रविवार, २७ सप्टेंबर, २००९

दसरा एक सुदिन

भारतीय प्रत्येक सणाला सामाजिक,सांस्कृतिक महत्व आहे त्याला दसरा हि अपवाद नाही.दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेल्या विजयाच स्मरण म्हणून दसरा साजरा केला जातो.
मराठ्यांनी दसर्याच्या मुहर्तावरच राज्याच्या सीमा ओलांडून देशाच्या विविध भागावर आपले निशाण फडकावले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने दसर्याचे विशेस महत्व आहे.

साडेतीन मुहर्तापैकी एक दसरा हा एक महत्वाचा मुहर्त आहे.नवरात्रीचे ९ दिवस देवीचा जागर केल्यानंतर विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. याच दिवशी मोठ्याप्रमाणात लोक आपल्या नवीन कामाचा शुभारंभ जादाकरून करतात.

प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवण्यासाठी देवीची पूजा केली होती.रावणाचा वध के

Dasara Idol from Kundurumotte TempleImage via Wikipedia

ल्यावर त्याच्या आनंदप्रीत्यर्थ विजयादशमी वा दसरा साजरा केला जातो.त्यामुळेच हा सण दुर्जनांवर सज्जनांनी मिळवलेला विजय याचे प्रतिक आहे.
महिषासुर्मादिनीने महिषासुराचा वध केला याचे प्रतिक म्हणून हि हा सण साजरा केला जातो.

कोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.
'पवित्र सुदिन उत्तम दसरा' असा अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे.

अशा या दसऱ्याच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छ्या.
या निमित्ताने समाजातील दृष्ट प्रवृतींवर चांगल्या वृतींचा विजय होवो हीच आई जगदंब चरणी प्रार्थना.

दसऱ्यानिम्मित पुन्हा सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा ...सोने घ्या सोन्यासारखे रहा.

Reblog this post [with Zemanta]

३ टिप्पण्या: