधानात 'फेडरेशन ऑफ स्टेट' असा शब्द नसून 'युनियन ऑफ स्टेट' असा शब्द वापरण्यात आला आहे.
अमेरिकेमध्ये त्या प्रांताचे आणि राष्ट्राचे असे दुहेरी नागरिकत्व मिळते.आपण असे दुहेरी नागरिकत्व मान्य केले नाही.
आपल्या देशात एखादी व्यक्ती कोठेही राहत असलीतरी ती त्या प्रांताची नह्वे तर देशाची नागरिक असते.
स्वातंत्र्यानंतर भारताने काही प्रमाणत प्रगती जरी केली असलीतरी चित्र फार आशादायी वाटत नाही

ज्यांनी स्वतातंत्र संग्रामात भाग घेतला त्यांनी स्वराज्याचे एक स्वप्न पहिले होते.

natureImage by Per Ola Wiberg (Powi) via Flickr


आपल्या स्वराज्यात वस्तू गरजवंताला मिळतील, जो विकत घेऊ शकतो फक्त त्यालाच मिळणार नाहीत असे त्यांना वाटत होते
पण आज रोग्याला औषधे मिळेलच याची खात्री नाही पण रोग नसला तरी ते पैसेवाल्याला विकत घेता येते.

समाज गरजांवर आधारित राहील असे वाटत होते लालसेवर नाही

विकास आणि आधुनिकतेमुळे गरजा वाढतील, पण त्या कितीही वाढल्या तरी त्याला अंत आहे मर्यादा आहे .भोग लालसेला तर मर्यादाच नाही ती अमर्याद आहे.

संस्कृती २ प्रकारची राहील असे वाटले होते.एक त्यागावर आधारित आणि दुसरी भोगावर आधारित.
पण चंगळवाद आणि भोग लालसा यांनी संस्कृतीच संपवून टाकली आहे

आता भारतीयत्व म्हणजे काय आणि भारतीय संस्कृती कशाला म्हणतात हे ठरवणे हि कठीण झाले आहे.अशा भारताचे स्वप्न स्वतान्त्रासैनिकांनी नक्कीच पहिले नव्हते.

त्यांना वाटले होते सत्ताधार्यांपेक्षा समाजसेवकाची प्रतिष्ठा अधिक राहील असे वाटत होते पण सत्ताकांक्षेने सगळे भ्रम फुटले आहेत
आसाम, काश्मीर,अरुणाचल तुटतो आहे त्याचे तुकडे पडत आहेत अखंडता नेस्तनाबूत होत आहे
खंडित मूर्तीची पूजा करता येत नाही हे हि आपण 'भारतमाता' म्हणताना विसरत आहोत

परंतु निराश होउन कसे चालेल बदल तर करावाच लागेल
या देशात आता फक्त युवाच बदल घडवू शकतात म्हणून या युवाशक्तीवरच आता विश्वास उरला आहे

२ पिढ्यामधील अंतर म्हणजे काय हे सांगताना युनेस्कोच्या संचालकांनी म्हंटले होते ,'आजच्या प्रस्थापित जेष्ठ मंडीळीची अन्याय आणि भ्रष्टतेशी समझोते करून जगण्याची आणि ते सहन करण्याची क्षमता एकीकडे तर नवीन पिढी जी अन्याय आणि भ्रष्टाचार सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवू इच्छिते त्यांची अन्याय आणि भ्रष्टाचार सहन न करण्याची क्षमता दुसरीकडे या २ क्षम्तांमधील अंतर म्हणजे पिढ्यांमधील अंतर '

नवीन पिढी देशाला नव संजवनी देयील असे मला वाटते .


Reblog this post [with Zemanta]

सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

पर्जन्यरोपण एक खरी गरज

नैऋत्य आणि ईशान्य मौसमी वारे दरवर्षी ११ हजार अब्ज घनमीटर आद्रता निर्माण करतात त्यापैकी २४०० अब्ज घनमीटरचे पावसात रुपांतर होते.
म्हणजे फक्त २२ % ढगांचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो बाकी ७८ % ढग हे पाऊस न पाडता नसता गडगडात करून निघून जातात.
आद्रतायुक्त ढग आपल्या डोक्यावर आले कि कुशलतेने आणि योग्य उपकरणांचा वापर करून जगातील ४५ पेक्षा जास्त देश आपल्या भूमीवर पाऊस पाडून घेतात आणि दुष्काळाच्या संकटापासून आपले सवरक्षण आज करतात
या देशामध्ये अमेरिका ,रशिया ,चीन ,इंडोनेशिया ,जपान ,इस्राएल ,मेक्सिको , अरब राष्ट्रे आणि दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा समावेश आहे.

Flying Lengends 09Image by lee_kmp via Flickr



आज एकट्या महाराष्ट्र राज्यातील शेती उत्त्पन ४० हजार कोटी आहे मग सर्व देशाचे किती अब्ज्य कोटी असू शकते याचा अंदाज न बांधलेलाच बरा
तरीही आपले सरकार दुष्काळ निर्वानासाठी काय करत आहे असा प्रश्न पडतो
दुष्काळजन्य परिस्थिती आल्यानंतर फक्त धावाधाव केली जाते
दुष्काळ निवारण समितीची स्थापना , सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठका ,पाणीटंचाई साठीच्या मार्गदर्शक सूचना यांचे पेव फुटले जाते.
परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा दुष्काळ हिसकावून घेतो त्याचे काय ?
यावर उपाय योजायला नकोत का ?

