शिवसेना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवसेना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१०

मधुकर सरपोतदार कालवश

शिवसेना वाढवण्यासाठी स्वत:ला झोकून देणारे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांनी पक्षावरची निष्ठा आपल्या कृतीतून पावलोपावली दाखवली. अलिकडेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वत:चा मुलगा आणि सून दुसऱ्या राजकीय पक्षातून लढत असताना सरपोतदारांनी मात्र शिवसेनेच्या कामात जराही खंड पडू दिला नाही.



रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आंजणारी गावात ३१ जानेवारी १९३४ साली मधुकर सरपोतदार यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉन्सन कंपनीमध्ये पसोर्नेल मॅनेजर या पदावर रूजू झाले. याच काळात त्यांनी अनेक शिवसैनिकांना नोकरला लावले. यातील अनेक पुढे शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या सरपोतदारांचे वक्तृत्वही उत्तम होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या सरपोतदार यांनी पक्षाच्या कामात झोकून दिले. कामगारांविषयी तळमळ असलेल्या सरपोतदारांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या मागण्यांसाठी दत्ताजी साळवी यांची भारतीय कामगार सेना एकीकडे रस्त्यावर उतरायची तर, कॉपोर्रेट क्षेत्रात उत्तम संबंध असलेले आणि फडेर् इंग्रजी बोलणारे सरपोतदार कंपन्यांच्या मालकांशी भांडून कामगारांना न्याय मिळवून देत.

आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या सरपोतदारांनी अनेक खटले स्वत:च्या अंगावर घेतले. मुंबईतील दंगलीदरम्यानचा त्यांचा किस्सा अनेकांच्या लक्षात राहणारा आहे. दंगल उसळली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोन नातवंडे बॉम्बे स्कॉटीश शाळेत होती. बाळासाहेबांची घालमेल सुरू झाली. त्यांच्या सुरक्षेसाठीची जीप नादुरुस्त झाल्याने पोलीस दुसरी जीप आणण्यासाठी गेले होते. अशावेळी सरपोतदार यांनी स्वत:ची गाडी काढली आणि ते बाळासाहेबांसोबत बॉम्बे स्कॉटीशला नातवंडांना आणायला गेले.

सरपोतदार यांचे चिरंजीव अतुल आणि सून शिल्पा यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अलिकडेच झालेली लोकसभा आाणि विधानसभा निवडणूक शिल्पा सरपोतदार यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली. घरात मुलगा आणि सून मनसेचा प्रचार करत असताना सरपोतदार मात्र शिवसेनेच्या प्रचारात व्यस्त होते. त्यांच्या प्रचाराची धार कुठेही कमी पडली नाही. 

सौजन्य-मटा
९३ च्या दंगलीत गाडीत शस्त्र सापडल्याच्या आरोपावरून त्यांना १ वर्षाचा कारावास भोगावा लागला होता.

एक निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक स्व.मधुकर सरपोतदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना!!

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. त्यांच्या विषयी माझ्या मनात कायमच एक आदराचे स्थान राहिले आहे त्यांच्याबद्दलचे माझे मत येथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक असे नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास यापुढे लिहला जाऊ शकत नाही.
गेली ५० वर्ष ते आपल्या वाणीने,लेखणीने आणि कुंचल्याने महाराष्ट्र गाजवत आहेत त्यांची भाषा तर 'ठाकरी भाषा' म्हणुन ओळखली जाते तसे असले तरी एक व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषणात मिश्किल्पनाही जाणवतो.

