शनिवार, २४ जुलै, २०१०

क्षमस्व महाराज क्षमस्व....

होय महाराज, आम्हाला उदार  अंतकरणाने  माफ करा; कारण आम्ही कोडगे आणि लाजलज्जा कोळून प्यायलेले बेशरम मराठी लोक आहोत.आम्ही अत्यंत निर्ढावलेले नालायक भारतीय आहोत.आम्हाला तुमचे कर्तुत्व पुढे चालीवता आले नाही;पण तुमच्या त्या महान कर्तबगारीचा सन्मान व प्रतिष्ठा राखणेसुद्धा अशक्य झाले आहे.आम्ही इतके आत्मकेंद्री आणि svarthane गडबडून गेलो आहोत,कि आमचा पूर्वज,आमचे दैवत असलेल्या तुमच्यावर कोणीही गरळ ओकावी इतके आजाराक तुमच्या या हिंदुस्तानात आज माजले आहे.तुम्ही ज्याचा कोथळा बाहेर काढलात त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेला या देशात आज धक्का लागू शकत नाही;पण महाराज आपली प्रतिष्ठा पायदळी तुडविण्याचा मुलभूत अधिकार कोणालाही असू शकतो;कारण तुमचे नाव आता स्वाभिमानाशी ,कर्तव्याशी जोडले नसून स्वार्थासाठी ते चलनी नाणे झाले आहे.कुणासाठी तुम्ही मराठा जातीचे तर कुणासाठी तुम्ही कुणबी असता.कुणासाठी मराठी तर कोणासाठी हिंदू असता.या देशाचा उदगाता  म्हणून तुमची कोणाला ओळख राहिलेली नसावी.नाही तर लेनच्या अधिकारासाठी कोर्टात धावणारे इथे कशाला निपजले असते? मराठा म्हणून सत्तेवर हक्क सांगणारे किंवा शिवाजीवर अधिकार सांगणारे आज आम्हाला न्यायालयाचा सन्मान राखण्याचा सल्ला देत आहेत.महाराष्ट्रात शिवाजीबद्दल अभिमान बाळगणे अथवा त्या राजाच्या अवमानाने प्रक्षुब्ध होणे आक्षेपार्ह ठरिवले जात आहे.त्यावर न्यायालयाची मान्यता मिळवली जात आहे.त्या आम्हा मराठ्यांना वा मराठी माणसाना तुमचे नाव घेण्याचा अधिकार तरी उरतो काय ? महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि त्यात मराठीचा अभिमान बाळगणे गुन्हा आहे.महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि तिथे त्या राष्ट्रपुरुषाचा अवमान ,अप्रीतीष्ठेला विरोध करणे हा अपराध झालेला आहे.मग महाराज, आम्ही कुठल्या तोंडाने तुमचे नाव घ्यायचे ? तुमचा  जयजयकर तरी करायचा अधिकार आम्हाला उरतो काय ?
 पन्नास साठ वर्षात या देशाची वैचारिक व बौद्धिक घसरगुंडी किती झाली असावी ? जे आदर्श आणि अभिमानाच्या खुणा आहेत त्यांचाच गर्व बाळगणे आता गुन्हा झाला आहे.कोणीही यावे आणि आमच्या अभिमानाला,स्वाभिमानाला लाथ मारावी इतकी स्वातंत्र्याची गटारगंगा दुथडी भरून वाहू लागली आहे.ज्या अभिमानाने या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले तीच प्रेरणा आज कवडीमोल झाली आहे.कुठली तरी कंपनी विमानतळाचे पुननिर्माण करते आणि तिथला शिवरायांचा पुतळा अडगळ हलवावी त्याप्रमाणे इतरत्र उचलून नेण्याचे मनसुबे रचते.कुणी अमेरिकन शहाणा इतिहासाचा अभ्यास करायला येतो आणि आमच्या दैवतावर चिखलफेक करून निघून जातो.तुमच्या पराक्रमाचे चित्र फलकावर लावले तर त्याच्यावरही आमचेच राज्यकर्ते bandi घालतात.त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेची कायद्याला च्न्ता आहे.शिवरायांची बदनामी करणार्याच्या अविष्कार स्वातंत्र्याला इथे कायद्याचे संरक्षण आहे;पण ते स्वातंत्र्य कोठून आले.कोणामुळे आले,कुठल्या प्रेरणेने मिळू शकले,याचेही स्मरण कुणाला उरलेले नाही.त्याच स्वातंत्र्याने अविष्कार स्वातंत्र्य राज्य घटनेत समाविष्ट होऊ शकले.आज तेच अविष्कार स्वातंत्र्य वापरून कशावर घाला घातला जातो आहे? शिवराय या नावाच्या एका ज्वलंत राष्ट्रीय प्रेरणेवर हल्ला झाला आहे.ती प्रेरणा मारली गेली,निष्प्रभ झाली तर स्वातंत्र्याला ग्लानी यायला वेळ लागणार नाही.तसे झाले तर मग कुणाला अविष्कार स्वातंत्र्यहि उपभोगता येणार नाही;कारण राष्ट्रीय स्वातंत्र्याला बाधा आणणारे स्वातंत्र्य घातक असते. शिवरायांची बदनामी हा केवळ मराठी -मराठ्यांचा विषय नसून भारतीय स्वातंत्र्याची उपजत प्रेरणा आहे.तिच्यावर हल्ला राष्ट्रविघातक ठरल्याशिवाय राहणार नाही.
  जेम्स लेनचे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर शिवसेना, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनांनी हुल्लड माजवली होती.म्हणून  त्यांच्यापुरता विषय नाही,तो फक्त महाराष्ट्राचा विषय नाही,कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी नावाचा झंझावात उभा राहिला तो महाराष्ट्राला मुक्त करण्यापुरता नव्हता.त्याने अटकेपार झेंडे लावले.तंजावर पासून दिल्लीपर्यंत धडक मारली.त्यामुळेच आज हिंदू किंवा भारतीय म्हणवणारे सन्मानाने जगू शकत आहेत.तेंव्हा शिवाजी या शब्दाशी प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान जोडलेला आहे.तो कायद्याचा किंवा न्यायालयाचा विषय नाही.सरकारने असल्या पुस्तकावर बंदी घालायलाच नको होती.आम्हा भारतीयांच्या भावनाच इतक्या तीव्र हव्यात,कि असे पुस्तक छापण्याची व विकण्याची कोणाला हिम्मत होता कामा नये.ज्यांनी चार वर्षापूर्वी याप्रकरणी रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले त्यांनी एक अतिशय गंभीर चूक केली होती.सरकारने त्यावर बंदी घालण्याची अपेक्षा चूक होती आणि न्यायालाने ती चूक ठरवली आहे.लोकांच्या भावना व श्रद्धा हा सरकार व कायद्याचा विषय नसतो आणि असता कामा नये.तो सामान्य माणसाने स्वताच निकालात काढायला हवा.आम्हा शिवप्रेमी,शिवभक्तांच्या भावना इतक्या प्रखर हव्यात ,कि कुणा पुस्तकाच्या दुकानदार,विक्रेत्याला असे पुस्तक जवळ बाळगण्याची भीती वाटायला हवी.हे सत्य शिवप्रेमी म्हणून मिरवणारे विसरून गेले.तिथेच सगळी गफलत  झाली आहे.शिवरायांनी दिल्लीश्वराकडे न्याय मागितला नव्हता.त्यांनी न्याय मिळवला होता.आपली ताकद अशी सिद्ध केली ,कि अन्याय करू पाहणार्याची हिम्मत खचली होती.शिवाजी या नावाबद्दल,व्यक्ती व कर्तुवाबद्दल आस्था असलेले ती ताकद दाखवणार आहेत काय ?तरच त्यांना व आम्हा भारतीयांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार असेल.तो अधिकार आपण सिद्ध करणार काय ????
 जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली गेली त्यानंतर  ४-५ दिवस त्यावर चर्चा झाल्या, निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम झाला परत सर्व शांत सर्वजण  आपापल्या कामात दंग झालेआहेत परंतु हा तोरसेकरांचा  लेख माझ्या मनाला  अस्वस्थ करून गेला आहे.मी फक्त एवढेच म्हणू शकेल क्षमस्व महाराज क्षमस्व.

सोमवार, ५ जुलै, २०१०

पाऊले चालती पंढरीची वाट ....

लाखो भक्तांच्या  साक्षीने हजोरो वारकरी पंढरीची वाट चालू लागले आहेत.आषाढ म्हंटले कि अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ  वारीचे वेध लागतात.देहू आणि आळंदी हून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा   अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात,विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो.राज्याच्या कानाकोपऱ्यातून  नह्वे  तर परराज्यातून काय तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात.
 उण, वारा,पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढउतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो परंतु चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो.विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकर्यांना अशा संकटांची तमा नसते.अशी तळमळ,ओढ,प्रेम,निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी.
 कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत  सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोहचतो खरच कमालीची गोष्ट आहे. ना  त्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात न त्यांना कोणी शिकवणारे असते.अबालवृद्ध ,शिक्षित,अडाणी,गरीब,श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
 अशा या  पंढरीच्या वारीचा एकदातरी अनुभव घ्यायलाच हवाच :)

रविवार, ४ जुलै, २०१०

पाऊसाच्या आठवणी ....

  गेल्या  १०-१५ दिवसापासून  पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मस्त पाऊस पडत आहे.कोणाला पावसात चिंब भिजायला आवडते तर कोणाला  घरात बसून पावसाचा आनंद घेण्यात मजा येते.पाऊस म्हंटले कि गरम भजी आणि गरम गरम चहा हा आपला आवडता मेनू.प्रत्येकाचा पाऊस साजरा ?? करण्याचा प्रकार वेगवेगळा असतो.काही जुन्या आठवणी असतात काही मित्रांबरोबरच्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या सहवासाच्या अशाच काही खास आठवणी आपण आपल्या मराठी ब्लॉग विश्वातील मित्र आणि वाचकांबरोबर शेअर केल्या तर ?. कशी वाटते कल्पना ????
 प्रत्येकाच्या मनाच्या तिजोरीत पावसाळ्याच्या आठवणी ह्या साठ्लेल्याच असतात चला तर हा आठवणींचा कप्पा आपल्या हौसी वाचकांसाठी खाली करूयात :)
(कृपया वाचकांनी आपल्या आठवणी प्रतिक्रियेच्या रुपात शेअर कराव्यात हि विनंती )

शनिवार, ३ जुलै, २०१०

कोबाद... 'गांधी'????


मणि रत्नम यांचा 'रावण' प्रदर्शित होण्यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला.सर्वानाच वाटत होते कि अभिषेक बच्चन हा रामायणातील रावणाची भूमिका साकारत असावा परंतु नंतर त्याची भूमिका माओवादी नेता कोबाद गांधी याच्या जीवनावर आधारित आहे असे ऐकण्यात आले.त्याबद्दल बऱ्याच वृत्तपत्रातहि वाचण्यात आले.त्यावेळी कोण हा कोबाद गांधी याची उस्तुकता निर्माण झाली कारण आतापर्यंत आपण फक्त महात्मा गांधीबद्दल जाणत होतो जास्तीत जास्त इंदिरा गांधी,राजीव गांधी मग हा नवीन गांधी कोण असा प्रश्न मनात घर करून बसला आणि थोडेसे त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खूपच धक्कादायक गोष्टी समोर आल्या.  नक्षलवादी, माओवादी म्हंटले कि सहसा दुर्गम भागातील गोरगरीब आणि त्यांची सरकार विरोधी चळवळ असेच चित्र सहसा आपल्या डोळ्यासमोर येते परंतु कोबाद गांधीचे तसे नाही तो एक सुशिक्षित आणि श्रीमंत घरातील होता अशी माहिती उजेडात आली.
 कोबाद गांधी याचा जन्म मुंबईतला त्याचे वडील GLAXO  या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते.जन्मापासूनच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या या कोबाद गांधीचे वरळी सिफेजला अलिशान घर आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण DOON स्कूल मध्ये झाले ज्या ठिकाणी संजय गांधी त्याचे वर्गमित्र होते.त्यानंतर त्याने  St. Xavier's कॉलेजमध्ये आपले  उर्वरित शिक्षण पूर्ण केले.तसेच त्याने CA ची पदवी लंडन येथून घेतली.आता या सर्व गोष्टी काही सामान्य लोकांच्या बस कि बात नाही हे लक्षात आले असेलच.
 लंडन येथे शिक्षण घेत असतानाच त्याचा राजकारणाशी संबंध आला आणि तो डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आला.मुंबईला परत आल्यानंतर  तो आपल्या पत्नीसह नागपूरला स्थायिक झाला.पत्नी अनुराधा हि उच्चशिक्षित मानसशास्त्राची प्राध्यापक होती.नागपूरला जाऊन त्यांनी गोरगरीब,महिला यांच्या न्यायहक्कांसाठी लढा देण्याचे ठरवले होते आणि त्यातूनच ते नक्षलवादाकडे वळले.
कोबाद गांधी यांच्यावर कोंडापल्ली  सीथारामैः  याचा प्रभाव होता ज्यांना त्यांची चळवळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र इथे वाढवायची होती.८० च्या दशकानंतर तो  टी. नागी रेड्डी यांच्या बरोबर काम करू लागला .कोबाद गांधीला २००९ मध्ये दिल्ली  येथे उपचार चालू असताना अटक करण्यात आली.
कोबाद गांधी ह्याने माओवादी चळवळ ग्रामीण भागातून शहरी भागात आणली तसेच त्याने या चळवळीला आधुनिक रूपही दिले नवनवीन तंत्रज्ञान नक्षलवादी चळवळीत  आणण्यात कोबाद गांधीचा मोठा वाटा आहे.
हि माहिती नेटवरून गोळा केल्यावर मला खरच खूप धक्का बसला अशी सुशिक्षित माणसेहि अशा कारवायांत कशी काय अडकली जातात नक्की काय परिस्थिती त्यांना यात ओढत असेल असे प्रश्न मनात येऊन गेले.आज दंतेवाडा सारखे प्रकार घडले कि त्यामागे अशाच सुशिक्षित कुरकर्माचे डोके असणार  याची जाण होते आणि तळपायाची आग मस्तकात जाते.
आपल्या देशात एक महात्मा 'गांधी' होऊन गेले जे अहिंसेची शिकवण देत होते आणि हे आजचे 'गांधी' ज्यांना अहिंसा म्हणजे काय हेच माहिती नसावे.