ऑस्ट्रीलीअन कौन्सिल ऑफ सायनटीफिक अन् इंडस्त्रियल रिसर्च ऑर्गनायजेशन यांनी नुकतेच जाहीर केले आहे कि त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ते १५ ते २० % पाणी दरवर्षी जास्त मिळवतात तसेच चीन ने केलेल्या उपाययोजनामुळे त्यांना ५० अब्ज्य घनमीटर पाणी मागील वर्षी अधिक मिळाले असून यातून ३६ हजार वैज्ञानिकांना काम हि मिळाले आहे.

दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी आंध्रप्रदेश मधील १५ जिल्ह्यांची निवड करून तेथे दरवर्षी सतत पाऊस पाडण्याचा निर्णय आणि कार्यक्रम हाती घेतला होता त्यावेळी ते म्हणाले होते कि ‘ पर्जन्याच्या अभावामुळे पडणारा दुष्काळ आम्हाला इतिहास जमा करायचा असून आम्ही आंध्रप्रदेश मध्ये मागील वर्षी १० जिल्ह्यात १८ दक्षलक्ष्य घनफूट पाणी विविध उपाययोजना करून अधिक मिळवले आहे.
तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी चीकीस्तकपणे पर्जन्यारोपानाची तयारी करावी आणि राज्याचा विकास करावा ’
हे असेच संपूर्ण हिंदुस्तानमध्ये का होऊ शकत नाही ?

चीनमध्ये दरवर्षी गारांच्या पाऊसामुळे खूप नुकसान होते परंतु चीनने आता गारांचे रुपांतर पाऊसात करण्याचे तंत्र विकसित केल आहे.
मागील वर्षी आपण चीन मधील ऑलिम्पिकच्या वेळीही चीनचे या क्षेत्रातील तंत्रज्ञान पाहिले होते आठवते का ?
ऑलिम्पिकवर पाणी पडू नये म्हणून बीजिंगकडे येणारे पाऊसाचे ढग अलीकडेच पाऊस पाडून निकामी करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले होते.

आपल्या देशातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ तसेच विकसित देह्साची मदत घेऊन आपण देशाची व राज्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन ढगांची DBZ क्षमता लक्षात घेऊन देशात भरपूर पाऊस पाडू शकतो (पाऊस पाडण्यासाठी ढगांची बाष्प कणांची DBZ क्षमता ४० असावी लागते )

जर ढगांतून नैसर्गिक पाऊस पडत नासेलतर त्यावर रासायनिक फवारणी करून पाऊस पाडता येऊ शकतो अशा ढगांची योग्य निवड अत्याधुनिक उपकरणांमुळे आता शक्य आहे फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे.

भूजल पातळी दरवर्षी १ ते ३ फुट खाली जात आहे हे कटू सत्य आहे
नद्या , नाले कोरड्या पडण्याची शक्यता, दुष्काळाचे सावट सतत देशावर असते अशावेळी सत्त्याधार्यांनी योग्यानियोजन करून पर्जन्यारोपानाचे महत्व जाणून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते.






Reblog this post [with Zemanta]

मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

5 star लोकप्रतिनिधी

आज भारतामधील सामान्य जनता गरिबी महागाई दुष्काळ यांनी होरपळत असताना
याच देशातील गांधीजींच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील मंत्री जनतेच्याच पैशावर मजा मारत आहेत.
यावरून असे दिसून येते कि गांधींचे विचार फक्त सांगायला आहेत आचरणात आणायला नाहीत असे त्यांचे मत आहे.

‘संधी मिळाली तर महात्मा गांधी यांच्याबरोबर भोजन घ्यायला आवडले असते ’ असे वक्तव्य अमेरिकाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच केले
त्याचवेळी गांधीजींच्या देशात त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षातील मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये ४० हजार रुपये प्रतिदिन भाडे मोजून जनतेच्या पैश्यावर ऐश करतानाचे

Five Star Hotel in San SalvadorImage via Wikipedia

वृत्त आले
या नेत्यांना लाज कशी वाटत नाही ?
अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षाला गांधींच्या साधेपणाचे विचार पटत असताना त्यांच्याच देशात मात्र त्यांच्या विचारणा हरताळ फासण्याचे काम सध्या चालू आहे आणि यात लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत
परराष्ट्रमंत्री एस म कृष्णा आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांनी जनतेच्या पैस्यावर झोडलेल्या शाहीपाहुणचाराची सध्या चर्चा जोरात आहे.
त्यांची कानउघाडणी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केल्यानंतर त्यांनी हॉटेल सोडण्याची तयारी दाखवली.
या सर्वांनी आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख रुपये एवढ्या जनतेच्या पैस्याचा चुराडा ऐषारामासाठी केला आहे
यांनी हॉटेल सोडली असली तरी अजूनही काही खासदार जनतेच्या पैस्यावर हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत
अजूनहि जुन्या खासदारांनी आपली निवस्थाने मोकळी केली नसल्याने तसेच सोडलेल्या निवस्थानांची डागडुजी करायची आहे हि करणे देवून काही खासदार सध्या हॉटेल मुक्कामी आहेत.

आज देशातील सामान्य जनता वेगवेगळ्या प्रश्नाशी झगडत असताना त्यांना २ वेळचे नीट खायला मिळत नसताना त्यांच्या लोकप्रतिनिधींची राहणी कशी असावी असा प्रश्न यावेळी पडतो.
आपल्या देशाच्या संस्कृतीत साधी राहणी आणि उच्च विचार याला महत्व आहे पण आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये नेमके याच्या उलटे आहे त्यांचे म्हणजे उच्च राहणी आणि दिवाळखोर विचार असे आहे.

गांधीजी स्वता आयुष्यभर लज्जारक्षणा एवढे वस्त्र वापरात त्यांनी सर्व सुखसुविधांचा त्याग केला होता ते म्हणत कि देशातील सामान्य जनतेला अंगभर वस्त्र मिळत नसेल तर मला अंगभर वस्त्र घालण्याचा अधिकार नाही.
आजच्या लोकप्रतिनिधींकडून एवढी अपेक्षा नाही आणि फक्त वस्त्रांचे अनुकरण केले म्हणून विचारांचे अनुकरण होते असे काही नाही.
आज देशातील सामान्य जनता विविध समस्याने ग्रस्त असताना जनतेच्या मुलभूत गरजाहि पूर्ण होत नसताना जनतेच्या पैस्यावर आपण असा शाहीपाहुणचार झोडला पाहिजे का? याचा विचार या पुढार्यानी करायला हवा होता
आता काहीजण आम्ही स्वताच्या पैस्यावर हॉटेलमध्ये राहिलो होतो असे सांगण्याचा प्रयन्त करत आहेत पण लोकप्रतिनिधींचे राहणीमान कसे असावे याचे काही संकेत आहेत कि नाहीत कि यांनी सर्व संकेत धाब्यावर बसवले आहेत आता ?
दहशतवादी हल्ला झालेला असतानाहि कपडे बदलण्यात धन्यता मानणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पाटील यांच्या सारखीच सर्व लोकप्रतिनिधींची मानसिकता झाली आहे ?

कामाचा भाग म्हणून सोयीसुविधांचा गरजेपुरता वापर करण्यास कोणाचाच विरोध असणार नाही परंतु सरकारी खर्चाने मिळणाऱ्या सुविधांचा वाट्टेल तसा वापर करणे कितपत योग्य आहे ?

महात्मा गांधी तसेच माजी पंत्रप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी साधेपणालाच महत्व दिले होते याचा आदर्श आपले आजचे लोकप्रतिनिधी कधी घेणार ?

प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या साधेपणाच्या आवाहनाला स्वताला शेतकऱ्यांचे कैवारी आणि सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी हि विरोध करावा हि आश्चर्याची गोष्ट आहे.

आजचे लोकप्रतिनिधी सुखसोयीना महत्व देताना दिसतात तसेच ते सुरक्षा व्यवस्थेला हि प्रतिष्ठा म्हणून समजतात अशाच गोष्टींचा ताण आज पोलीस दलावर येताना दिसत आहे आणि जेथे गरज आहे तेथे सुरक्षा देण्यास ते कमी पडत आहेत.

आज लोकप्रतिनिधी हे आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत हे विसरून गेले असून स्वताला ते राजे एखादे संस्थानिक समजू लागले आहेत अशा लोकांना वेळीच धडा शिकवायला हवा.

आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यावर यांनी 5 star हॉटेलचा त्याग केला असला तरी यापुढे जनतेच्या पैस्यांवर हे लोक कशावरून मजा मारणार नाहीत ???????????

जय हिंद
जय महाराष्ट्र


Reblog this post [with Zemanta]

रविवार, १३ सप्टेंबर, २००९

गुरुजनांचे ऋण!