स्वता एक कलावंत असल्यामुळे इतर राजकीय नेत्यांची नक्कल काढतात त्यावेळी श्रोते हास्याच्या कारंज्यात बुडून जातात .
त्यांचे शब्द म्हणजे एक धगधगता निखारा असतो ,त्यांचे राष्ट्रवादी विचार , हिन्दुत्व आणि देश्द्रोह्यांच्या वर केलेला हल्ला वातावरण बदलून टाकतात आणि जनसागर मंत्रमुग्ध होउन जातो
महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेब यांचे योगदान म्हणजे 'माईलस्टोनच'.
कलेपासुन खेळापर्यंत,राजकरणापासून समाजकार्यापर्यंत, अर्थकारण पासून ओद्योगिकीकरणापर्यंत , चित्रकलेपासून नाटक - चित्रपटापर्यंत , साहित्यापसून संस्कृतीपर्यंत ,मराठीपासून हिदुत्वापर्यंत ...एक ही क्षेत्र असे नाही की ज्याला शिवसेनाप्रमुखांचा परिस्पर्ष झालेला नाही.
महाराष्ट्राला बाळासाहेबांचीओळख झाली ती त्यांच्या धडाकेबाज व्यंगचित्रामधून .
लोकांना विचार करायला लावणारी,त्यांच्या मनाचा ठाव घेणारी व्यंगचित्रे बाळासाहेबांनी काढली.या व्यंगचित्रातून ते निडरपने बड्यानचे वाभाडे काढत असत त्यामुळे ती अधिक प्रभावी ठरत होती.
शिवसेनाप्रमुखांचे स्फूर्तीस्थान म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज.
जुलमी मोगल सत्तेशी टक्कर देऊन शिवाजी महाराजानी हिन्दवी स्वराज्य निर्माण केले.त्याच धर्तीवर जुलमी कांग्रेस राज्यकर्त्यान विरुद्ध संघर्ष करीत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना करून ३० वर्षात सत्ता खेचून आणली.

एक व्यक्ति स्वताच्या करिश्म्यावर राजकरणातून समाजपरिवर्तनाचे एवढे प्रचंड काम करू शकतो हे त्यानी दाखवून दिले आहे .
शिवरायांचा कर्मयोगी आणि महर्षि विश्व्मित्राचा कर्मठपणा या गुणांचा संगम बाळासाहेबांच्यात पहायला मिळतो .
गर्विष्ट देवदेवतांना आव्हान देऊन विश्वमित्रानी प्रतिस्रुष्टि निर्माण केलि त्याच धर्तीवर दांभिक कांग्रेसला आव्हान देऊन बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय प्रतिस्रुष्टि निर्माण करून शिवरायांचा लढाऊ बाणा वापरून राजकरणातून समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले आहे.
विश्व्मित्राने नारळ निर्माण केला असे मानले जाते नारळाला वरुण कठोर कठीण कवच आणि आतून गोड़ खोबरे त्यानंतर अमृतासारखे गोड़ पाणी असते.
बाळासाहेबांचे तसेच आहे वरुण कठोर पण आत हळवेपणा. भावनाप्रधान आणि कठोरता याचा संगम विरळच असतो.

राजकारणाच्या पसारयात हाच एक असा नेता आहे ज्याने कधीही आपल्या शिवसैनिकाला दगा दिला नाही.जबाबदारी स्वता स्वीकारली.
'मी असे बोललोच नाही' हे वाक्य बाळासाहेबांनी गेल्या ५० वर्षात कधी काढला नाही
मग ते बाबरी पतन असू दया नाहीतर दुसरे काहीही
बाळासाहेबांनीच महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला. म्हणुनच मराठी मध्यमवर्गाला बाळासाहेबांविषयी विशेष प्रेम होत आणि अजुनही आहे .
ज्याच्या हाकेला काही तासातच लाखो लोक जमतील असा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे आणि तो म्हणजे फक्त शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे.
शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी गरिबांना राजकारणात मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. कांग्रेसी राजकारणात मागे पडलेले किंवा पडले असते अशा बहुजन समाजातील गरिबांच्या मनात बाळासाहेबांनी राजकीय महत्वकांक्षा निर्माण केलि आणि वाढवित नेली .
शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि स्पर्श लाभला तर जीवनाचे सोने होते याची कितीतरी उदाहरणे आज महाराष्ट्रात आहेत.
बाळासाहेबांचे हिन्दुत्व म्हणजे प्रखर राष्ट्रायीत्व हे कधीही लपून राहिलेले नाही. त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले .
बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केलि आणि खुप वादळे झेललीसुद्धा परंतु ते कधीही डगमगले नाहीत
एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी स्वतातिल माणुस कटाक्षाने जपला.

अशा या माझ्या दैवताला आई जगदंब उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta