मंगळवार, ५ जानेवारी, २०१०

आजची स्वार्थी पत्रकारिता

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शिवसेनाप्रमुखांचा राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा योग साधून 'मातोश्री' निवासस्थानी गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'मराठी बाण्याची पत्रकारिता जगवा' असे आवाहन केले.मराठी बाण्याची म्हणजे लोकमान्य टिळक,केळकर,गोपाल गणेश आगरकर,परांजपे,बाळशास्त्री जांभेकर यांनी लेखणीच्या ताकदीवर लोकहिताचा जो वारसा चालवला,तो सध्याच्या पत्रकारांनी पुढे न्यावा असे त्यांना म्हणायचे होते.

A few popular Marathi newspapersImage via Wikipedia


आज ती जुनी पत्रकारिता खरच शिल्लक राहिली नाही . आजची पत्रकारिता तर मला ढोंगी वाटते यात काही अपवाद हि असू शकतात परंतु स्वताला पुरोगामी सेक्युलर समजणारे आजचे पत्रकार स्वतः मात्र स्वार्थीपणाने वागताना दिसतात.
शाहू-फुले-आंबेडकर यांचे समतेचे तत्त्वज्ञान दुसर्यांना उगळून उगळून पाजणारे आजचे पत्रकार स्वतःच समतेच्या तत्त्वज्ञानवर बोळा फिरवताना दिसले पण कोण्याचा ते लक्षात आले नाही.

काही दिवसापूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पत्रकारांनी कामकाजावर बहिष्कार घालण्याची धमकी देऊन दडपण आणले होते.विरोधी पक्षांनीहि त्याला समर्थन देऊन पत्रकारांवरील हल्ल्यांना पायबंद घालण्याची मागणी केली.शेवटी मुख्यमंत्र्यांनी धरण्याला सामोरे जाऊन पत्रकार सुरक्षेसाठी नवा कायदा करायचे आश्वासन दिले.
पत्रकारांवरील हल्ल्याला 'नाजामीन' गुन्हा ठरवण्याचा त्यात आग्रह होता.अविष्कार स्वातंत्र्य,लेखन स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य असली लेबले लावून हा विशिष्ठ वर्ग काय मागणी करत आहे याचा विचार न राज्यकर्त्यांनी केला न विरोधकांनी केला. राजकारणी हे सत्ता व प्रसिद्धीचे लाचार असतात असे समजले तरी दुसर्यांना समतेचे डोस देणार्यांना स्वताचे समतेचे तत्त्वज्ञान लक्षात राहिले नाही का ?


शाहू-फुले-आंबेडकर या समाजसुधारकांनी समता या शब्दासाठी किंवा त्याचे थोतांड माजवण्यासाठी संघर्ष केला नव्हता.समाजातील विषमता संपवायला आणि त्यातून खर्या अर्थाने समता प्रस्थापित करण्यासाठी आपले आयुष्य वेचले होते.कायदा,न्याय,जीवन,संधी,सुविधा अशा सर्व बाबतीत समान वागणूक असाच समतेचा अर्थ नाही का ? प्रतिष्ठाना एक आणि बाकीच्यांना दुसरा न्याय असा त्यांच्या समतेचा अर्थ नाह्वता.
त्यांच्या काळात असेच होते आणि तीच विषमता मोडून काढण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले ना ?

मग आजचे पत्रकार व प्रतिष्ठीत बुद्धिवंत काय मागत आहेत ? पत्रकारांवर हल्ला झाल्यास नाजामीनपात्र गुन्हा याचा अर्थ समजातल्या पत्रकार नाहीत त्यांच्यावर हल्ला झाल्यास जामीनपात्र गुन्हा असाच ना ?
खास पत्रकारांना,कलावंत,लेखकांना,नाटककारांना,बुद्धिमंत प्रतिष्ठाना वेगळी वागणूक व इतर सामान्य लोकांना पक्षपाती वागणुकीची मागणी समतेच्या तत्त्वज्ञानला सुरुंग लावणारी नाही का?
इतरांना कुणीही कसेही मारावे,त्याला किंमत नाही.पत्रकाराला हात लागला;मग ब्रम्हहत्त्या होते हे असेच ना ?
आश्चर्य आहे ना पुरोगामी महाराष्ट्राची,फुले-आंबेडकरांच्या समतेची जपमाळ ओढणारे सेक्युलर पत्रकार,संपादकच आपल्यासाठी वेगळ्या तरतुदीची मागणी करत आहेत.आणि तसेची निवडणुकीत समतेची जपमाळ ओढणारे राजकारणी त्याला पाठींबा देत आहेत.आणि अशावेळी बाकी आंबेडकरवादी,फुलेवादी चळवळीचे म्होरके समतेचा जागर करणारे कोठे गेले आहेत? त्यांना हि विषमता दिसत नाही का ?