डॉ. अनिल काकोडकर -अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
जडणघडणीच्या वयात मुलांवर सर्वाधिक प्रभाव असतो तो त्यांच्या घरच्यांचा- आई-वडील, आजी-आजोबा यांचा आणि अर्थातच शिक्षकांचा. शिक्षक म्हणजे घर आणि समाज यातील दुवा. व्यक्तीच्या मूल्यांची आणि विचारांची बैठक तयार होण्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो.
माध्यमिक शाळेत असताना मला गणिताला एक शिक्षक होते. त्यांचं नावच मुळी बुद्धिवंत. हे बुद्धिवंत सर खुर्चीत बसून गप्पा मारीत गणित शिकवायचे. संवाद साधत साधत गणिताचा तर्क समजावायचे. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ते गणित कधी सोडवून व्हायचं, ते समजायचंदेखील नाही. अंकगणित सोडविताना बीजगणिताची पद्धत वापरणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. ते साध्या, सोप्या रीतीने अंकगणित शिकवत. त्यांनी मला गणिताची गोडी लावली. बुद्धि
Dr Anil Kakodkar Image via Wikipedia
वंत सर गणिताच्या शिकवण्याही घेत. मॅट्रिकच्या वर्षांत असताना मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं, की मीही शिकवणीला येऊ का? सर मला म्हणाले, ‘‘अरे, तुला कोणी सांगितलं शिकवणीला यायला. ज्यांना पास होण्याची शाश्वती नाही, अशांचीच शिकवणी मी घेतो. तुझ्यासारख्या मुलाने शिकवणीला यायची मुळीच गरज नाही. काही अडलं तर जरूर विचारायला ये; पण शिकवणी लावू नकोस.’’ अशा निस्वार्थी बुद्धिवंत सरांची मला नेहमी आठवण येते.
माझ्या जडणघडणीत रुपारेलचे तेव्हाचे उपप्राचार्य भिडे सर यांचं मोठं योगदान आहे. मध्य प्रदेशात खरगोणला शिकलेला मी, मॅट्रिकनंतर मुंबईला आलो. मुंबईच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश हवा होता. मुंबईतला मॅट्रिकचा निकाल लागला; पण आमच्या मध्य प्रदेश बोर्डाचा निकाल काही लागला नव्हता. मग मला प्रवेश मिळण्याची मोठी पंचाईत झाली. एका स्नेह्यांच्या ओळखीतून मी रुपारेल कॉलेजच्या भिडे सरांना भेटायला गेलो. त्यांनी माझी पंचाईत समजून घेतली. त्यांनी विचारलं, ‘तुला किती मार्क मिळतील? फर्स्ट क्लास मिळेल ना?’ मी ‘हो’ म्हणालो. माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी मला प्रवेश दिला. फार गवगवा होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बसवून फॉर्म भरून घेतला आणि मी विज्ञान शाखेत दाखल होऊ शकलो. पुढे इंटरला चांगले मार्क मिळाल्यानंतर मी पेढे घेऊन भिडे सरांकडे गेलो. त्यांनी विचारलं, ‘पुढे काय करणारेस?’ मी म्हटलं, ‘बी. एस्सी. करीन- फिजिक्समध्ये’ ते म्हणाले, ‘अरे, तुला चांगले मार्क आहेत. इंजिनीअरिंगला जा.’ तेव्हा इंजिनीअरिंगचे फॉर्मही सायन्स कॉलेजमध्ये मिळत असत. त्यांनी मला तो फॉर्म दिला आणि आग्रहाने भरायला लावला. मी तेवढासा राजी नव्हतो. भिडे सर म्हणाले, ‘इंजिनीअरिंगला जाऊन तर बघ. तुला तिथे अ‍ॅडमिशन नक्की मिळेल’ आणि नाही जमलं तर ये इथे परत. हे कॉलेज तुझंच आहे आणि बी. एस्सी. करायचंच असेल तर फिजिक्समध्ये नाही, मॅथ्समध्ये कर. फिजिक्सला प्रॅक्टिकलचे मार्क असतात. ते किती मिळतील, परीक्षकांवर अवलंबून असतं. गणितात आपण खात्रीने मार्क मिळवू शकतो. बी. एस्सी.ला पहिली श्रेणी मिळाली तरच चांगलं करिअर घडवू शकशील; पण ते नंतरचं. आधी तू इंजिनीअरिंगला जा तर! मी व्ही. जे. टी. आय.ला गेलो ते केवळ भिडे सरांच्या आग्रहामुळे. त्यांचे ऋण मी कसे फेडू?
(हे भिडे सर जर काकोडकरांना भेटले नसते आणि त्यांनी योग्यवेळी योग्य मार्गदर्शन केले नसते तर भारत एका मोठय़ा अणुतज्ज्ञाला मुकला असता!)
हा लेख आजच लोकसत्ता मध्ये वाचनात आला.
Enhanced by Zemanta

शनिवार, १२ सप्टेंबर, २००९

धर्मनिरपेक्षता आणि धर्मांधता

गुरुचरण दास यांचा हा सुरेख लेख आज सकाळमध्ये वाचनात आला म्हणटले सर्व वाचकांना उपलब्ध करून द्यावा.

एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात माझा जन्म झाला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मी आधुनिक शिक्षण घेतले. हिंदूंमधील सुधारणावादी अशा आर्य समाजाशी माझ्या कुटुंबीयांचा- विशेषतः माझ्या दोन्ही आजोबांचा संबंध होता. माझ्या वडलांनी मात्र वेगळा मार्ग निवडला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांना एक गुरू भेटले. या गुरूंनी त्यांना प्रेरणा दिली आणि उपासनेचा वसा दिला. या गुरूंचे नाव होते राधास्वामी. ते रसाळ प्रवचन करायचे आणि कबीर, नानक, मीराबाई, बुलेश शहा आणि भक्ती व सूफी परंपरेतील अनेक संतांची वचने ते सांगायचे. माझी आजी दर सोमवारी आणि बुधवारी शीख समाजाच्या गुरुद्वारात जायची; मंगळवारी आणि गुरुवारी मंदिरांत जायची, तर शनिवारी-रविवारी ती मुस्लिम पीरांकडे जायची. शिवाय अधूनमधून ती आर्य समाजाच्या कार्यक्रमांना; तसेच बारशांपासून मर्तिकेपर्यंतच्या सर्व घटनांना उपस्थित राहायची. तिच्या खोलीमध्ये अनेक देवतांच्या- विशेषतः राम आणि कृष्ण यांच्या प्रतिमा असायच्या. ""जगात अनेक देवता आहेत; परंतु देव मात्र एकच आहे,'' असे ती म्हणत असे. माझे आजोबा आजीची थट्टा करायचे, तर काका म्हणायचे, की कोणता तरी देव तिचे ऐकत असेल!
अशा या सर्वसमावेशक आणि संमिश्र वातावरणात मी वाढलो. त्यामुळे एक प्रकारचा उदार दृष्टिकोन विकसित झाला. मात्र आता स्वतःला एक उदारमतवादी हिंदू असे म्हणवून घेताना मला काहीसे अस्वस्थ वाटते. असे का व्हावे? मला वाटते, की हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्षतावादी (सेक्‍युलरिस्ट) या दोघांच्या मध्ये माझी कुचंबणा होत आहे. काहीतरी नक्कीच चुकत आहे. हिंदू राष्ट्रवादी हिंदुत्वाला राजकीय चौकट देत आहेत, तर धर्मनिरपेक्षतावादी कोणत्याही श्रद्धेकडे तुच्छतेने पाहत आहेत. माझ्या हिंदू पार्श्‍वभूमीला मी बिलगून असणे धर्मनिरपेक्षतावाद्यांना म्हणूनच अयोग्य वाटते. दुसरीकडे या देशातला मोठा तरुणवर्ग आपल्या प्राचीन वारशाबद्दल एक तर अनभिज्ञ आहे किंवा त्याबद्दल तो काही बोलू इच्छित नाही.
थट्टेचा विषय?
काही वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीला म्हटले, की मला महाभारत पूर्णपणे वाचायचे आहे; समजून घ्यायचे आहे. पाश्‍चिमात्य पुराणकथा मी वाचल्या आहेत; परंतु भारतीय पुराणकथा वाचले नसल्याचे मी तिला सांगितले. तिने माझ्याकडे संशयाने पाहिले. आयुष्याच्या मधल्या टप्प्यावरच्या कोड्यात मी अडकलो असेन, असे तिला वाटले. मग ती माझी थट्टा करू लागली. नंतर बराच काळ विविध समारंभांत, पार्ट्यांत माझ्याबद्दल बोलताना थट्टेचा सूर निघू लागला. लोक म्हणायचे, ""मग काय, तुम्हाला म्हणे पुराणकथा वाचायच्या आहेत?'' बाजारात नवीन पुस्तके नाहीत काय, असा प्रश्‍नही काहींनी विचारला. एका माजी सनदी अधिकाऱ्याने मला विचारले, ""तुम्ही या पुराणकथा वाचून काय करणार आहात?'' त्यानंतर माझ्या उत्तराकडे फारसे लक्ष न देता ते त्यांच्या नव्या मोबाईल फोनमधील फीचर्स पाहत राहिले. तरीही मी म्हणालो, की मी महाभारताचा अभ्यास करतो आहे. त्यावर ते म्हणाले, ""व्वा! पण तुम्हाला हिंदुत्वाची तर बाधा झालेली नाही ना?''
त्यांची ही प्रतिक्रिया कदाचित सहज असेल; त्यांच्या मनात काहीही नसेल. मात्र त्यामुळे मी निराश झालो; अस्वस्थ झालो. पुराणकथा वाचणे, धार्मिक ग्रंथ वाचणे ही कट्टरतेची कृती आहे, असे तर काही "धर्मनिरपेक्षतावाद्यांना' वाटत नाही ना, असा प्रश्‍न मला पडला. तसे असेल तर धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या असहिष्णुतेची मला भीती वाटू लागली. या प्रतिक्रियेने मला चेन्नईतील मला माहीत असलेल्या एका महिलेची गोष्ट आठवली. या महिलांची वेशभूषा पाश्‍चिमात्य आहे. घराजवळच्या शंकराच्या मंदिरात त्या अधूनमधून जात. मात्र त्यांच्या काही धर्मनिरपेक्षतावादी मित्रांनी त्यांच्या या "धार्मिक' वृत्तीची थट्टा सुरू केली. शेवटी आपल्यावर हिंदुत्वाचा शिक्का बसेल की काय, या भीतीने या महिलेने मंदिरात जाण्याचेच बंद केले होते.
हे खरे आहे, की आज धार्मिक मूलतत्त्ववाद जगभर वाढतो आहे. मात्र त्यामुळे धार्मिक आणि धर्मांध यांच्यात फरक करणेच बंद झाले आहे. एखादी व्यक्ती धार्मिक असू शकते. आपल्या श्रद्धा ती जोपासत असते. मात्र अशी व्यक्तीही धार्मिक मूलतत्त्ववादीच आहे, अशी समजूत धर्मनिरपेक्षतावादी करून घेत आहेत. त्यामुळे असे होत आहे, की उदारमतवादी हिंदूही आपला धार्मिकपणा लपवू पाहत आहेत. आपल्या धार्मिकतेचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तर लावला जाणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटते आहे. अन्य देशांतील उदारमतवादी ख्रिश्‍चन आणि उदारमतवादी मुस्लिम यांनाही अशाच प्रकारची भीती वाटते आहे.
भारतात असे का होत असावे? याची काही कारणे संभवतात. एक म्हणजे एके काळी धर्मनिरपेक्षतावादाची बाजू मांडणारी, तो उचलून धरणारी बहुतेक मंडळी मार्क्‍सवादी होती. या मंडळींचा देवावर विश्‍वास नसतो; किंबहुना ते देवाचा द्वेष करतात. त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद धर्माच्या दुसऱ्या बाजूकडेच- म्हणजे अंधश्रद्धा, कट्टरता, धर्मांधता याकडेच पाहत असतो. परंतु धर्माची दुसरी बाजूही आहे. धर्माच्या आधारेच अनेक जण जीवन व्यतीत करीत असतात, दैनंदिन प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करीत असतात. धर्म हा त्यांच्यासाठी आश्रयस्थान असतो. याकडे दुर्लक्ष करीत धर्मनिरपेक्षतावादी आपले मुद्दे मांडत असतात. मात्र त्यांची भाषा ही येथील सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडची असते. त्यामुळे धर्मांधतेला रोखण्याची त्यांची धडपडही अपुरी पडते. धार्मिक विद्वेषातून होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध करणे, एवढेच त्यांच्या हातात राहते. असा हिंसाचार त्यांना रोखता येत नाही. महात्मा गांधींनी मात्र तो रोखून दाखवला होता. स्वातंत्र्याच्या सुमारास बंगालमध्ये गांधीजींनी ही किमया करून दाखविली.
दुसरे कारण अज्ञानाचे आहे. आपल्याकडील मुले प्राचीन वाङ्‌मय, पुराणकथा यांचे वाचन फारसे करीत नाहीत. पाश्‍चिमात्य देशांतील विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत प्राचीन वाङ्‌मयाचा, साहित्याचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, त्याकडे समीक्षात्मक दृष्टिकोनातून पाहतात. आपल्याकडे हे व्यापक प्रमाणावर होत नाही. मुलांना पुराणकथा कळतात त्या आजीने सांगितलेल्या गोष्टींमधून, "अमर चित्रकथा'सारख्या पुस्तकांतून किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून. इटालियन विद्यार्थी दान्तेच्या "डिव्हाईन कॉमेडी'चा अभ्यास करतात, इंग्लिश विद्यार्थी मिल्टन वाचतात आणि ग्रीक मुले इलियाडचा अभ्यासतात. असे असताना "महाभारता'च्या अभ्यासाबाबत "धर्मनिरपेक्षता'वादी द्विधा मनःस्थितीत का असतात? एक खरे आहे, की महाभारतात अनेक देवता आहेत आणि कृष्णासारखी व्यक्तिरेखा आहे- जी एकाच वेळी तत्त्वज्ञान सांगते, चतुराई करते, शिष्टाई करते आणि कारस्थानेही करते. दान्ते, मिल्टन आणि होमर यांच्या वाङ्‌मयातही देव-देवता आहेतच ना?
खऱ्या धर्मनिरपेक्षतेसाठी..
शाळांत महाभारत शिकविण्याबाबत मला पडलेला हा पेच कदाचित गांधीजी समजू शकले असते. या महाग्रंथाच्या भारतीयांच्या जीवनात असलेल्या स्थानाची कल्पना त्यांना होती. महाभारताचे एक भाष्यकार व्ही. एस. सुखटणकर यांनी म्हटले आहे, ""महाभारत हा आपल्या सामूहिक अंतर्मनाचा आशय आहे.. त्यामुळे आपण त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार करायला हवा आणि समतोलपणे तो समजून घ्यायला हवा. मग लक्षात येईल, की महाभारत हा वर्तमानकाळापर्यंत लांबलेला भूतकाळ आहे. तो वर्तमानकाळ म्हणजे आपण स्वतःच.'' गेली सहा वर्षे मी महाभारत वाचतोय आणि त्यातून मला आनंद मिळतोय. रोज तो मला नव्याने भेटतोय. आपल्या संस्कृतीची खोलवर गेलेली ही मुळे आपल्या नव्या पिढीला कळली पाहिजेत. ती जर त्यांनी माहीत करून घेतली नाही, तर या मुळांविनाच वाढतील- आणि मग त्यांना या संस्कृतिवृक्षाची फळेही चाखता येणार नाहीत.
भारतात धर्मनिरपेक्षतावादाची बीजे रोवण्याचे प्रयत्न आपण करतो आहोत. पण या प्रयत्नांत धर्मांधता आणि धर्मनिरपेक्षता यांच्यात देशाचे विभाजन करून चालणार नाही. तसे करणे खूप सोपे ठरेल. सर्वसामान्य भारतीय हे सभ्य आणि मर्यादाशील आहेत. सर्व धर्मांच्या, श्रद्धांच्या आणि नास्तिकतेच्याही प्रती सहिष्णुता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांच्या धार्मिकतेचा लाभ घेत हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे रूपांतर आपल्या मतपेढीत करू नये. धर्मनिरपेक्षतावाद्यांनीही धार्मिकतेचा आदर करायला हवा, तेव्हाच धर्मनिरपेक्ष समाजाची स्थापना होईल.
-गुरुचरण दास

गुरुवार, १० सप्टेंबर, २००९

'सुर्यकांत भांडेपाटील ' एक भन्नाट माणूस

'सुर्यकांत भांडेपाटील ' एक असच कधीही न ऐकलेले नाव पण भन्नाट माणूस,
काम काय तर अपहरण झालेल्या लहान मुलांना शोधणे व पोलिसांना मदद करणे आणि यात साथ कोणाची तर बायकोची आणि मित्रपरिवाराची आणि मोबदला काय तर स्वताच्या खिशातील पैसे खर्च करण्यात धन्यता मानणे.

भांडे पाटील यांनी आतापर्यंत कितीतरी अपहरणातील गुन्ह्यांचा छडा लावलाय यामागे आहे त्यांच्या स्वताच्या मुलाच्या अपहरण आणि खुनाची वेदना.

२९ नोव्हेंबर १९९९ रोजी त्यांच्या संकेत नावाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा अपहरण करून खंडणीसाठी खून करण्यात आला
अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून २ वेळा १-१ लाख रुपये घेतले, पण तरीही काही उपयोग झाला नाही.पोलिसांना त्यांचा छडा लावता आला नाही.
अशातच अजून एका अपहरणाची बातमी आली भांडे पाटील स्वता जाऊन त्या मुलाच्या पित्याला जाऊन भेटले.त्यावेळी दोन मुलांच्या अपहरणातील समान दुवे त्यांच्या लक्षात आले त्यांनी स्वता तपास केला आणि त्या २ कुटुंबातील समायिक काम करणाऱ्या सुताराला त्यांनी त्या अपहरण प्रकरणी पकडून दिले .
त्यानंतर भांडे पाटील अपहरणाच्या प्रकरणात स्वता त्वेषाने काम करू लागले.

The DetectiveImage via Wikipedia

The DetectiveImage via Wikipedia



त्यांनी आतापर्यंत ३२ प्रकरणात यशस्वी उकल करून पोलिसांना मदद केली आहे तसेच ७-८ प्रकरणात स्वताच सर्व १००% तपास करून गुन्हेगारांना पकडून पोलिसांकडे दिले आहे .
भांडे पाटील यांचा अर्थार्जनासाठी स्वताचा व्यवसाय आहे. त्यामुळे हे सर्व ते पैस्यासाठी करतात असे काही नाही.
अशा प्रकारचे गुन्हे झालेले जेंव्हा ते वर्तमानपत्रात वाचतात तेंव्हा ते स्वता पत्नीसोबत त्याठिकाणी पोहचतात आणि तपास करण्यास सुरवात करतात.

खाण्यापिण्याचं सोडाच प्रवासखर्च हि ते घेत नाहीत सर्व काही स्वखर्चाने सुरु असते.

तपास केलेल्या सर्व गुन्ह्यांचे शेकडो क्लिप्स चीत्रनासहित त्यांच्याकडे तयार असतात आणि तपासकार्यात मिनिट न मिनिट लिहिलेली डायरी तर पोलीसानासुद्धा चकित करून सोडणारी आहे.

असा हा भन्नाट माणूस प्रसिद्धी पासून कायमच लांब राहिला आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांचा सन्मान केला पाहिजे असे मला वाटते.

सविस्तर बातमी सामनाच्या 'उत्सव' या पुरवणीत 'भन्नाट माणसे'या सदरात वाचण्यास मिळाली होती.

Reblog this post [with Zemanta]

शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

गरज कशाची अंधश्रद्धा निर्मुलन कायदा कि प्रबोधनाची ????

अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जातात हे आतापर्यंत दिसून आले आहे आणि त्याला समितीने वेळो वेळी उत्तर देण्याचा प्रयत्न हि केला आहे
या कायद्यातील काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नाहीत किंवा त्याच्या व्याख्या अधोरेखित करण्यात आल्या नाहीत उदाहणार्थ

'चमत्कार '
आता याची व्याख्या काय ते सांगितले नाही मग 'साई बाबा ' हे चमत्कार करत होते असे त्यांचे भक्त मानतात किंवा ते चमत्कार करत होते म्हणून त्यांना भक्त मानतात असे म्हणा हव तर मग ते अशा वेळी ते कायद्याच्या कचाट्यात येणार का ?
आणि असे झाले तर ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

किंवा आपल्या काही धर्मग्रंथांमध्ये काही बाबी चमत्कार म्हणून नोदावल्या गेल्या आहेत

The Law album coverImage via Wikipedia

आणि त्याच्यावरच आपल्या धर्मिक संस्था अवलंबून आहेत मग त्यावर हि गदा येणार का ?
किंवा जोतिष शास्त्राबद्दल यांची भूमिका काय का तेही गुन्हा ठरणार का ?
असे झाले तरपुन्हा ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

आणि जर कोणी हवेतून उदी, मौल्यवान वस्तू काढून दाखवणे ,मंतरलेले पाणी देऊन आजार बरे करणे असे करत असेलतर तो गुन्हा ठरू शकतो हे मान्य केलेतर त्याला प्रतिबंध करणारा कायदा आता अस्तित्वात नाही का ? तर आहे
उदाहरणार्थ: इंडियन पीनल कोडची अनेक कलमे उपयुक्त ठरू शकतात. भूतबाधा उतरवण्यासाठी जर कोणाला दोरखंडाने बांधले गेले तर आयपीसीच्या ३१९-३२९ कलमांचा वापर करता येईल. इजा केली गेली तर ३२०वे कलम, जीवितालाच धोका उद्भवला तर ३३६वे कलम, दैवी कोपाची भीती घालून एखाद्याला विशिष्ट विधी करण्याची सक्ती करण्यास ५०८वे कलम, सरकारी नोकराने असे प्रकार करण्याविरोधात ४९७वे कलम, फसवणुकीसाठी ४१७वे कलम अशी कलमे अस्तित्वात आहेत त्यांचा वापर करता येऊ शकेल.

किंवा यातच काही बदल करून हा कायदा अजून कडक करता अयू शकत नाही का ?

आता हे बघा
धामिर्क अध्यात्मिक प्रथांच्या नावाखाली दुष्ट प्रथा राबवणे हा या कायद्याच्या १० ११- कलमानुसार गुन्हा आहे. पण १३व्या कलमानुसार हानी पोहोचवणाऱ्या धामिर्क कृत्यांना वगळण्यात आले आहे.

'हानी पोहोचवणाऱ्या' म्हणजे नक्की काय ? आणि हे कोण ठरवणार ?

नरबळीची घटना घडली तर त्यासाठी ३०२ चे कलम आहे. फसवणुकीचा गुन्हा घडला तर ४२० चे कलम आहे. मग वेगळ्या कायद्याची आवश्यकता कशासाठी? फारतर आहे त्याच कायद्यात दुरुस्ती करता येईल.

या विधेयकात अंधविश्वास, आन्ध्श्राधा अज्ञान या संज्ञा, कुठचीही नेमकी व्याख्या करता वापरल्या आहेत.
तसेच तसेच प्रथा रूढी यातील फरक कुठेही स्पष्ट केलेला नाही.

अधिनियम १३ नुसार ''व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आथिर्क बाधा पोहोचणाऱ्या धामिर्क विधी कृत्यांना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही'', असे सांगणारे हे कलम बाधा पोहोचते की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा हे सांगत नाहि

'आदी शक्ती असल्याचे भासवून अथवा आदी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून' या उल्लेखातून विधेयक अशा शक्तींचे अस्तित्व मानते की नाकारते? ते नाकारण्याचा काही लोकांना अधिकार असेल तर ते मानणाऱ्यांचा अधिकारही मान्य करावा लागेल.


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बर्याच ठिकाणी गोंधळ उडतो

श्रद्धा हि एखाद्या माणसावर असू शकते , देवावर किंवा कामावर सुधा असू शकते किंवा प्रयत्न करूनही एखादी गोष्ट साध्य नाहि झाली तर येणाऱ्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्या श्रद्धेचा उपयोग होवू शकतो

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप पुसट रेषा असते श्रद्धा हि एक मर्यादा सोडून पुढे गेली कि ती अंधश्रद्धा बनते परंतु ती रेषा कोण ठरवणार ?
किंवा माझी श्रद्धा दुसर्या कोणाला अंधश्रद्धा वाटू शकते वा एखाद्याची अंधश्रद्धा मला श्रद्धा भासू शकते मग हे कोण ठरवणार कि श्रद्धा कि अंधश्रद्धा

त्यासाठी श्रद्धेमधील अंधश्रद्धा दूर करण्याची आवशकता आहे आणि ती प्रबोधन करून शक्य आहे नाकी कायदा करून

माणसाच्या सुखाच्या , जीवन जगण्याच्या किंवा राहण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात त्यात समिती हस्तक्षेप कशी काय करणार ?

आकाशात चमकणाऱ्या विजेला घाबरून गुहेत पळणारा माणूस आज हस्तस्पर्शाने बटण दाबून विजेला आमंत्रित करतो किंवा तिची कार्यक्षमता संपवतो.
वीज हा आता चमत्कार उरलेला नाही, म्हणजेच ज्ञानाने माणसाच्या मनातील अज्ञानावर विजेचा झोत टाकल्यामुळेच तेथील अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला.
हेच तत्त्व एकुणात लक्षात घेतले तर जनमानसाचे शिक्षण आणि प्रशक्षण अव्याहत चालू ठेवणे आणि वैज्ञानिक सूत्रांचा जीवनातील पडताळा अधिक सहजतेने होईल यासाठी आवश्यक असलेले तंत्र विकसित करून त्याला माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे, म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे.

यातील मुद्दे वेळवेगळ्या लेखातून घेतले आहेत
विक्रम
Reblog this post [with Zemanta]