शनिवार, २७ मार्च, २०१०

साल्हेर ... एक बुलंद किल्ला

साल्हेरचा बुलंद किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला आहे.त्याची उंची समुद्रसपाटीपासून १५९३ मीटर्स आहे.त्याच्या शेजारील सालोटा या डोंगरावरही दुर्ग उभारला आहे.तो साल्हेरचा उपदुर्ग आहे.एका दुर्गाच्या शेजारचा मोकळा डोंगर दुर्गाला घातक ठरतो,म्हणून जवळच्या डोंगरावरही बांधणी करून दुर्ग उभारतात.साल्हेरहून उत्तर ईशानेला तांबोळ्या,रतनगड (नाहवा ) हे दुर्ग तर मांगी-तुंगीची शिखरे दिसावयास लागतात.पश्चिमेला अजंटा-सातमाळा रांग दिसते.सह्याद्रीला रौद्रतेची कल्पना यावयास लागते.साल्हेरच्या चारही बाजूस कडे आहेत.त्यामुळे तटबंदी फार कमी आहे.पश्चिमेकडचा कडा उत्ताल आहे.साल्हेर गावाकडून तशीच माळदर-वाघांबे गावाजवळच्या खिंडीतून साल्हेरवर  यावयास पायवाट आहे.इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजीमहाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला.त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला.तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठीवले.
 इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता.या युद्धाचे मोठे रंजक वर्णन बखरीत आले आहे.
'एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली.एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली.मोठे युद्ध जाहले.मोगल,पठाण,रजपूत,तोफची,हत्ती,उंट,आराबा घालून युद्ध जाहले.युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उठला कि  तीन कोश औरस-चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.हत्ती रणास आले.दुतर्फा दहा हजार माणूस मुर्द जाहले.घोडी,उंट,हत्ती यांस गणना नाही.रक्ताचे पूर वाहिले.रक्ताचे चिखल जाहले.त्यामध्ये रुतो लागले.असा कर्दम जाहला.मारता मारता घोडे जिवंत उरले नाहीत.जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजीयाकडे गणतीस लागले.सवाशे हत्ती सापडले.सहा हजार उंट सापडली.मालमत्ता,खजिना,जडजवाहीर,कापड अगणित बिछाइत हातास लागली.बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव जाहला.ऐसा कुल सुभा बुडवला.हजार-दोन हजार सडे,सडे पळाले,असे युद्ध जाहले.'



 या युद्धात शिवाजीराजांचा एक सहकारी सूर्याजी काकडे हा छोट्या तोफेचा गोळा लागून पडला.'भारती जैसा कर्ण तैसा' असे त्याचे वर्णन आले आहे.साल्हेर दुर्गाच्या सालोट्याच्या बाजूस खोदलेल्या अनेक गुहा आणि पाण्याची टाकी हि अभ्यासण्यासारखी आहेत,पण दुसर्या बाजूकडचे दगडात कोरलेले कठडा असलेले कड्याच्या टोकावरचे जिने आपल्याला थक्क करतात.कोणी केले असेल हे काम ????

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

हे काय राजसाहेब तुम्ही सुद्धा ????

'कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही '
असे राजसाहेब तुम्हीच शिवाजी पार्कच्या सभेत निक्षून सांगितले होते ना ????


मग हे काय आहे ?



कशासाठी एवढी लाचारी ?
मतांसाठीच  ना ?





 परंतु तेंव्हा आम्ही समजून घेतले होते , परंतु तुम्ही आता आमच्या भावनाशीच
खेळायला लागलात याला माफी कशी आणि का ????


बोले तैसा चाले असा एकच नेता हे आता जनतेपासून लपून राहिले नाही हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे 


लोकानो विचार करा आणि सावध व्हा
जो आज मतांसाठी स्वतः 'टोपी' घालू शकतो तो उद्या तुम्हालाहि 'टोपी' घालू शकतो.

(by Mail )



मंगळवार, १६ मार्च, २०१०

नविन वर्षाच्या शुभेच्छा..

हिंदू नविन वर्षदिनाच्या माझ्यातर्फे तूम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा... हे नविन वर्ष आपणा सर्वांना, सुख, समृद्दी, ज्ञानार्जन, मनोरंजन, आणि यशदायी जावो हीच सर्वशक्तीमान देवाकडे प्रार्थना...