पत्रकार हा कोणी आभाळातून पडलेला प्रेषित नाही.पत्रकार हे हि याच समाजाचे एक घटक आहेत.पत्रकारिता म्हणजे फार मोठे उदात्त कार्य असल्याचा आव आणण्यात अर्थ नाही.
वैद्यकीय,वकिली,व्यापार,विविध सेवा याप्रमाणेच पत्रकारिता हा एक समाजोपयोगी पेशा आहे.बाकीच्यासारखाच पत्रकार हा पोटापाण्यासाठी बौद्धिक कष्ट घेणारा कर्मचारी वर्ग आहे.
पायलटला अपघाताची,पोहणाऱ्याला बुडण्याची,पोलिसांना संतप्त जमावाच्या प्रतिक्रियेची भीती असते. त्याला( proffesional Hazard ) व्यावसायिक धोका म्हणतात.त्याप्रमाणेच पत्रकाराला,कलावंताला लोकांच्या नाराजीपासून धोका असू शकतो. पण हे कधी ?
चुकीचे उपचार झाल्यावर डॉक्टर किंवा बेफाम वाहन चालवल्यावर चालक रागाची शिकार होण्याचा धोका असणारच ना.
पत्रकारांनीही ती मानसिक तयारी करून या व्यवसायात उतरावे . जसा चांगला चालक,डॉक्टर लोकांच्या आदराचे स्थान बनतो तसा एक पत्रकारही आदराचे स्थान बनू शकतोच ना ?
पत्रकाराने कृतीतून समाजउपयोगी,लोकहिताची कामे केली तर ते लोकांसाठी श्रद्धास्थान बनतात.अशी अनेक उदाहरणे आपणास पाहण्यास मिळतील. फुले,टिळक,आगरकर यांच्यापासून अत्रे ,खाडिलकर अशी कितीतरी उदाहरणे पाहता येतील.
यांच्यापैकी किती जणांनी कायद्याचे संरक्षण मागितले होते ?मग आताच हि वेळ का आली ?आम्ही सामान्य लोकांपेक्षा वेगळे आहोत आम्हाला सामान्य लोकांसारखे कायदे नकोत असेच यांना सांगायचे आहे का?
गडगंज पगाराची नोकरी,ऐषआरामात जगत आजचे पत्रकार आपण समजाउपयोगी काम करत आहोत असा आव आणत आहेत हे ढोंग नाही का ? आपण आणि आपला पेशा फक्त पवित्र बाकी सगळे क्षुद्र असे यांना यातून भासवायचे आहे.
वागळे आणि त्याच्यासारख्या पत्रकारांकडे पाहिल्यावर काय दिसून येते. ते दुसर्याच्या इशार्यांवर नाचतात,चालतात,बोलतात आणि प्रतीव्रतेचा आव आणतात. यांना खरी पत्रकारिता कळली कि नाही कि असा प्रश्न पडतो.
असो आपणा सर्वाना पुन्हा तीच जुनी निर्भीड आणि समाजउपयोगी पत्रकारिता पाहण्यास मिळो.

जय महाराष्ट्र!


Reblog this post [with Zemanta]

११ टिप्पण्या:

  1. बर्‍याच वर्षांपुर्वी दुरदर्शनवर "रिपोर्टर" नावाची मालिका यायची. छान होती. अगदी निर्भिड पत्रकार काय करु शकतो याचं उदाहरण. पण काही दिवसांतच बंद झाली/ करवली गेली.
    निर्भीड आणि समाजउपयोगी पत्रकारिता आता दुरापास्त झाली आहे, हेच खरं!

    उत्तर द्याहटवा
  2. @भुंगा
    हो हि खंतच म्हणा ना कि निर्भीड आणि समाजउपयोगी पत्रकारिता आता दुरापास्त झाली आहे :(

    उत्तर द्याहटवा
  3. छान लिहलं आहे. सर्व मुद्द्यांना अनुमोदन. ह्याच विषयावर अमिताभचा रण येतोय. पाहु कसा आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. @सिद्धार्थ

    धन्यवाद साहेब
    मी सुद्धा ऐकून आहे रण बद्दल पाहू काय आहे त्यात :)

    उत्तर द्याहटवा
  5. मस्त लिहले आहे... अगदी मनोमन पटले...

    हे हि वाचा..

    निखिल वागळेंची पत्रकारिता?

    http://sachingandhul1.blogspot.com/2009/11/blog-post.html

    उत्तर द्याहटवा
  6. namaste... meri hindi itni achchi nahin hain lekin koshish kartha

    hoon :-)

    aapki ek help chahiye thi... mein indiblogger me ek contest me

    bhaag le raha hoon aur aapki vote ki bohut zaroorat hain..
    krupya zaroor vote karein...

    http://digs.by/c6CRNr

    bahut bahut dhanyavaad... bahut mehebaani hogi...

    उत्तर द्याहटवा
  7. namaskar krupa karun yat pralad keshav aatre (aatre) sayebancha nav taka karan tyanche dekhil molache yogdan aahe patrakaritet tasech sayukta maharashtrachya etihasat

    उत्तर द्याहटवा