शुक्रवार, २ जुलै, २०१०

मनोज तिरोडकर ...नाम तो सुना होगा

मनोज तिरोडकर वय वर्ष ४५ एक अस्सल मराठी माणूस.भारताचा भावी सर्वात श्रीमंत उद्योगपती.एकूण संपत्ती ५७० दशलक्ष डॉलर .तिरोडकर यांचे  नाव ऐकले नाही असा माणूस किमान नेटवर तरी भेटणे आता मुश्कील झाले आहे .तिरोडकर यांच्या GTL इन्फ्रा या कंपनीने अनिल अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनीला ताब्यात घेतले आहे आणि हा व्यवहार साधारण ५० हजार कोटी रुपयांच्या घरात असेल.  फोर्बच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत हा मराठी माणूस सध्या ८४ व्या क्रमांकावर आहे.नाही आपल्या मराठी माणसाला असल्या यादीत नाव यायची सवय नाही आणि वाचायचीही.बाकी दुबईस्थित दातार यांच्याबद्दल ऐकून आणि वाचून होतो ते मराठी असले तरी सध्या आपल्या देशात नाहीत .
 तर असे हे मनोज तिरोडकर हे एक पुणेकर आहेत.(हे वाचून सर्व पुणेकरांची कॉलर ताठ होणार यात वाद नाही ;) ) तिरोडकर  यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी सकाळमध्ये वाचण्यात आले होते तेंव्हापासून त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झाले होते नंतर AIRCEL बरोबरच्या कराराची बातमी आली  आणि त्यानंतर थेट रिलायंसची बातमी आली आणि सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले, नेहमीप्रमाणे आपल्या मिडीयाने याला जास्त महत्व दिले नाही परंतु तिरोडकर मराठी असल्याने IBN लोकमत या वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली ती पाहण्याचा योग आला.तिरोडकर यांच्या बोलण्यातून  अस्सल मराठीपण जाणवत होते.उगाच दिखावा म्हणून इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर नाही.किंवा केल्याला कामगिरीचा गर्व नाही.सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देत होते.त्यांच्या कंपनीचे सर्व टोवर पुढील ३ वर्षात  हरित म्हणजे इको फ्रेंडली करण्याचा त्यांनी बोलून दाखवलेला मानस खरच वाखण्याजोगा होता आणि त्यामागील सामाजिक बांधिलकीची जाण हि दिसून येत होती.
 मनोज तिरोडकर यांचे वडील  शिपिंग व्यवसायमध्ये होते.वडिलांच्या कंपनीत काम करता करता तिरोडकर यांनी १९८७ मध्ये स्वताची GLOBEL TELECOM हि कंपनी सुरु केली.आज ती जगातील सर्वात मोठी टेलिकॉम टोवर कंपनी आहे.( कंपनीच्या नावात GLOBEL हा शब्द त्यांनी का वापरला असावा याचा प्रत्यय आला असेलच )  तसेच ते पहिले भारतीय उद्योगपती आहेत ज्यांना  “World Young Business Achiever Award 2000” हा पुरस्कार मिळाला आहे.
 तर अशा या मराठी माणसाबद्दल मिडिया जरी दोन हाथ लांब असला तरी आपल्या मराठी ब्लॉग विश्वाने मागे का राहायचे? म्हणून हा प्रपंच बाकी मराठी असल्याचा अभिमान तर असणारच न राव :)
मनोज तिरोडकर यांची अशीच प्रगती होत राहो आणि हा मराठी माणसाचा झेंडा देशातच नव्हे तर विदेशातही शानसे फडकत राहो हीच शुभेच्छा .
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय तिरोडकर

गुरुवार, १ जुलै, २०१०

महागाई, बंद आणि असंवेदनशील सामान्य माणूस


केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी पेट्रोल,डीझेल,रॉकेल इ. वस्तूंची भाववाढ केली.त्यामुळे महागाईचा भडका उडणार अश्या प्रतिक्रिया यायला लागल्या.रिक्षाभाडे  वाढले सुद्धा.वेगवेगळी आंदोलने  आणि मोर्चे निघत असल्याच्या बातम्या येत आहेत, आता तर भाजप आणि विरोधी पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात भारत बंदची हाक दिली आहे.त्याला कसा प्रतिसाद भेटेल माहिती नाही. परंतु एक गोष्ट यात लक्षात घेतली का ज्या सामान्य माणसाचे या महागाईने कंबरडे मोडले आहे असे बोलले जात आहे त्या सामान्य माणसाला खरच या गोष्टींचा फरक पडला आहे ? त्यांच्यात याबद्दल चीड किंवा उद्रेकाची भावना जाणवते  आहे का ? तर उत्तर नाही असेच आहे कोणालाहि याचा फरक पडला आहे असे वाटत नाही कोठेही सामान्य माणूस या विरोधात चवताळून उठला आहे असे दिसून आले नाही.
 राजकीय पक्ष,वृतपत्रे आणि प्रसारमाध्यमे जेवढ्या बोंबा मारत आहेत तेवढा आवाज सामान्य माणूस नक्कीच मारत नाही.आंदोलने करणारे राजकीय पक्ष आणि हसत हसत घोषणा देत फोटो देणारे आंदोलक,टी.व्ही.समोर  मुलखाती देणारे नेते आणि त्यांचे दिसणारे कार्यकर्ते यांना सोडल्यास बाकी कोणाला या महागाईचा फटका बसलाय असे दिसत नाही.जेवढ्या बातम्या आणि त्यावर पेपरमध्ये अग्रलेख आले आणि त्यातून सामान्य माणसाना चटके बसत आहे असे सांगण्यात आले त्या सामान्य माणसाला चटका बसला आहे का ? नाही कारण चटका बसल्यावर माणूस झटका देतो,चवताळून उठतो,शिव्या घालतो पण असे कोठे दिसून आले नाही.
 मग असा प्रश्न पडतो कि खरच हि महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी आहे का ?आणि असेल तर सामान्य माणसे अशी शांत  ,बधीर का ?
आजकाल सामान्य माणूस  असंवेदनशील झाल्यासारखा  वाटत आहे.त्यांना स्वतावर होणाऱ्या अन्यायाची चीड येत नाही.त्यांच्याकडून कोणतीही उस्फुर्त प्रतिक्रिया येताना दिसत नाही.मग ती महागाई  असो वा महिलांवर झालेले अन्याय असोत,बलत्कार,दंगली असोत  सामान्य माणसाला याचे काही सोईरसुतक राहिले आहे असे वाटत नाही.सरकार तर असंवेदनशील आहेच हे दंतेवाडा आणि काश्मीर यासारख्या घटनांवरून दिसून येतच आहे पण सामान्य माणसे हि अशीच वागू लागलीतर अशा गोष्टीना कोण आळा  घालणार?
पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नाह्वती त्यावेळी लोकांकडून सामान्य माणसांकडून अशा गोष्टींच्या विरोधात प्रक्षोभ उठायचा आंदोलने ह्वायची आणि त्याची दखल  सरकारला घ्यावी लागायची आता अशी दखल घेण्याजोगी प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून येत नाही.याचे कारण काय असावे ?
कि खरच आता सामान्य माणसे असंवेदनशील झाली आहेत????