सोमवार, ८ मार्च, २०१०

एक वनवासी- सिंधुताई सपकाळ

सिंधूताई सपकाळ हे नाव आपण कधीना कधी ऐकलेच असेल.समाजाला काहीतरी चांगल देण्याची,त्यांना वळण लावण्याची ताकद असणारे अनेक  प्रतिभावंत मराठी मातीत आहेत.प्रश्न आहे तो फक्त त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.आपल्या कार्याचा ठसा जनमाणसावर उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमंकाने आणि आदराने घेतले जाते.समाजाने धूडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने,प्रेमाने आपलास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कोणालाही थक्क करणारी आहे.वैयक्तिक आयुष्यातील दुखाचे डोंगर दूर सारत दुसर्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताईचा जीवनपट खरच प्रेरणादाई आहे.
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट आता चित्रपट रुपात येत आहे.सचिन आणि बिंदिया खानविलकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. या चित्रपटात ताईच्या जीवनातील  सर्व घटनांचा,चढ- उताराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जसे लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण,थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा.या चित्रपटाची कथा सिंधूताईच्या 'मी वनवासी' या पुस्तकावर आधारलेली  आहे.
हा चित्रपट एक जागतिक दर्जाचा ह्वावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.या चित्रपटाद्वारे सिंधूताई जनमाणसापर्यंत पोहचतील अशी आशा करूयात.

सिंधूताईना प्रत्यक्ष भेटण्याचा योग फार कमी आला.लहान असताना आमच्या गावात सिंधूताईचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांना ऐकण्याचा योग आला होता.बोलताना त्या लोकांना आपलेसे कधी करून घेतात हेच लक्षात येत नाही.आपली अनाथ मुलांसाठीची तग मग मांडताना त्या आजही कवितांचा   आधार घेतात.गदिमा,बहीणाबाई,सुरेश भटांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकताना ऐकणारा तल्लीन झाला नाहीतर नवलच!

सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती.

आम्ही ओर्कुट वरील एका समूहातील काही सभासदांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एक मोहीम राबविली होती. त्यानुसार एका जबाबदार सभासदाने बँकेत खाते काढून त्या खात्यावर  ज्याची इच्छा आहे त्या सभासदाने आपल्या परिस्थितीनुसार काही रक्कम जमा करायची( ऑन लाईन). असे आम्ही एकून १९१५० रुपये जमा करून ते दापोडीतील मालनताई तुळवेंच्या अनाथाश्रमाला  दिले होते.तेवढाच आपला खारीचा वाटा. हि मोहीम आम्ही यशस्वी करून दाखवली तेही कोणी एकमेकाला न भेटता. असेच आपण सर्व मराठी ब्लॉगर  मिळून सिंधुताई साठी काही करू शकतो का ? जास्त नाही एकाने  ५००-१००० जरी जमा केले तरी चालतील तेही नाही  जमले तरी १००-२०० तरी देऊ शकतोच कि. बघा पटतंय का ते प्रतिसाद द्या प्रत्यक्षात  आणू आपण हे, मी वाट पाहत आहे.


कोणाला जरी सरळ आश्रमात जाऊन मदद करायची असेल तरी ते तसे करू शकतात.पुण्यापासून जवळ आहे.

आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुने - ४१२ ३०७

सिंधुताईचा  पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३

शुक्रवार, ५ मार्च, २०१०

यांचा आक्रोश कोणी ऐकला का ?

काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये २ शीख बांधवांची हत्या तालिबान्यांनी  केली.त्यांचा शिरच्छेद करून ती मुंडकी गुरुद्वाराला भेट म्हणून पाठवण्यात आली.काही काळापुरती हि बातमी न्यूज वर झळकली आपल्यातील काहींनी वाचली काहींनी नाही वाचली.कोणी २ शब्दात अरे वाईट झाले असे बोललो कोणी तेही नाही बोलले. मरणारे  कुत्र्याच्या मौतीने मेले कोणाला काही दुख नाही.
हिंदुस्तान सरकारने नेहमीप्रमाणे तीव्र  शब्दात या गोष्टीचा निषेध नोंदवला झाले. हा सगळा मला षंढपणा वाटतो.
काय आहे कोणत्याही हिंदूला  हिंदूंच्या हत्तेचे दुख आता होतच नाही असे वाटते.त्यांना आता त्याची सवय झालीय.शीख - हिंदू यांनी इतिहासकाळापासून मुस्लीम धर्मांतेविरुद्ध कायमच  तलवारी उपसल्या आहेत.धर्मासाठी बलिदान दिले आहे.त्याच धर्माचा शिरच्छेद होताना लोकांचे  रक्त उसळत कसे नाही ?
फाळणीनंतर काय झाले मुस्लिमांसाठी 'पाकिस्तान' निर्माण झाले पण 'हिंदून'साठी हिंदुस्तान तयार झाले का ? नाही ...
देश निधर्मी ( सेक्युलर ? ) आहे असे सांगून हिंदुना कायम फसवण्यात  आले आहे. या निधर्मीपणाच्या आडूनच आपले पंतप्रधान या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असे बिनदिक्त्तपणे म्हणू शकतात. मग हिंदुनी जायचे कुठे ? आज हिंदू -शीख यांचा पाकिस्तानात शिरच्छेद होत आहे आणि हिंदुस्तानात ते पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटात मारत आहेत.म्हणजे दोन्हीकडे मरण हिंदूंचेच .उठसुठ मानवाधिकाराची बांग देणारे पाकिस्तानात दोन हिंदू शिखांची हत्त्या झाल्यावर काय करत होते ? हिंदूंच्या अशा हत्त्या पाकिस्तानात नेहमीच होत असतात आणि त्याचे कोणालाच काही देणेघेणे राहिले नाही.
पण चूक कुणाची ? आपण 'हिंदू' आहोत याचा गर्व किंवा अभिमान हिंदूमध्ये राहिला आहे का ? आजकाल काहीनातर आपण हिंदू आहोत याचीही लाज वाटायला लागली आहे . मग याच्यापेक्षा वेगळे काय घडणार ? हिंदुना हिंदू म्हणून घेण्यात काय कमीपणा आहे हेच समजण्यापलीकडचे  आहे.


 'मुझे अपने को हिंदू कहलाना एक गाली सा लागता है' असे वक्तव्य काही दिवसापूर्वी हिंदीतील प्रसिद्ध लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांनी जयपुरात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात केले होते. वर्तमानपत्रांनी  याला चांगली प्रसिद्धी दिली होती.हिंदू जेंव्हा हिंदूला काही बोलतो तेंव्हा या सो कौल्ड सेक्युलर मिडीयाला खूप मजा वाटते आणि ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी बनते.
'मी हिंदू असल्याची मला लाज वाटते' अशाप्रकारचे वक्तव्य काही वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री टी. आर.बालू यांनी ख्रिश्चनांच्या  एका कार्यक्रमात  केले होते. त्यावेळीही या हिंदूद्वेष्ट्या वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. विशेस म्हणजे या सर्व वर्तमानपत्रांचे संपादक हे हिंदूच होते.

पाकिस्तान आपला चांगला शेजारी आहे आणि त्याच्याशी आपण चांगलेच वागले पाहिजे असे सांगणारे आणि त्याला पाठींबा देणारे हिंदू  या शीख हत्त्यांचा साधा निषेध करायला तरी  पुढे येतील का ?
नाही कोणी येणार नाही हो
हे असाच चालू राहणार हिंदू मरत राहणार इथे नाहीतर तिथे ......कोणाला काही फरक पडत नाही
(टीप-यातील काही मुद्दे राउत यांच्या लेखातून  घेण्यात आले आहेत )
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

बुधवार, ३ मार्च, २०१०

सध्याचे तरुण शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श घेतील का ?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज ३८० वी जयंती . तसे पाहण्यास गेलेतर १९ फेब्रुवारीला तारखेनुसार किंवा शासकीय शिवजयंती नुकतीच झाली परंतु त्याचा शासनालाच विसर पडला होता ते जाऊ द्यात. आम्ही दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करतो ती म्हणजे फाल्गुन कृष्ण तृतीयेला, जसे आम्ही आमचे हिंदू  सण,उत्सव  साजरे करतो तसे. शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच आहेत आणि राहतील असो ...
हिंदू धर्म व हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असताना लहानवयात 'स्वराज्य व स्वधर्म' याची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा शिवरायांनी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांचे कार्य समस्त देशाला प्रेरणा देणारे आहे.परंतु खरच हिंदुस्तानातील लोकांनी विशेषता तरुणानी महाराजांकडून प्रेरणा घेतली का ?
ज्या शिवाजी महाराजांनी मुठभर तरुणांना हाताशी घेऊन इस्लामी राजवट नेस्तनाबूत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणत्या बळावर याचा विचार केला पाहिजे.हाताशी अपुरे संख्याबळ,अपुरी शस्त्रसामुग्री ,अपुरा पैसा असताना बलाढ्य असणार्या मुघलांचा मुकाबला केला.आपला गनिमी कावा,कल्पक डावपेच,निर्भयता याच बरोबर हिंदू धर्माचे बळ आणि तेज मोघालाना दाखवले.
हे बळ त्यांना कुलदैवत आई जगदंब तुळजाभवानी यांच्या कृपेने आणि माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आले होते.कुलदेवतेची उपासना आणि आईचे मार्गदर्शन हि एक मोठी शक्ती आहे हे महाराजांनी जाणले होते परंतु आपण हे आता विसरलो आहोत.
 आजच्या तरुणांसमोर योग्य मार्गदर्शन नसल्याने तरुण पिढी वैयक्तिक स्वार्थात गुंतलेली दिसत आहे.करियर च्या नावाखाली झटपट पैसा मिळवणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सध्याची तरुण पिढी रममाण आहे. आपल्या राष्ट्रात घडत असलेल्या गैरकृत्याविरुद्ध विचार व कृती करण्याची तसदी घेणारे तरुण सध्या दुर्मिळ झाले आहेत.
तसेच सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आत्मबळाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे तरुण आत्महत्यासारख्या दृष्टचक्रात ओढले जात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणासारखा राष्ट्राभिमान आणि धर्मभिमान सध्याच्या तरुणात दिसत नाही.कारण आजची निधर्मी बोलली जाणारी शिक्षणपद्धती आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे नवीन पिढी बुद्धीने हुशार;परंतु मानाने दुबळी व स्वार्थी बनली आहे.
देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे.शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरशांचे आदर्श तरुणांसमोर हवेत.परंतु आजच्या तरुण पिधेचे आदर्श हे अभिनेते,खेळाडू यांच्यापर्यंत सीमित झाले आहेत. हे आदर्श योग्य आहेत का ?
हे चुकीचे आदर्श आपल्याला शेजारील शत्रूराष्ट्राशी,अतिरेक्यांशी लढण्याचे बळ देणार आहेत का ? अशा चुकीच्या आदर्शामुळे जम्मू काश्मीर चा भाग गिळंकृत करणारा देशात स्पोट घडवणारा पाकिस्तान,पूर्व भारताकडे वक्रदृष्टीने पाहणारा चीन आणि घुसखोरी करणारा बांगलादेश यांच्यापासून सध्याचे तरुण अनभिज्ञ राहत आहेत.
त्यामुळे तरुणांना योग्य आदर्श दाखवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
तरुणांनी आपल्यातील सुप्त सामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसे केल्यानेच शिवाजी महाराज बालवयात बलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकले. माता जिजाऊ यांनी त्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम यांच्यासारखे आदर्श ठेवले होते आणि धर्मनिष्ठेचे बाळकडू पाजले होते.आजच्या तरुणांनीही आपले शिवतेज जागृत केले पाहिजे आपले आध्यात्मिक बळ वाढीवले पाहिजे. आपल्या सण-उत्सवाचे पावित्र्य थाळू न देता सह्स्त्रानुसार साजरे करायला हवेत.आपल्यातील मानसिक दुर्बलता कमी करून राष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा  अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार,त्यातून मिळणारी प्रेरणा व तेज फक्त तरुणानंच नाह्वेतर समस्त देशाला जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकते.जो आमचा जगण्याचा अधिकार हे राष्ट्रद्रोही व पाकडे अतिरेकी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजच्या शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करूयात आणि एक सामर्थ्यशाली हिंदुस्तान बनवण्याचा निश्चय करूयात.


निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !