गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

चला दंगा करूयात :)

गुलाबी थंडी,सोनेरी प्रकाश ... नव्या स्वप्नांची नवी लाट !
नवे प्रयत्न,नवा विश्वास ...नव्या यशाचा नवा ध्यास !

चला हसत खेळत दंगा करत नूतन वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होऊया .



enjoyyyyyyyyyyy n cheeeeerrrrrrrssssss


नविन वर्ष तुम्हा सर्वाना सुख समुर्द्धि व भरभराटिचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!!

बुधवार, ३० डिसेंबर, २००९

मुलींनो,जरा जपून

Om GirlImage by DistortedSmile via Flickr

कालच्या जेसिका ते रुचिका या पोस्टवरून आणि त्यावरील अपर्णाच्या अभिप्रायावरून असा प्रश्न पडला कि आजच्या जमान्यात आपण जी महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत त्यात कमीत कमी स्त्री तरी सुरक्षित आहे का ? जी कोणाची तरी आई,बहिण,मुलगी,बायको,प्रेयसी असते.
एका सामान्य विद्यार्थिनीला अजाणत्या वयात विनयभंगासारख्या किळसवाण्या घटनेला सामोरे जावे लागले कि काय होते हे रुचिकाच्या घटनेमुळे पहायला मिळाले. या घटनेने सामाजिक जाण राखून असणार्या सभ्य आणि सुशिक्षित समाजाला हादरवून टाकले.वयाने,हुद्द्याने कितीही मोठ्या असलेल्या व्यक्तीचे पाय घसरू शकतात आणि त्यातून एखाद्या निष्पाप जीवाचा घात होऊ शकतो हे त्यामुळे लक्षात आले.रुचीकाला आणि तिच्या परिवाराला अत्यंत दुर्दैवी परिस्थितीतून जावे लागले.अशी परिस्थिती यापुढे कोणावरही येऊ नये यासाठी ठोस पावले उचलणे आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
रुचीकाच्या वाट्याला जे काही आले ते कोणत्याही मुलीच्या वाट्याला कधीही आणि कोठेही येऊ शकते.हि वस्तुस्थिती आहे आणि ती अशा मुलींच्या पालकांना अस्वस्थ करणारी आहे.यावर उपाय काय????
यापासून मुला मुलीना सतत सावध करणे आणि असा प्रसंग आपल्यावर आलाच तर त्याचा प्रतिकार कसा करावा याचे प्रशिक्षण देणे हाच यावर उपाय असू शकतो.
मुलामुलींना लैंगिक शिक्षण द्यावे वैगेरे बोलले जाते पण ती जबाबदारी शाळांची आहे आणि हे शिक्षण शिक्षकांनीच दिले पाहिजे असे म्हणून हि जबाबदारी त्यांच्यावर ढकलली जाते. तरीही लैंगिक शिक्षण देऊन हि समस्या सुटेल का?
मुला मुलींवर असा प्रसंग आलाच तर त्याचा मुकाबला कसा करावा,याबाबत कोणाकडे कशी तक्रार करावी याची माहिती त्यांना असली पाहिजे.याबाबत त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभे राहिले पाहिजे.मुलांचा लैंगिक छळ मोठ्या प्रमाणात होतात हे सरकार जाणते परंतु तरीही त्यावर ते ठोस उपाय शोधात नाही या गोष्टीची चीड येते.
अशा पिडीत मुलामुलींनी आपली तक्रार आई-वडिलांच्या कानी घालावी असे कितीही बोलले जात असले तरीही अजून तरी आपल्या कुटुंबव्यवस्थेत तेवढा मोकळापणा आलेला नाही.त्यामुळे अशा गोष्टींवर काय उपाय असावा ????

Reblog this post [with Zemanta]

मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

जेसिका ते रुचिका

…And Justice for All album coverImage via Wikipedia
जवळजवळ दोन दशकांच्या कोर्टकचेरीनंतर ‘सीबीआय’च्या स्पेशल कोर्टाने अवघ्या सहा महिन्यांची कैदेची शिक्षा देऊन लगेच जामिनावर सोडल्यावर हरयाणाचा माजी पोलीस महासंचालक एस.पी.एस. राठोड याच्या चेहऱ्यावर फुललेले खुनशी हास्य बघून बॉलीवूडमधल्या अव्वल खलनायकांनीही लाजेने मान खाली घातली असेल. पोलिसाच्या वर्दीतील कायद्याचा भक्षक बनून कारकीर्द ‘गाजविताना’ राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने राठोडने हिंदूी चित्रपटातील जुलूम आणि दडपशाहीची बीभत्स पटकथा प्रत्यक्षात साकारली. सत्तेचा दुरुपयोग करून कायद्याला पायदळी तुडविणाऱ्या राठोडने नव्वदीच्या दशकातील उदयोन्मुख टेनिसपटू रुचिका गिरहोत्राच्या विनयभंगाने सुरुवात केली आणि तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून ते तिच्या कुटुंबाला देशोधडीला लावेपर्यंत त्याने उसंत घेतली नाही. गेल्या वीस वर्षांत बजावलेल्या या महान ‘कर्तृत्वा’दाखल हरयाणा सरकारने त्याला पोलीस महासंचालकाचे सर्वोच्च पद देऊन गौरविले, तर भारत सरकारने त्याला राष्ट्रपती पदकाने भूषविले. हिंदूी चित्रपटात राठोडसारख्या दुष्टात्म्याचा अंत नायकाच्या हातून होतो. प्रत्यक्षात न्यायासाठी अथक लढा देऊन अल्प कैदेचा का होईना, न्याय पदरी पाडून घेत गिरहोत्रा आणि प्रकाश कुटुंबीयांनी त्याच्या शेवटाची सुरुवात केली. सहा महिन्यांच्या शिक्षेवर सुटलेल्या राठोडच्या चेहऱ्यावरील ते हास्य बघून प्रसिद्धी माध्यमे आणि जनमानसात तीव्र संतापाचा डोंब उसळला. त्या हास्याचा अर्थ प्रकाश आणि गिरहोत्रा कुटुंबीयांना कळत होता. राठोड निवृत्त झाला असला तरी पोलीस प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात त्याचे उपद्रवमूल्य शाबूत असल्यामुळे भविष्यात तो मुस्कटदाबीची नवी मालिका सुरु करू शकतो, याची जाणीव त्यांना झाली होती. त्यांच्या सुदैवाने राठोडच्या गुन्ह्याकडे नरमाईच्या दृष्टीने पाहणाऱ्या व्यवस्थेवर राष्ट्रीय पातळीवर टीकेची झोड उठली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट नेत्या वृंदा करात यांनी या राठोडची दुष्कृत्ये आणि त्याला मिळालेल्या सौम्य शिक्षेवर राज्यसभेत ताशेरे ओढले. त्यापाठोपाठ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष गिरिजा व्यास यांनी राठोडवर कारवाईची मागणी केली. गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या आदेशावरून त्याचे निवृत्तिवेतन बंद करण्याची आणि राष्ट्रपती पदक काढून घेण्याची कारवाई सुरु झाली. रुचिकावरील मरणोत्तर अन्यायाच्या विरोधात काही संघटनांनी इंडिया गेटपाशी मेणबत्त्या लावून निषेध नोंदविला. हरयाणातील हुड्डा सरकारने त्याच्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे ठरविले. वीस वर्षांंपासून मेहेरबान असलेले राठोडचे ग्रह अचानक फिरले आणि त्याच्या कृत्यांची झाडाझडती नव्याने सुरु झाली.
१२ ऑगस्ट १९९० रोजी रुचिकाचा हरयाणातील पंचकुलाच्या टेनिस कोर्टावर राठोडने विनयभंग केला. त्याच्याविरोधात रुचिकाने तक्रार नोंदविली आणि तेव्हापासूनच तिच्या आयुष्याला अर्थ राहिला नव्हता. राठोडच्या प्रभावाखाली असलेल्या हरयाणा पोलिसांनी रुचिकाच्या भावाविरुद्ध वर्षभरात चोरीच्या सात तक्रारी दाखल करून त्याला पोलीस ठाण्यात अनेकदा राठोडच्या उपस्थितीतच अनन्वित यातना दिल्या. राठोडच्या दबावाखाली रुचिकाला शाळेतून काढून टाकण्यात आले. तिच्या वडिलांची नोकरीही गेली. आई नसलेल्या रुचिकावर देखरेख ठेवण्यासाठी राठोडच्या इशाऱ्यावरून वीणा नावाची महिला तिच्या घरी ठेवण्यात आली आणि न्यायालयात वीणाची जबानी तिची आई म्हणून नोंदविण्यात आली. रुचिकाच्या विनयभंगाची साक्षीदार ठरलेली तिची मैत्रिण आराधना, तिचे वडील आनंद प्रकाश आणि आई मधु प्रकाश यांनी राठोडने चालविलेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरूनच दहा वर्षांंनंतर राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण तोपर्यंत रुचिकाची इहयात्रा संपली होती. हरयाणाचा पोलीस महासंचालक म्हणून राठोडची ओमप्रकाश चौटाला सरकारने पदोन्नती केली होती आणि त्याने केलेल्या ‘उल्लेखनीय’ सेवेदाखल राष्ट्रपती पदकासाठी त्याच्या नावाची शिफारसही केली होती. रुचिकाचा भाऊ पोलिसांच्या आणि समाजाच्या नजरेत अट्टल चोर बनला होता. एक कुटुंब पूर्णपणे विस्कटून गेले होते.
१९९० पासून २००२ साली बढत्यांसह निवृत्त होईपर्यंत एस. पी. एस. राठोडला नेमका कोणत्या मुख्यमंत्र्याचा वरद्हस्त लाभला यावर सध्या वाद सुरु आहे. जनता दलाचे हुकूम सिंह, काँग्रेसचे भजनलाल, हरयाणा विकास पार्टी-भाजपचे बन्सीलाल आणि इंडियन नॅशनल लोकदल-भाजपचे ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री असतानाच्या काळात राठोडची ‘भरभराट’ झाली. देशातील अन्य कोणत्याही राज्याप्रमाणे हरयाणातही राजकीय नेते, त्यांच्या आश्रयावर पोसलेले गुंड आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून दिवसरात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे लचके तोडले जातात. कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबल्याचे दाखवायचे आणि त्यांना पोलिसांच्या मदतीने मोकळे सोडून राजकीय प्रतिस्पध्र्यांचा ‘एन्काऊंटर’ करण्याचीही क्लृप्तीही या राज्यात बिनबोभाट राबविली जाते. कायद्याचा ‘वापर’ करून आपल्या राजकीय विरोधकांना कायमचे वा तात्पुरते गप्प बसविण्यासाठी पोलिसांचा परिणामकारकपणे वापर करता येतो. राजकीय नेते आणि पोलीस एकमेकांना कसे पूरक ठरू शकतात, हे त्यातून दिसून येते. काही नेते गृह मंत्रालयावर जीवापाड प्रेम का करतात, याचेही उत्तर त्यात दडलेले आहे. राज्यकर्त्यांंना पडद्यामागे हिशेब चुकते करण्यासाठी वर्दीतील ‘डर्टी हॅरी’ हवेच असतात आणि राठोडसारखे पोलीस अधिकारी त्यांना उपकृत करण्यासाठी तत्परच असतात. राठोडला पदोन्नती आणि पदक मिळवून देण्यात आपली कोणतीही भूमिका नाही, असे चौटाला निर्लज्जपणे सांगत असले तरी ते वस्तुस्थिती नाकारू शकत नाहीत. ‘बना बनाया डीजीपी’ मिळाल्यानंतर त्याच्याकडून कोणकोणती कामे करून घ्यायची, हे चौटाला आणि त्यांच्या पुत्रांना सांगण्याची गरजच नव्हती.
रुचिका प्रकरणामुळे या सर्व गोष्टींची आता नव्याने चर्चा होऊ लागली आहे. ज्या राज्यात वर्षांनुवर्षे पुरुषी वर्चस्व आहे आणि जिथे जन्मापासूनच मुलींविषयी तिरस्कार बाळगला जातो, अशा दरहजारी ८६१ एवढे देशात सर्वात कमी मुलींचा जन्मदर असलेल्या हरयाणात रुचिकावर झालेल्या अन्यायाबद्दल कुणाला फारसे वावगे वाटत नाही. क्षुल्लक कारणासाठी राठोडला विनाकारण गुंतविण्यात आले, अशीच सर्वसामान्यांची मानसिकता तिथे आहे. पण या निमित्ताने दिल्लीतील प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष दिल्लीबाहेरच्या प्रकरणांकडे वळले आणि त्याचा फटका मस्तीत वागणाऱ्या राठोडला बसला. भविष्यात बडय़ांच्या अन्यायाला बळी पडलेल्या मध्यमवर्गापासून गरिबांचीही दखल घेतली जाईल, अशी आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. १९९९ साली मनु शर्माच्या पिस्तुलाची बळी ठरलेल्या जेसिका लाल प्रकरणी आलेल्या निकालावर क्षुब्ध झालेल्या सर्वसामान्यांचा आवाज प्रसिद्धी माध्यमांनी बुलंद केला होता. इंडिया गेटपाशी स्वयंसेवी संस्थांनी मेणबत्त्या घेऊन केलेल्या मूकआंदोलनाने या आवाजाला धार प्रदान केली होती. त्या प्रवासातील एस. पी. एस. राठोड हा नवा प्रवासी ठरला आहे. त्याची ‘मीडिया ट्रायल’ झाल्याने या प्रकरणात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांच्या मनात दहशत बसविणाऱ्या झगमगत्या लाल बत्तीच्या मस्तवालपणाला मिणमिणत्या मेणबत्तीने पुन्हा एकदा जेरीस आणले आहे. खलनायकी हास्य करणारा राठोड वैयक्तिक जीवनात हिंदूी चित्रपटाच्या पटकथेनुसार वागला, आता हिंदूी चित्रपटांना वास्तवातील खलनायकांची मस्ती उतरविणाऱ्या मेणबत्त्यांची दखल घ्यावी लागणार आहे. जेसिका ते रुचिका प्रकरणांनी हेच दाखवून दिले आहे.
(सौजन्य-लोकसत्ता)
Enhanced by Zemanta

लिंगाणा... रायगडचा पहारेकरी

लिंगाणा हा रायगडचा उपदुर्ग आहे.माणगड,सोनगड,महिन्द्रगड,लिंगाणा,कोकणदिवा हे दुर्ग रायगडाकडे जाणारया घाटवाटांवर पहारे देतात.कावळ्या,बोचेघोळ,निसनी,बोराटा,सिंगापूर,फडताड,शेवत्या,मढ्या अशी घाटांची नवे आहेत.या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते.बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे.आकाशात उंच गेलेला शिवलींगासारखा सुळका हा प्रस्तरारोहन करणार्यांसाठी मोठे आव्हान आहे.महाराष्ट्रातील युवकांनी ते आव्हान पेललेही आहे.,
मोहरी नावाच्या सह्याद्री माथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ जवळ आहे.हि नाळ
Fort Raigad http://www.madforclicks.Image via Wikipedia
अवघड आहे.इथून जवळच असणार्या रायलिंगहून लिंगान्याच दर्शन घेतलं,तर त्याचा थरार काय आहे याची कल्पना येईल.सिंगापूर या नाळेन जाण सोप आहे.लिंगाण्यावर जायचं तर लींगणमाचीला जायचं.जननी आणि सोमजाईच दर्शन घ्यायचं आणि मग लिंगाण्याकडे निघायचं.
घासार्यावरून जात असताना काही चौक्यांच्या खुणा ध्यानात यावयास लागतात.उजवीकडे पाण्याचे टाके.मग वाट कड्याच्या टोकावरून जाते.इथे खालून येणारी पायरया ढासळलेली वाट आहे.उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे.तिथ एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आल आहे.त्याचाच आधार घेऊन कडा पार करायचा.इथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे.त्याच्या पोटात एक गुहा आहे.हिलाच सदर म्हणतात.एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या.त्या गुहेला लागुनच एक धान्य कोठार.पलीकडे जीभीचा पहारा.तिथून माची पसरत गेली आहे.
या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या वैर्यांना कैदेत ठेवत असत.वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा.इथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होत असे.इथले कैदी खचुअन जात असत.पळून-जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे.
इथे कैदी ठेवण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली माहिती नाही;परंतु ज्याच्या डोक्यात आली त्याचे डोके चांगलेच सुपीक असले पाहिजे.मानसिकदृष्ट्या खचवून टाकणारे असे हे स्थानआहे.
Enhanced by Zemanta

रविवार, २७ डिसेंबर, २००९

टॅगा-टॅगी

टॅगा-टॅगी हि काय भानगड आहे हे आमच्या काही लवकर लक्षात आले नाही अगोदर परंतु २-३ ब्लॉग पोस्ट वाचल्या आणि हे काय प्रकरण आहे हे लक्षात आले.
२ दिवसापूर्वी 'मीनल' ने टॅगल त्याला लगेच उत्तर द्यायची इच्छा होती परंतु कामामुळे २ दिवस ते जमले नाही त्याची रुखरुख जरा मनात होती.आज सकाळीच 'भुंगा' ने हि टॅगल त्यामुळे याला उत्तर द्यायचे ठरवले आणि हा पोस्ट तयार झाला.

1.Where is your cell phone?
आता खिशात आहे कायम मूक असतो.(silent)

2.Your hair?
अजून सुखरूप आहेत बर का

3.Your mother?
खूप काळजी करते माझी

4.Your father?
कायम डोक्यात विचार

5.Your favorite food?
मांसाहार उत्तम आहार हा माझा फंडा आहे हा हा

6.Your dream last night?
मी पहाटे लवकर उठलोय

7.Your favorite drink?
वातावरण कस आहे यावर ठरत बघा हे

8.Your dream/goal?
स्वताची छोटी कंपनी स्थापन करायची आहे.(अवघड आहे पण अशक्य नाही मी जाणतो)


9.What room are you in?
आता दुकानात

10.Your hobby?
ट्रेकिंग,दुचाकीवर भरदाव वेगात फिरायचं,नव नवीन ठिकाणे फिरायची,वाचन अजून बराच काही आहे ओ

11.Your fear?
जेवढे मनात ठरवले आहे ते पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल का ????

12.Where do you want to be in 6 years?
स्वताच्या कंपनी ऑफिसमध्ये

13.Where were you last night?
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घेत होतो

14.Something that you aren’t diplomatic?
दोस्ती और क्या

15.Muffins?
आता हि काय नवीन भानगड?

16.Wish list item?
नवीन चार चाकीचा विचार सारखा मनात येतोय

17.Where did you grow up?
साखरवाडी-फलटण तालुका

18.Last thing you did?
व्यवसायासाठी घाऊक विक्रीचा परवाना घेतला

19.What are you wearing?
ब्लू जीन्स आणि शर्ट

20.Your TV?
BPL

21.Your pets?
नाय आवडत मला

22.Friends
जीवाला जीव देणारे खूप आहेत

23.Your life?
कट रही है

24.Your mood?
आज जरा फ्रेश वाटत आहे.

25.Missing someone?
असतात काही माणस ज्यांची आठवण येतच राहते

26.Vehicle?
RX-१००

27.Something you’re not wearing?
गौगल

28.Your favorite store?
माझ स्वताच

29.Your favorite color?
काळा कपड्यांसाठी ('भगवा' हे जरा भावनिक आहे )

30.When was the last time you laughed?
आताच भाच्याबरोबर खेळत असताना.

31.Last time you cried?
नक्की आठवत नाही

32.Your best friend?
सध्या माझा laptop

33.One place that you go to over and over?
माझे दुकान इथे रोजच यावे लागते शनिवार सोडून.

34.One person who emails me regularly?
बरेच आहेत...

35.Favorite place to eat?
जिथे मन तृप्त होईल असे कोणतेही ठिकाण आवडते.

संपल बुआ एकदाच हुश्श
हा बहुतेक सर्वात मोठा पोस्ट असेल माझ्या ब्लॉगवरील.

गुरुवार, २४ डिसेंबर, २००९

रायगड... गड बहुत चखोट

रायगड हा एक विलक्षण दुर्ग आहे.गडपती शिवाजीमहाराजांनी ज्या गडाला आपली राजधानी बनवून राज्याभिषेक केला,तो गड विलक्षण असणारच.चंद्रराव मोरयानी या गडाचा आसरा घेतला असतानाच शिवाजी महाराजांनी त्याला वेढा घातला होता.शिवाजी महाराजांनी स्वतः हा गड न्याहाळला.
Ruins of Fort Raigad, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
एका बखरीत लिहिले आहे.
'राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट,चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे,दीड गाव उंच,पर्जन्यकाळी कडीयावर गावात उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे.दौलताबाद हि पृथ्वीवर चखोट गड खरा;पण तो उंचीने थोटका.दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलिले,तख्तास जागा हाच गड करावा.'
शिवप्रभूंचा स्थपती हिरोजी इंदुलकर याने रायगडाचे बांधकाम केले.वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ
,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या.रायगडाला तीन बाजूनी उभे,उत्ताल कडे आहेत.एका बाजूने वर येण्यासाठी वाट केली आहे.त्या वाटेवरही जागोजागी दगडात कोरून पायरया काढल्या आहेत.महादरवाजा हा बालेकील्ल्याखाली सुमारे एक तृतीयांश अंतरावर आहे.शिवाजी महाराजांच्या बांधणीचे हे वैशिष्ट्य आहे.
महादरवाजाखाली दीड-दोनशे फुट अवघड चढ आहे.शत्रू दरवाजापर्यंत येईपर्यंत दमावा,अशी योजना केली आहे.या बाजूला गडाला मोठी तटबंदी आहे,मूळ तटबंदीच्या बाहेर एक वेगळीच तटबंदी बांधून गड फार मजबूत केला आहे.हि तटबंदी पार 'टकमक' टोकापर्यंत पसरत गेली आहे.त्यात एक चोरदरवाजा आहे आणि एक महादरवाजा आहे.महादरवाजा बेचक्यात आहे.दोन प्रचंड बुरुज त्याचे रक्षण करतात.अशा बांधणीला जीभी म्हणतात.
या बांधनिबद्दल रायगडाला इसवी सन १६७३ साली भेट देणारा टोमास निक्ल्सने लिहिले आहे.
'वाटेत पायरया खोदल्या आहेत.दरवाजाजवळ पायरया पक्क्या खडकात खोदल्या आहेत.जेथे टेकडीस नैसर्गिक अभेद्यता नाही,तेथे २४ फुट उंचीचा तट बांधला आहे.चाळीस फुटांवर दुसरी तटबंदी बांधून किल्ला इतका अभेद्य बनवला आहे कि,अन्नाचा पुरेसा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने तो सर्व जगाविरुद्ध लढू शकेल..!'
कड्याच्या टोकावर बांधलेली महादरवाजाची तटबंदी रायगडाला अभेद्य बनवते.शिवाजीराजांनी दुर्गबांधणीची कला आत्मसात केली होती.तटबंदीसाठी निवडलेली जागा अत्यंत उत्तम आहे.काही किलोमीटर्स लांबीची राजगडाची तटबंदी हे त्याचे,तर फक्त दीड-दोनशे मीटर्स लांब रायगडाची तटबंदी हे त्याचे वैशिष्टआहे.
Enhanced by Zemanta

सोमवार, २१ डिसेंबर, २००९

शिवनेरी-इथे जन्मला वाघ सह्याद्रीचा !

छत्रपती श्री शिवाजीमहाराजांचा जन्म ज्या दुर्गावर झाला तो शिवनेरी,'दुर्ग'म्हणून प्राचीन आहे.त्याच्या परिसरातच असलेले जीवधन,चावंड,हडसर हे दुर्ग आणि नानेघाताची दगडात कोरलेली वाट पाहताना या दुर्गांच्या प्राचीनत्वाचा अंदाज येतो.शिवप्रभूंचे बालपण शिवनेरीवर गेले.त्यांच्या काही बाललीलांचे वर्णन शिवभारत या ग्रंथात कवींद्र परमानंदाने केले आहे.छोट्या शिवाजी राजांचा घराचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडत;स्फटीकांच्या भिंतीवर पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाहून ते बोटाने दाखवून 'तू आपल्या हाताने मला दे'असे ते म्हणत असत.वाघासारखी गर्जना करून प्रेमळ दाईला भय दावत असत.मऊ मऊ माती खात असत.मुलांकडून मातीची उंच शिखरे करून 'हे गड माझे'असे म्हणत असत.
Shivaji's birthplace on Shivneri FortImage via Wikipedia
घराचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडणार्या शिवाजीराजांनी मोठेपणी आग्रा-ग्वाल्हेरपासून जिंजी-तंजावरपर्यंत घोडदौड केली.'सूर्याचे प्रतिबिंब मला आणून द्या'असे म्हणाऱ्या राजांनी मोठेपणी प्रतीपचंद्र हि मुद्रा शिरावर धरली.दाईला व्याघ्रगर्जना करून दाखवणाऱ्या राजांनी मोठेपणी औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना करून मुघलांना भयचकित केले.लहानपणी आपल्या सवंगड्याकडून मातीचे दुर्ग बांधणाऱ्या शिवाजी राजांनी मोठेपणी साल्हेर-अहिवंतापासून जिंजी-वेलोरपर्यंत दुर्गांची मोठी शृंखला उभी केली.
या अवघ्या पराक्रमाची सुरवात दुर्ग शिवनेरीवर झाली.जुन्नर नजीकचा हा दुर्ग नैसर्गिकरीत्या बुलंद असला तरी ज्या बाजूस टी अभेद्यता नाही,त्या बाजूस सात दरवाजे आणि बुलंद तटबंदी बांधून बेलाग करण्यात आला आहे.शिवनेरी या दुर्गाभोवती आणि परिसरात अनेक लेणी आहेत.
शिवनेरी या दुर्गातच ७८ विहार आणि ३ चैत्यगृह आहेत.पाण्याची ६० कुंडे आहेत.३ लेणी अपूर्ण आहेत.काही लेणी २ हजार वर्षापासूनची आहेत.तेथे कोरलेल्या ९ शिलालेखांवरून त्या लेण्यांचे प्राचीनत्व लक्षात येते.
कशी कोरली हि लेणी?कोणती हत्यारे वापरली त्या कलाकारांनी ? कोरून काढलेला दगड कोठे टाकला?कलाकार अंधारात कसे काम करत असतील?आज पुरावे नाहीत;पण अंदाज बांधता येतात.प्रकाश परावर्तीत करूनच हे काम करण्यात आले असावे;पण प्रकाशाचे परावर्तन कसे केले असावे?त्यावेळी आरसे होते का ?किंवा पाण्यावरून प्रकाश परावर्तीत करून हे लेणीचे काम केले असावे का?
शिवनेरीवर पाण्याच्या ४०-५० तरी टाक्या आहेत.काही विशाल आहेत.पाण्याचा मजबूत साठ या दुर्गावर होता.काही टाक्या बांधीव आहेत,तर काही दगडात कोरलेल्या आहेत.बाष्पीभवनाने पाणी निघून जाते म्हणून शिवनेरीच्या काही टाक्या कातळात कोरल्या आहेत.त्यावर दगडाचे छत कोरले आहे.आत पाणी स्वछच,नितळ आणि गार आहे.शिव्नेरीवरची गंगा-जमना हि टाकी अभ्यासण्यासारखी आहे.
असा हा शिवनेरी दुर्ग,जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला,तो त्यांच्या ताब्यात कधीही नव्हता.
Enhanced by Zemanta

शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

संपन्नताही बळकट ...

मागील लेखात आपण दुर्गांच्या परिभाषा व दुर्गवर्गातील शब्द,याबाबत माहिती घेतली होती.वेगवेगळ्या व्यक्तींनी किल्ल्यांबद्दल वेगवेगळे वर्णन केले आहे.
Kamalgad fort, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
जेम्स डग्लस नावाच्या इंग्रजाने 'तोरणा'किल्ल्याबद्दल म्हंटले आहे,'सिंहगड हि सिंहाची गुहा असेल,तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.'अशा प्रकारे गडकोट किल्ल्याबद्दल आपली मते प्रदर्शित केली आहे.
मुल्ला नस्त्रती नावाच्या विजापुरी कवीने 'तोरणा'किल्ल्याबद्दल लिहिले आहे,'शिवाजी राजांचाच एक अवघड गड होता,उंचीने तो आकाशापेक्षा श्रेष्ठ होता.दूरस्थ पाहणार्याला त्याची विशालता पाहून असे वाटे कि,पृथ्वी डोक्यावर घेऊन जणू आकाश उभे आहे.वसंत ॠतू गडावर नुसता मुसमुसत असतो.असे वाटते कि हवेत दुसरेच जग वसलेले आहे.गडावरील प्रत्येक गल्लीत पाण्याचा उत्तम प्रकारचा कालवा वाहत आहे.प्रत्येक ठिकाणी मिस्त्र-इजिप्त सारखी संपन्नता आहे.प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहत आहे.स्वर्गातून इंद्र उतरून अधूनमधून याच गडावर राहून आपली सुख कालक्रमणा करीत असावा.'
अशा प्रकारचे दुर्गवैभव हे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे व त्याची वैशिष्टे पाहिलीच पाहिजेत.साल्हेरच्या शैलकडा आणि खडकात कोरलेल्या जिन्यांच्या वाटा,देवगिरीच्या खंदक आणि अंधारी,अलंगची टाकी,धोडपची फोडलेली माची,हष्रची दगडांत कोरलेली वाट,अंकाई ची लेणी,हडसरचे दगडात कोरलेले दरवाजे,शिवनेरीचे सात दरवाजे,राजगडच्या माच्या व बालेकिल्ला.रायगडचे टकमक टोक,जंजीरयाचा अभेद्य बुरुज,विजयदुर्गची तिहेरी तटबंदी,लोहगडचा गेट-वे म्हणजे द्वारमंडळ आणि खंदक,परंड्याच्या तोफा,औशातील जमिनीखालच्या विहीर,पन्हाळ्यावरील कोठारे,कंधारची जीभी अशी अनेक किल्ल्यावरची वेगळी वैशिष्टे अभ्यासून पहावीत.
दुर्ग दुर्गम करावयाचे अनेक प्रकार पाहण्यात येतात.दगड वापरून दुर्ग बळकट करतातच,पण दगड काढून नह्वे; तर दगड अदृश्य करूनसुद्धा दुर्ग अभेद्य केल्याची उदाहरणे आहेत.
राजगडचे उदाहरण द्यायचे झाले,तर राजगडच्या तीन माच्या आणि अभेद्य बालेकिल्ल्याला लागलेला एकून दगड अंदाजे २० दशलक्ष टन आहे.एवढा दगड कोठून आणला,त्याच्या खुणाही तेथे नाहीत.दगडाची खाणही जवळ आढळत नाही.पाण्याच्या टाक्यातून जर दगड काढला असे म्हणावे, तर तेथून काढलेला एकून दगड अंदाजे ३ लक्ष टन एवढाच भरेल,मग उरलेला १७ लक्ष टन दगड कोठून आणला असेल?प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
दुसरे उदाहरण आहे दगड काढू टाकून दुर्ग बळकट करण्याचे.खर तर हे थोड चमत्कारिकच वाटते;पण याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगिरी.येथे दगड काढून टाकून दुर्ग बळकट केल्याचे आढळून येते.संभाजीनगर जवळ देवगिरीचा ह डोंगर आहे.किमान अंदाजे ८० लाख टन दगड डोंगरातून काढून टाकलेला आहे.खंदकाच्या तळापासून वरपर्यंत छिन्नी लावलेली उंची ५० मीटर तरी नक्कीच आहे.ऐन खंदक हि १०ते१२ मीटर खोल आहेत.या खंदकातून वर गेल्यावर पुन्हा दगड काढून एक चक्राकार वाट केलेली आहे.या वाटेला 'अंधारी'असे म्हणतात.देवगिरी दुर्गच्या खोदकामाला राष्ट्रकुंतानि सुरवात केली असावी.वेरुळच्या लेण्यांच्या खोदकामाच्या वेळेस हे खोदकाम झाले असावे.'अंधारी'चे प्रवेशद्वार त्याला साक्ष आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड काढून दुर्ग अभेद्य केल्याचे हे एक अपूर्व उदाहरण आहे.
तिसरे उदाहरण म्हणजे दगड अदृश्य केल्याचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला वाघोटन नदीच्या मुखाशी 'विजयदुर्ग' हा किल्ला आहे.तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला खुश्की असे त्याचे स्वरूप आहे.एका ठिकाणी तीन,तर एका ठिकाणी चार तटबंद्या बांधून दुर्ग बळकट केला आहे.
१९९१ मध्ये गोव्याची 'नॅशनल इंस्तिट्यूट ऑफ अशिनाग्राफी' आणि 'वेस्टर्न नेव्हल कमांड' यांनी एक संयुक्त मोहीम राबवली होती.पाणबुडे पाण्यात उतरवून त्यांनी अभ्यास केला.तेथे १२२ मीटर लांब व ७ मीटर रुंद आणि ३ ते ४ मीटर उंच अशी भिंत आढळून आली.प्रचंड आकाराच्या शिळांचा वापर तेथे त्या भिंतीसाठी केल्याचे आढळले.हि भिंत वरून दिसत नाही.म्हणजेच दगड अदृश्य आहे.१७२० च्या आसपास काही इंग्रजी जहाजे या भिंतीला आदळून फुटली.गोव्याच्या पोर्तुगीजांना इथे समुद्रात काहीतरी बांधकाम आहे याची कल्पना होती.दुर्ग अभेद्य करण्याचे हे अजोड उदाहरण आहे;पण ते अदृश्य आहे,अशी अनेक वैशिष्टे आपल्याला दुर्गकोटांच्या बाबत आढळून येतील.
या व अशा अनेक गोष्टींचा आपापल्या परीने वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी अभ्यास केला आहे.अनेक वैशिष्टे निदर्शनास आणून दिलेली आहेत.मात्र,यांची सांगड विज्ञान युगात घालणे महत्वाचे वाटते.
इतिहासकारांनी हि दुर्गांसंबंधी अभ्यास केला आहे.त्यासंबंधी सापडलेले अनेक दाखले अभ्यासलेले आहेत.दुर्ग्कोत बांधताना त्यांची वैशिष्टे काय,कोट बळकट करताना घेतलेली काळजी व रचना,नैसर्गिक वैशिष्टे,यासबंधी अनेक संशोधकांनी आपली मते वेगवेगळ्या स्वरुपात मांडलेली आहेत.
श्री.प्र. के.घाणेकर यांनी गडांची दुर्गमता व गडावर कसे जावे,काय काळजी घ्यावी,फुले व विविध वनस्पती कुठे व कशा आढळतात यासंदर्भात अभ्यासपूर्ण लेख व पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.त्याचप्रमाणे श्री.दांडेकर यांनी गोष्टीरूपात शिवसामर्थ्य,तेथील लोक,गडकिल्ले,यासंदर्भात तसेच स्वता पायी फिरून आलेले अनुभव व अनेक किल्ल्याची उत्कृष्ट छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत.गावात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या फौजेत असलेले लोक यांच्या संदर्भात अनेक आख्यायिका जिवंतपणे लोकांसमोर मांडल्याआहेत.
Enhanced by Zemanta

गुरुवार, १७ डिसेंबर, २००९

गडबांधणीस कडेकोट हवा ...

दुर्ग कितीही मजबूत असले तरी त्यांचा स्वामी दुर्गम असावा लागतो.दुर्गांचा खरा उत्तम उपयोग छत्रपती शिवाजीमहाराजांनी केला.शिवरायांनी सोनोपंतानी जी नीती सांगितली आहे. ती शिवभारताच्या सोळाव्या अध्यायात आली आहे.

The steep way down from the Tryambak darwaza. ...Image via Wikipedia


न दुर्ग दुर्गामित्येव मन्यते जनः।
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तसय दुर्गम:॥
(दुर्गाला केवळ दुर्ग म्हणून दुर्गम मानीत नाहीत,तर त्युंच स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.)
प्रभुणा दुर्गम दुर्ग प्रभूदुर्गण दुर्गम:।
अदुर्गमत्वादुगभयोव्रीद्वीषेन्नेव दुर्गम:॥
(प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू,दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो )
संतती यानि दुर्गाणि
तानी सर्वाणि सर्वथा।
यथा सदुर्गमणि स्युस्तथा
सद्योविर्धायताम॥
(तुमचे जे दुर्ग आहेत ते ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबोडतोब करा )

शिवाजी राजांनी दुर्ग दुर्गम केले.१६७२ मध्ये रोह्याहून राजापूरला गेलेल्या अबेबार्थलोमी कैरे नावाच्या एका फ्रेंच माणसाने शिवाजीमहाराजांबद्दल लिहिले आहे.
'त्यांनी त्या मुलखाच्या भूगोलाचा अभ्यास केला आहे.इथले झाड आणि झुडुपही त्यांना माहित आहे.यांनी या भागाचे नकाशे काढले आहेत.दुर्ग बांधणीची कला त्यांनी अवगत करून घेतली आहे.'

शिवाजीमहाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला तेंव्हा तो परत बांधावयास काढला. पौंडेचारीच्या फ्रेंचांनी आपला वकील जिंजीला पाठवला होता.या वकिलाने लिहिले आहे.'शिवाजी राजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला आहे.आणि बरेचसे जुने बांधकाम पाडून नवीन सुरु केले आहे.बुरुज अशा विवक्षित ठिकाणी बांधले आहेत कि,हे बांधकाम कोणी भारतीयाने केल्यापेक्षा युरोपियाने केल्यासारखे वाटते.'

महाराष्ट्रातही अतिप्राचीन दुर्ग आहेत.प्रामुख्याने नाला सोपारा ते पैठण या मार्गावरील हडसर उर्फ पर्वतगड,चांवड किंवा जुंड वा प्रसन्नगड,जीवधनगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला तो जुन्नर जवळील शिवनेरी हे दुर्ग फार प्राचीन आहेत,जीवधन,चांवड वैगेरे किल्ल्याच्या दगडात कोरलेल्या पायरया,हडसर येथील कड्यावरील खिळे,मेख ठोकून केलेली वाट व दगडातच कोरलेले भव्य प्रवेशद्वार आणि शिवनेरीभोवती कोरलेली लेणी गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात.गडांचा अभ्यास करताना गडांवर असलेली पाण्याची दगडात कोरलेली टाकी गडावर असलेल्या पनिसाठ्याविषयी माहिती देतात.जिथे पाणीसाठा मुबलक असेल,त्या गडाला विशेस महत्व असे.कारण,सैन्यासाठी ते फार उपयुक्त ठरते.

इ.स. सहाव्या शतकात लिहिलेल्या बृहतसंहितेत 'दुक्राग्रलम' म्हणजेच 'जिवंत पाण्याच्या झऱ्याचे संशोधन' या विषयावर दिलेल्या तपशिलावरून या बाबतीत कसे शोध,किती व कशी कशी प्रगती केली,याविषयीचे चित्र पहावयास मिळते.याप्रकारनावर नंतर १२०० वर्षात बर्याच टीका लिहिल्या गेल्या.त्यात थोड्या अधिक तपशिलाची भर पडली असली तरी बृहतसंहितेत असलेली मुलतत्वे अनुभवाने पटल्याची ग्वाही दिली आहे.या प्रकरणाच्या १२५ श्लोकात वृक्षांच्या वाढीवरून,कीटकांच्या अस्तीतवावरून,जमिनीच्या किंवा खडकाच्या रंगरूपावरून अथवा गुणधर्मावरून पाणी शोधण्याचा मार्ग सांगितला आहे.पाण्याचा हा शोध गिरीदुर्गांसाठी फारच उपयोगी ठरला.मुळातले दुर्गम गिरिदुर्ग पाण्याच्या सोयीमुळे अजूनच दुर्गम झाले.याचे एक उदाहरण म्हणजे सिंहगड.येथे सुमारे तीन लाख पर्यटक दरवर्षी येतात.बहुतेक सर्व देवटाक्याचे पाणी पितात.एवढा प्रचंड उपसा असूनही आजही हे देव टाक्या कोरडे पडलेल्या नाहीत.
याउलट कर्नाल्याचे उदाहरण देता येते.कर्नाळा किल्ल्यावर डोंगरात एक खोदीव टाकी आहे.त्यात पाण्यावर हवेचा दाब पडणार नाही,अशी त्या टाकीची पातळी ठेवली होती.पण एकदा टाकीच्या बाहेरील भिंतीवर वीज पडून त्यात पोकळी निर्माण झाल्याने बारमाही,सतत तुडुंब भरून राहणारे टाके पूर्णतः कोरडे पडले.पाण्याच्या झऱ्यांच्या अस्तित्वाचे तत्व सांगताना वराह मिहीर लिहितो'डोंगर,दरया,जमीन,वा दगड असो,सर्वत्र कमी अधिक झरे वाहणाऱ्या शिरा पृथ्वीत असू शकतात आणि त्या जाणण्याची साधने,निसर्गातील उत्पत्ती,स्थिती आणि लायातच दृष्टिगोचर करून घेता येतात.

अशा प्रकारे छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल त्यांच्या शाम्तेबद्दल,दूरदृष्टीबद्दल,वास्तुशास्त्र
,वास्तुरचना याबद्दल एका वेगळ्या अंगाने आजच्या युगात याबद्दलचे संशोधन होणे गरजेचेवाटते.

Reblog this post [with Zemanta]

गुरुवार, १० डिसेंबर, २००९

आपल्या गडकोटांबद्दल...( 2 )

रामायण व महाभारतातही दुर्गांविषयी चर्चा केली आहे.त्याकाळातही दुर्गांविषयी अभ्यासपूर्ण दाखले आजही आपल्याला अनुभवास येतात.
Purandar FortImage by Himanshu Sarpotdar via Flickr
शांतीपर्वामध्ये भीष्मांनी दुर्गाची महती सांगितलेली आहे.एके ठिकाणी भीष्म म्हणतात'एखादा आपल्यापेक्षा बलवान अशा राजाकडून आपल्याला त्रास होत आहे असे वाटल्यास,सुरक्षेसाठी बुद्धिमान राजाने दुर्गाचा आश्रय करावा...दुर्गाभोवती असणार्या क्षुद्र वृक्षाची मुळे तोडून टाकावीत...अश्वत्थ वृक्षाची मुळे मात्र तोडू नयेत.मोठमोठे वृक्ष असतील तर त्याच्या फांद्या तोडाव्यात.अश्वतथ दुर्गाच्या तटावर,कोण लोक येतात,कशासाठी येतात,त्याच्यासाठी त्यांच्यावर बारीक तेहलनी करण्यासाठी,त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व बाजूस किंवा चोहोबाजूंनी चौक्या ठेवाव्यात व त्यावर अतिशय शूर,चाणाक्ष लोकांचा पहारा असावा.
तटावरच्या लोकांना बाहेरच्या गोष्टी दिसण्याकरता भिंतीला झरोके असावेत.बाहेरून येणाऱ्या लोकांना आपणावर नजर आहे याची जाणीव असणार नाही.व वेळ प्रसंगी याच भोकातून तीर वैगेरेचा मारा करता येईल,अशी व्यवस्था करावी.
दुर्गाच्या भोवतालचा खंदक मासे,नक्र इत्यादींनी परिपूर्ण असावा,किंवा त्यात जागोजागी शूल उभे केलेले असावेत.नगरातल्या लोकांना संकटकाळी बाहेर निघता यावे म्हणून सूक्ष्म दरांची किंवा चोर दरवाजा-गुप्त भूयारांची योजना असावी.या दारावरही चौकी,पहारे असावेत.दुर्गाच्या जवळच किंवा अगदी थोड्या अंतरावर काही अचानक घडल्यास तातडीने सैन्याची कुमक पोचावी म्हणून सैन्याचा तळ असावा.
जेथे चिखल नसेल,पाणी जवळ नसेल,सेतू प्रकारादिकांचे भाग व ढेकळे नसतील अशाच ठिकाणी अश्वभूमी असावी किंवा तयार करावी.रथदलाला मात्र सपाट,चिखल व कुठेही शक्यतो खाचखळगे नसलेली जागा प्रशस्त म्हणजेच योग्य होय.
लहानलहान वृक्ष,अरण्य व जवळ पाणी किंवा हत्तीसाठी पुरेसे व मुबलक पाणी असलेला प्रदेश गजदलासाठी अतिशय योग्य.सभोवती डोंगराळ जागा,अनेक दुर्ग,तसेच कणक आणि देव यांनी प्रदेश युक्त असून,त्याच्या समीप पर्वत,उपवने असतील तर ती जागा पायदलासाठी प्रशस्त होय.सैन्यात पायदळ असणे सर्वदा श्रेयस्कर होय.
रामायणाचा जरी अभ्यास केला तरी त्या काळी दुर्गांची माहिती होती असे आढळून येते.
हनुमान लंकेत जाऊन आल्यावर त्याने लंकेच्या दुर्गाचे वर्णन केलेले आढळून येते गडांची निर्मिती करताना वापरलेले तंत्र,भौगोलिक परिसराचा अभ्यास,गडावर शत्रू पोचू नये म्हणून करावयाच्या उपाययोजना,अडचणीच्या वेळी गडावरून सहज निघून जाता यावे म्हणून केलेई विशिष्ट गुप्त वाट तटबंदीवरून शत्रूला हेरण्यासाठी केलेले झरोके इत्यादी गोष्टींचा अभ्यास व त्याकाळातही अतिशय कल्पकतेने निर्मिलेले दुर्ग यांचा सर्व बाजूने विचार करणे २१ व्या शतकातही अतिशय महत्वाचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा गडकोट बांधले मात्र,याच गडकोट दुर्गांच्या जोरावर त्यांनी शत्रूला नामोहरम केले.साल्हेर अहिवंतापासूनते जिंजी तंजावरपर्यंत दुर्गांची शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.
शिवप्रभू एकदा म्हणाले,आज हजरतीस३६० दुर्ग आहेत.खासा आलमगीर एक दिवस दख्खनेत उतरेल.त्यावेळेस माझा एक एक दुर्ग त्यावेळेस एक एक वारूस झुंजवेल.औरंगजेबास अख्खी दख्खन काबीज करावयास साडेतीनशे वर्षाचे आयुष्य लागेल.
शिवप्रभूंच्या मृतुनंतर औरंगजेब दक्षिणेस पुरया ताकदीनिशी उतरला आणि पुढची २६ वर्ष तो इथेच राहिला.त्या अवधीत त्याने आदिलशाही,कुतुबशाही जिंकली,२०० वर्ष चाललेल्या या शाह्या औरंगजेबाने त्या एका आचमनात गिळल्या.परंतु गडकोटानी भरलेले हे मराठा राज्य काही त्याला जिंकता आले नाही.शेवटी हतबल होऊन हा दिलीन्द्र यमालयाक्षयास गेला ते हे राज्य.
गडकोट किल्ल्याच्या जोरावर मराठी साम्राजाला जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
Enhanced by Zemanta

बुधवार, ९ डिसेंबर, २००९

आपल्या गडकोटांबद्दल....

गिरी-दुर्गांच्या पहाऱ्यातून महाराष्ट्रात गडकोट वैभव विपुल आहे.छत्रपती शिवाजीमहाराजांनी संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग असे सांगत साल्हेर अहिवंतापासून जिंजी तंजावरपर्यंत दुर्गाची एक प्रचंड शृंखला उभारून स्वराज्य सुरक्षित करून ठेवले.

दुर्गमता हा गडाचा गाभा होता.शत्रूकडे असलेल्या हत्याराच्या ताकदीवर दुर्गाची रचना अवलंबून असे.प्राचीन काळी वस्तीभोवती काटेरी झाडे टाकून वस्तीचे रक्षण करण्यात येई.नंतर लाकडाचे परकोट उभारण्यात येऊ लागले.मग दगडाची रचाई झाली.शेवटी दगड तासून पक्की तटबंदी उभारण्यापर्यंत मजल गेली.अशी तटबंदी असलेल्या ग्रामांना 'पूर' म्हणत असत.
Entrance to Karnala fort, Maharashtra, IndiaImage via Wikipedia
तरीही शत्रू बलाढ्य असेल,तर या तटबंदीयुक्त पुराचा पराभव अटळ असे. अशा वेळी गिरी-दुर्गाची रचना करण्यात आली.मात्र,असे गिरी दुर्ग बाधण्याचा खर्च अपरमित असे,परंतु संरक्षण या एकमेव कारणासाठी तो खर्च करणे अपरिहार्य असे.भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन,त्याची दुर्गमता अभ्यासून अशा ठिकाणी दुर्गाची निर्मिती केल्यामुळे किंवा दुर्ग उभारल्यामुळे शत्रूपासून संरक्षण मिळत असे.
मात्र,हेच गडकोट अधिकाधिक बलाढ्य करण्यात मनुष्याचे बुद्धीचातुर्य पणाला लागले.त्यातील बारकाव्यांचा अभ्यास केला गेला व त्यातूनच बेलाग दुर्ग उभारले गेले.परिस्थितीशी सांगड घालून अधिकाधिक दुर्गम ठिकाणी गडकोटांची उभारणी केली गेली.वास्तुरचना,स्थापत्यशास्त्र यांचा कस पणाला लाऊन अशा गडकोटांची निर्मिती झाली.
आपल्याकडील अनेक जुन्या ग्रंथांमधून दुर्गांच्या प्रकाराची माहिती मिळते.मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायात दुर्गांबद्दल केलेली चर्चा आली आहे.त्याचा आशय असा आहे-'राजाने दुर्गांच्या जवळ वसवलेल्या नगरातच आपले वास्तव्य ठेवावे.असे सहा प्रकारचे दुर्ग आहेत - १]धनुदुर्ग २] महीदुर्ग ३] अब्ददुर्ग ४] वाक्ष्रदुर्ग ५] नृदुर्ग ६]गिरिदुर्ग
ज्याच्या आजूबाजूस वीस कोसपर्यंत पाल नाही,त्यास 'धनदुर्ग' म्हणतात.
ज्याला बारा हातांपेक्षा अधिक उंच तटबंदी आहे,युद्धाचा जर प्रसंग आलाच तर ज्यावरून व्यवस्थित पहारेकर्यांना फिरता येईल,ज्याला झरोक्यानीयुक्त अशा खिडक्या ठेवल्या आहेत,अशा दुर्गास 'महादुर्ग' असे म्हणावे.
अपरिमित जलाने चोहोबाजूंनी वेढलेल्या दुर्गास 'अब्ददुर्ग' किंवा 'जलदुर्ग' अशी संज्ञा आहे.
तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसापर्यंत मोठमोठे वृक्ष,काटेरी झाडे,कळकाची बेटे आणि वेलींच्या जाळ्या यांनी वेष्टीलेल्या दुर्गास वृक्षसंबंधी म्हणजेच 'वाक्ष्रदुर्ग' म्हणतात.
गज,अश्व,रथ आणि पत्री या चतुरंग सैन्याने रक्षण केलेल्या दुर्गास 'नृदुर्ग' असे म्हणतात.
तर आसपास वर चढण्यास संकुचित मार्ग असणारा,नदी, झरे इत्यादिकांच्या जलानी व्यापलेला व धान्य निर्माण होण्यासारख्या क्षेत्रांनी युक्त असलेल्या डोंगरी गड हा 'गिरिदुर्ग' या सज्ञेस प्राप्त होतो.
२१ व्या शतकातील युवा पिढीसाठी या गडकोटांचे महत्व समजावून त्याचा अभ्यास करण्यास उदुय्क्त करण्यासाठी,त्याचे महत्व जाणून घेण्यासाठी,गडाची बांधणी करताना तो डोंगर का निवडला,त्या भोवती असलेली साधनसामग्री,तेथे राहणारे लोक,त्या भागात असलेली पाण्याची व्यवस्था,तेथून मिळणारे शेताचे उत्पन्न या गोष्टींचा निश्चितच विचार करून गडांची बांधणी कशी झाली त्यासाठी गडाची एका वेगळ्या माध्यमातून ओळख करून देण्यासाठी हि लेखमाला सुरु करीत आहे.
हि माहिती विविध वर्तमानपत्रातून कात्रणे करून मिळवलेली असून ती माझ्याकडे खूप वर्षापासून आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे.
जय शिवराय !
Enhanced by Zemanta

गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

चीनच्या सीमेवर दक्षता बाळगावी- लष्करप्रमुख

‘ईशान्य सीमेवर चीनकडून केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे काणाडोळा करून चालणार नाही. अंतर्गत व बाहय़सुरक्षेबाबतचे संभाव्य धोके लक्षात घेता चीनच्या सीमेवर दक्षता बाळगण्याची गरज आहे,’ असे मत लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी व्यक्त केले. ‘पाकिस्तानमधील आण्विक धोरणाचे नियंत्रण विघातक घटकांकडे जाणार नाही, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे,’ असे जनरल कपूर म्हणाले.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ११७ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनरल कपूर उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख अ‍ॅडमिरल आर. के. धोवान आदी या वेळी उपस्थित होते. कॅप्टन एम. एम. मरकाळे यांना या वेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.संचलनानंतर माध्यमांशी संवाद साधताना जनरल कपूर म्हणाले, की ‘अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी आंतरराष्ट्रीय करार, देखरेख करतानाच एखाद्या देशाकडील आण्विक प्रकल्पाची सूत्रे विघातक शक्तींकडे जाणार नाहीत, याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. चीनच्या सीमेबाबत काळजी करण्यासारखी स्थिती नाही. परंतु, सीमेपलीकडे चीनकडून केली जाणारी पायाभूत सुविधांची उभारणी, लष्कराच्या सक्षमीकरणासाठीची जुळवाजुळव यांच्याकडे काणाडोळा करून चालणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळय़ामध्ये बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी घुसखोरीमध्ये वाढ होते. यंदाही तशाच प्रकारचा धोका असून त्याला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत.’‘अतिप्रगत, तंत्रज्ञानाधारित युद्धप्रणालीच्या जोरावरच यापुढील काळातील युद्धे लढली जाणार आहेत. त्यामुळेच संरक्षण प्रशिक्षण संस्थांमधील कॅडेटने नेतृत्वगुणांबरोबरच तंत्रज्ञानाधारित युद्धप्रणालींचे ज्ञान-कौशल्यही आत्मसात करण्याची गरज आहे,’ असा सल्ला जनरल कपूर यांनी दिला.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९

हुतात्मा मराठी-अमराठी असतात का ????

काल रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे नेटवर होतो. ओर्कुटवर होतो, माझा आवडता समूह 'मुक्तपीठ' यावर टाइमपास करत बसलो होतो.
बसल्या बसल्या समूहातील धागे चाळत होतो आणि रात्री एका सभासदाने एक नवीन धागा सुरु केलेला दिसला.
धाग्याचे शीर्षक होते 'MNS hoarding forgets non-Marathi heroes' आणि मला थोडे आश्चर्य वाटले आणि थोडा धक्का हि बसला.(http://news.rediff.com/report/2009/nov/26/anniversary-26-11-mns-hoarding-forgets-non-marathi-heroes.htm)
ती बातमी रेडीफ संकेतस्थळावरील होती त्यात असे नमूद केले होते कि मनसे कार्यकर्त्यांनी २६/११ तील शहिदांच्या श्रद्धांजलीसाठी जे पोस्टर्स लावले होते त्यात फक्त मराठी असणार्या शहीदांचीच छायाचित्रे लावण्यात आली होती अमराठी शहिदांची नाही. हे वाचून आणि पाहून मला खरच धक्काच बसला.
जे देशासाठी आपल्या मुंबई,महाराष्ट्रासाठी हुतात्मा झाले ते मराठी-अमराठी कसे धरू शकतात ?


शहीद उन्नीकृष्णन आणि बिश्त हे स्वर्गातून म्हणत असतील यासाठीच केले होते का बलिदान ?कि स्वर्गात सर्व मराठी शहिदांची छाती या गोष्टीने गर्वाने फुलली असेल ?
हि गोष्ट ज्या कोणी कार्यकर्त्याने केली असेल त्यामुळे तळपायाची आग मस्तकात जाते तसेच त्याच्या बुद्धीची कीव येते.
यामध्ये त्या पक्षाचा दोष नसेल असे समजून जरी चाललो तरी अशा गोष्टी घडू नयेत याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे आणि अशा कार्यकर्त्यांना समज द्यायला हवी.

निदान अशा ठिकाणी तरी मराठी अमराठी हा वाद आणू नये.जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा अश्या सगळ्या बाजूला ठेवून पहिला विचार देशाचा व्हायला हवा ..................देशासाठी शहीद होणारा प्रत्येक वीर हा प्रथम भारतीय असतो ..तो कुठल्याही धर्म जात किंवा प्रांताचा नसतो !!!!

जय हिंद
जय महाराष्ट्र
Reblog this post [with Zemanta]

बुधवार, २५ नोव्हेंबर, २००९

आयुर्वेदाच्या इतिहासात

आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे समजावे? यावर गुरुंनी उत्तर दिले की बागेत काम करण्याची खुरपणी घेऊन चारही दिशांनी प्रवास कर व जे औषधी नाही असे द्रव्य घेऊन ये.
जीवक निघाले, काही दिवसांनी परत येऊन म्हणाले, आचार्य मी चारही दिशांना खूप फिरलो पण मला औषधी नाही असे काहीच सापडले नाही. यावर गुरु म्हणाले, तुझे शिक्षण पूर्ण झाले. पुढे हेच वैद्य राजवैद्य झाले.

ही गोष्ट इथे सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याही घरात, आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्या

meditationImage by HaPe_Gera via Flickr

चे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार याप्रमाणे होत.

उन्हाळ्यात पाणी पिऊनही समाधान होत नाही, ओठ, घसा कोरडे पडतात, हातापायाच्या तळव्यांची आग होते, अशावेळी साधारण एक लिटर पाण्यात दोन सुके अंजीर, मुठभर मनुका आणि दोन चमचे धने घालून हे सर्व मिश्रण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रवीने घुसळून, गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यायल्यास ऊन्हाळ्याचे त्रास कमी होतात. ऊन्हाळ्यामधे थकल्यासारखे वाटते तेही कमी होते.

उन्हाळ्यामधे द्राक्षे मिळतात. द्राक्षांचा रस हा उन्हाळ्यातील ऊष्णता कमी करण्यासाठी उत्कृष्ट असतो. द्राक्षाच्या रसात चिमुटभर जीरेपुड आणि चिमुटभर बडिशेपेची पूड टाकुन प्यायले असता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातु पुन्हा टवटवीत होतो. द्राक्षे वार्याने थंड असल्याने अंगाचा दाह, मूत्राचा दाह वगैरे लक्षणे कमी होतात.

बऱ्याच व्यक्‍तींना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे वगैरे त्रास होतात. संगणकावर वा प्रखर प्रकाशात काम करणाऱ्यांना तर उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवणे उत्तम असते. शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा न तापवलेल्या कच्च्या, थंड किंवा तापवून गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.

* उन्हाळ्यात लहान मुलांना तसेच त्वचा असणाऱ्यांना घामोळे येताना दिसते, यावर खरबूजाचा गर लावण्याचा उपयोग होतो.

* उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ होत असल्यास दुधीचा कच्चा कीस बांधून ठेवण्याचा तसेच दूर्वांच्या लॉनवर अनवाणी चालण्याचा उपयोग होतो.

* उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्यक्ष उन्हात जाण्याचे टाळणेच हितकर असते. पण उन्हात जावे लागलेच तर उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये, त्वचा काळवंडू नये यासाठी चेहरा, हात वगैरे उन्हाचा संपर्क आलेल्या ठिकाणी घरचे ताजे लोणी चोळणे उत्तम असते.

* उन्हाळ्यात लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे वगैरे लक्षणे असल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास लघवीला साफ होऊन बरे वाटते.

* उष्णता बाधू नये म्हणून उन्हाळ्यात शीतल द्रव्याची उटणी लावावीत असे आयुर्वेदात सुचविले आहे. अनंतमूळ, वाळा, चंदन, ज्येष्ठमध वगैरे शीतल, सुगंधी व वर्णात हितकर द्रव्यांचे चूर्ण व मुगाच्या डाळीचे पीठ यापासून तयार केलेल्या उटणे लावून स्नान करणे उन्हाळ्यात उत्तम होय.

उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होत असते. शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट असते.

* गवती चहा, आले, तुळशी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतबंध होतो व पचनशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते.

* ओवा, तीळ, ज्येष्ठमध, सैंधव वगैरे द्रव्यांपासून बनविलेली सुुपारीपावसाळ्यात जेवणानंतर खाणे हितावह असते, याने पचनाला मदत होते.

* पावसाळ्यात पुदिना हे सुद्धा मोठे घरगुती औषध आहे. जेवणात पुदिन्याची ताजी पाने, काळी द्राक्षे, जिरे, हिंग, सैंधव, मिरी यापासून बनविलेली चटणी खाण्याचा उपयोग होतो. याने तोंडाला रुची येते, शिवाय पचनास मदत मिळते.

* दुपारच्या जेवणानंतर किसलेले आले व पुदिन्याचा रस टाकून ताक घेण्यानेही पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. विशेषतः जुलाब, आव वगैरे त्रासांना प्रतबंध होतो.

* पावसाळ्यात वातदोष वाढतो. वात वाढला की त्यापाठोपाठ दुखणेआलेच. संधिवात, आमवात वगैरे दुखणे असणाऱ्यांना याचा अनुभव येतोच. अशा व्यक्‍तींनी व इतरांनीही पावसाळ्यात सुंठ-गूळ-तूप यापासून बनविलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते. याने वातदोष नियंत्रित होण्याबरोबर पचनालाही मदत मिळते.

* पावसाळ्यात भूक लागत नसली, पोट जड वाटत असले, गॅसेस अडकून राहिले आहेत असे वाटत असले तर लिंबू व आल्याच्या रसाच्या मिश्रणात थोडी जिरे पूड व सैंधव टाकून तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटणे उत्तम असते.

* हिंग्वाष्टक नावाचे चूर्ण पावसाळ्यात उत्तम होय. त्रास असो वा नसो, प्रकृतीनुसार पाव ते अर्धा चमचा चूर्ण व थोडेसे तूप भाताच्या पहिल्या घासाबरोबर घेण्याने भूक लागायला मदत होते, अन्न व्यवस्थित पचते.

* पावसाळ्यात तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हितावह असते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरणे अधिक हितावह असते.

* जंत होऊ नयेत व झालेले जंत नष्ट व्हावेत यासाठी उपाययोजना करणे एरवीही चांगले असते. पावसाळ्यात मात्र याकडे विशेषतः द्यावे लागते. त्यादृष्टीने महिन्यातून आठ दिवस सकाळी चमचाभर वावडिंगाचे चूर्ण मधासह घेणे चांगले असते. कढीलिंबाची ताजी पाने वाटून केलेली गोळी अधून मधून घेण्याचाही उपयोग होतो.

* पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध होण्याच्या दृष्टीने घर, ऑफिस, दवाखाने वगैरे सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे धूप करणें उत्तम असते. यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, कापूर, ऊद वगैरे द्रव्यांचे मिश्रण वा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येतो.

पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी येणाऱ्या शरद ऋतूत पुन्हा एकदा पित्त वाढत असते किंबहुना पित्ताचा प्रकोप ह्याच काळात होत असल्याने उन्हाळ्यात घ्यायची काळजी पुन्हा या दिवसात घेणे आरोग्यरक्षणासाठी चांगले असते.

तसे पाहता हिवाळा हा आरोग्यदायक काळ असतो. या दिवसात अग्नी प्रज्वलित होतो, शरीरशक्‍ती आपोआपच वाढते. थंडीचा त्रास होऊ नये व निसर्गतः वाढणाऱ्या शरीरशक्‍तीला घरगुती उपायांची जोड मिळून ताकद कमवून ठेवता यावी यासाठी निश्‍चित प्रयत्न करता येतात.

* हिवाळ्यात नियमित अभ्यंग करणे उत्तम असते. यामुळे थंडीचे निवारण होते व शरीरशक्‍ती वाढायला मदत होते.

* थंडीमुळे त्वचा कोरडी होण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी अगोदर अंगाला तेल लावून नंतर अगरू, जटामांसी, केशर, वगैरे द्रव्यांनी युक्‍त “सॅन मसाज पावडर’सारख्या उटण्याने स्नान करण्याने हिवाळ्यात उत्तम असते.

* थंडीमुळे सर्दी, खोकला होऊ नये, तसेच शरीरात कफदोष साठू नये यासाठी हिवाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा टाकणे चांगले असते.

* हिवाळ्यात जेवणानंतर त्रयोदशी विडा म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेला विडा खाण्याचाही उपयोग होतो. याने अतिरिक्‍त कफदोष कमी होऊन पचन चांगले होते.

* हिवाळ्यात बदामाची खीर खाणे चांगले असते. रात्री चार बदाम भिजत घालावेत, सकाळी साले काढून बारीक वाटावेत व दुधात कालवून थोडे आटवावे. यात खडीसाखर व थोडे तूप टाकून तयार झालेली खीर सकाळी खावी.

* डिंकाचे लाडू, कोहळेपाक, गव्हाची खीर आदी धातुपोषक पदार्थांचा आहारात समावेश करणेही हिवाळ्यात हितकर असते.

(By Mail)

Reblog this post [with Zemanta]

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

फॉरेक्‍स ट्रेडिंग

जागतिक मंदीने आज जवळपास सर्वच उद्योग-व्यवसाय अडचणीत आले असून, बाजारातील उलाढाल मंदावल्याचे चित्र आहे. उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार मंडळी सर्वच जण मंदीमुळे हवालदिल झाले आहेत. शेअर बाजार दोलायमान स्थितीत आहे. अशा काळात एक व्यवसाय मात्र वेगाने विस्तारत आहे आणि तो म्हणजे "ऑनलाइन फॉरेक्‍स ट्रेडिंग' अर्थात परकी चलनाचा व्यवहार!


जगभरातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना आज मजबूत चलनामध्ये व कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित वाटत आहे. डॉलर व्यतिरिक्त पौंड, युरो, येन अशा अनेक चलनांमध्ये व सोने, चांदी, कच्चे तेल अशा कमोडिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
आपला देशामध्ये मात्र "फॉरेक्‍स ट्रेडिंग' या व्यवसायाबद्दल अजूनही तितकीशी माहिती नाही. या लेखामधून आपण "फॉरेक्‍स ट्रेडिंग' हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करू या.
फॉरेक्‍स ट्रेडिंग म्हणजे काय?
"फॉरेन एक्‍स्चेंज' या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजे "फॉरेक्‍स' होय. "फॉरेक्‍स ट्रेड'ला "करन्सी ट्रेड' अथवा परकी चलनाचा व्यापार असेही म्हणतात. पूर्णतः ऑनलाइन स्वरूपाचा हा व्यापार २४ तास अविरतपणे जगभर सुरू असतो. जगभरातील विविध बॅंका, गुंतवणूकदार, मार्केटमेकर हे एका चलनाच्या बदल्यात दुसरे एखादे चलन घेतात अथवा विकतात व किमतीमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या चढउतारांतून चांगला नफा कमावत असतात. यामध्ये "स्पॉट ट्रेड' व "फ्युचर ट्रेड' अशा दोन पद्धतीने कामकाज चालते. स्पॉट व्यवहारांमध्ये जास्तीत जास्त काम होते.
"फॉरेक्‍स'कडे कल का वाढत आहे?
"फॉरेक्‍स मार्केट'ची कार्यपद्धती थोड्याफार प्रमाणात शेअर बाजाराप्रमाणेच असते. "फॉरेक्‍स मार्केट'ची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१) परकी चलनाच्या भावात व त्यातल्या त्यात डॉलर, युरो, येन, पौंड यासारख्या प्रमुख चलनांच्या दरांमध्ये (शेअर बाजाराप्रमाणे) अचानक मोठे चढउतार होत नाहीत. ठराविक अशा एका पातळीतच व्यवहार घडत असतात. त्यामुळे यात तुलनात्मकदृष्ट्या धोका कमी असतो.
२) चोवीस तास चालणारे मार्केट असल्याने आपल्या सवडीनुसार केव्हाही काम करणे शक्‍य आहे. त्यातल्या त्यात भारतीय वेळेनुसार सायंकाळी चार-पाच वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत व्यवहार करणे जास्त चांगले ठरते.
३) "मार्जिन'च्या सोयीमुळे मोठी गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता नसते. केवळ एक टक्का "मार्जिन'वर (अर्थात १०० पट लिव्हरेजिंग) काम सुरू असते. अगदी पन्नास हजार अथवा लाखभर रुपयांच्या भांडवलावर काम सुरू करता येते व आपल्या गुंतवणुकीच्या अनेक पट नफा कमविणे शक्‍य होते. (मार्जिन ट्रेडिंगमुळे नुकसानीचे प्रमाणही मोठे असू शकते, हे समजावून घेणेसुद्धा आवश्‍यक आहे. "स्टॉपलॉस'चा योग्य वापर केल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.)
४) "शॉर्ट सेलिंग'च्या सोयीमुळे दर घसरत असतानाही नफा कमविणे शक्‍य होते.
५) फॉरेक्‍ससोबतच त्याच खात्यामधून सोने-चांदीसारख्या कमोडिटीजच्या आंतरराष्ट्रीय बाजारात काम करणेसुद्धा शक्‍य होते.
६) बाजाराचे स्वरूप व आवाका लक्षात घेता चलनाचे भाव "मॅनिप्युलेट' करणे अथवा काही गडबड-घोटाळा करणे शक्‍य नसते. त्यामुळे चढ-उतारांचे आडाखे बांधताना टेक्‍निकल ऍनालिसिससारखे शास्त्र प्रभावीपणे काम करताना दिसते.
"फॉरेक्‍स'चे व्यवहार कोठे घडतात ?
"ओटीसी' म्हणजे "ओव्हर द काउंटर' स्वरूपात "स्पॉट फॉरेक्‍स'चे व्यवहार होत असतात. अर्थात, कोणत्याही एखाद्या एक्‍स्चेंजवर हे व्यवहार होत नसतात, तर जगभरातील अनेक बॅंका; तसेच गुंतवणूकदार, मार्केटमेकर किंवा ब्रोकरच्या माध्यमातून इंटरनेटवरून एकमेकांशी हे व्यवहार होत असतात. "फॉरेक्‍स फ्युचर्स'चा व्यापार मात्र मुख्यतः न्यूयॉर्क एक्‍स्चेंज माध्यमातून होत असतो. इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस कमिशन (आयएफएससी), फायनान्शियल सर्व्हिसेस ऍथॉरिटी (एफएसए)सारख्या आंतरराष्ट्रीय नियामक संस्था "फॉरेक्‍स'च्या सर्व व्यवहारांचे नियमन करीत असतात. भारतात सेबी व रिझर्व्ह बॅंक हे काम करतात.
आता फॉरेक्‍स व कमोडिटी मार्केटमधील व्यवहारांचे प्रत्येकी एक उदाहरण पाहू.
या ठिकाणी आपण फॉरेक्‍स ऐवजी प्रथम कमोडिटी बाजारातील (सोन्याचे) उदाहरण घेऊ जेणेकरून नवख्या लोकांना समजण्यास सोपे जाईल.
समजा, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव एका ट्रॉय औन्ससाठी ९१० डॉलर इतका आहे. लॉट साईजनुसार किमान १०० ट्रॉय औन्स घ्यावे लागतात. म्हणजे ९१ हजार डॉलर एवढे एका लॉटचे मूल्य होते. त्यासाठी फक्त एक हजार डॉलर किंवा अंदाजे ५० हजार रुपये एवढे मार्जिन भरावे लागते.
समजा, राजेशकुमार नावाच्या एका व्यापाऱ्यास असे वाटते, की सोन्याचा भाव आज वर जाण्याची शक्‍यता आहे. राजेशकुमार अर्थातच मग सोन्याचा एक लॉट खरेदी करतो. आता सोन्याच्या भावात एका डॉलरची वध-घट झाल्यास राजेशकुमारला संपूर्ण लॉटमागे १०० डॉलरचा नफा अथवा तोटा होईल. (कारण भाव ९१० वरून ९११ झाल्यास लॉटचे मूल्य ९१ हजार वरून ९१,१०० डॉलर होते.) सोन्याच्या भावात दिवसभरात साधारणतः पंधरा-वीस डॉलरचा चढ-उतार होत असतो. त्यामध्ये एक-दोन डॉलरच्या हालचालीचादेखील व्यवस्थितपणे लाभ (एनकॅश) उठविता आला, तरी शंभर-दोनशे डॉलर म्हणजेच पाच ते दहा हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीच्या तुलनेत हा फायदा फारच मोठा आहे.
आता फॉरेक्‍स ट्रेडिंगमधील एक व्यवहार बघू.
समजा युरो-डॉलर या "करन्सी पेअर'चा १.३२१२ असा दर आहे. अर्थात एक युरो खरेदी करण्यासाठी १.३२१२ डॉलर लागतात, असा त्याचा अर्थ होतो. यातील शेवटच्या अपूर्णांकास एक पिप असे म्हणतात. म्हणजे ०.०००१ = १ पिप
समजा, राजेशकुमार नावाच्या व्यापाऱ्यास असे वाटते, की युरोचा भाव डॉलरच्या तुलनेत आज वर जाण्याची शक्‍यता आहे. राजेशकुमार अर्थातच युरोचा एक लॉट खरेदी करतो. एक लॉट म्हणजे १ लाख करन्सी युनिट्‌स. त्यासाठी त्याला मार्जिन भरावे लागते फक्त एक हजार डॉलर (म्हणजे १०० पट लिव्हरेजिंग किंवा एक टक्का मार्जिन).
आता युरोचा भाव एक पिपने वाढला म्हणजे १.३२१२ वरून १.३२१३ झाला, तर राजेशकुमारला १० डॉलरचा नफा होईल. १० पिपने वाढला (अथवा घटला) तर १०० डॉलरचा नफा (अथवा तोटा) होईल. दिवसभरात सामान्यतः शंभर-एक पिपची हालचाल सहज होताना दिसते.
अवघ्या पन्नास हजार रुपयांत सुरवात करता येणारा हा व्यवसाय सुज्ञपणे व अभ्यासपूर्ण पद्धतीने केल्यास चांगली कमाई करून देऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे सवडीप्रमाणे व सोयीप्रमाणे दिवसभरात कोणत्याही वेळी काम करता येते. बेरोजगार तरुण असो, सेवानिवृत्त नागरिक असो अथवा अर्धवेळ व्यवसाय करू इच्छिणारे व्यावसायिक, उद्योजक वा गृहिणी असो, मध्यमवर्गीय असो वा उच्चभ्रू सर्वांना करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे.
केवळ एक संगणक अथवा विंडोज एनेबल्ड मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्‍शनची गरज यासाठी भासते. योग्य ब्रोकरची निवड करणे हेही यामध्ये महत्त्वाचे ठरते. मागणी-पुरवठा विश्‍लेषणाचे ज्ञान व थोडीशी समयसूचकता, सतर्कता यांचा योग्य ताळमेळ साधल्यास "फॉरेक्‍स ट्रेडिंग' हा अतिशय चांगला व्यवसाय ठरू शकतो.
- नितीन देशमुख, नाशिक
(
सकाळ वृत्तसेवा)

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

दिपावली

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

wishing you all a happy & prosperous diwali...Image by ayashok photography via Flickr





धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झेंडू शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.



नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.



लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)
या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.



पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)
बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.


भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.

Diwali Deep.Image via Wikipedia


हि दिपावली
घेवुन येवो तुमच्यासाठी,

सुख शांति, समृध्दीची,
लक्ष उधळण दिव्यांची!!

Reblog this post [with Zemanta]