china लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
china लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ११ जानेवारी, २०१०

डॉ. कोटणीस एक 'सच्चा मित्र'

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी चीनने पंडित नेहरूंना पत्र पाठवून वैद्यकीय मदत मागितली होती. सप्टेंबर १९३८ मध्ये डॉक्टरांचे पथक तिकडे रवाना झाले.त्यात डॉ.कोटणीस होते.त्यांनी चीनी सैन्याची मनोभावे सेवा केली.त्यामुळे कृतज्ञ चीनी जनतेने नुकतेच त्यांची 'सच्चा मित्र' म्हणून निवड केली.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारकही बांधण्यात आले आहे.
नुकताच चायना रेडियोने ६० व्या प्रजासत्ताक सोहळ्यानिम्मित चीनमध्ये उल्लेख्न्नीय कामगिरी करून चीनी जनतेला मदत करणाऱ्या गेल्या शतकातील १० आंतरराष्ट्रीय व्यक्तींची निवड करण्यात आली.त्यात आपल्या देशातील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा चीनचा 'सच्चा मित्र' म्हणून निवड झाली.
चायना रेडियोने घेतलेल्या पोलमध्ये ५६ लाख चीनी जनतेने भाग घेऊन आम्ही डॉ.कोटणी यांचे ऋणी आहोत,अशी पोलद्वारे भावना व्यक्त केली.
१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी नाईलाज म्हणून सामान्य चीनी जनता आणि सैनिक जपान्विरोधात लढत होते.त्यांची केविलवाणी अवस्था पाहून जर्मनीची युद्ध वार्ताहर अग्नेस स्मेडले हिने नेहरुंना पत्र पाठवून चीनी सैनिकांच्या लोकांच्या शुश्रुसेसाठी हिंदुस्तानी वैद्यकीय पथक पाठवण्याची विनंती केली होती.त्या विनंतीला मान देऊन डॉक्टरांचे एक पथक सप्टेंबर १९३८ रोजी चीनला पाठवले.त्या पथकात डॉ.कोटणीस होते.
डॉ.कोटणीस हे मूळचे सोलापूरचे.त्यांचे वडील एका गिरणीत साधे कारकून होते.त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला M B B S केले.त्याच्या शिक्षणासाठी आपण काढलेल्या कर्जाची फेड करून आपल्याला सुखाचे दिवस दाखवील,या आशेवर जगणाऱ्या वडिलांना जेंव्हा आपला मुलगा वैद्यकीय पथकाबरोबर चीनला गेल्याची बातमी कळली तेंव्हा त्यांनी वैतागून 'आत्महत्त्या'केली.
डॉ.कोटणीसाना हे वृत्त कळताच ते कमालीचे दुख्खी झाले,तरीसुद्धा त्यांनी घेतलेले कार्य तडीस नेले.कोटणीस ज्या फौजेबरोबर होते ती फौज लीन्चुई या ठिकाणी असताना १३ दिवसांची घनघोर लढाई झाली.तेथील मुख्य जबाबदारी डॉ.कोटणीस आणि डॉ.बसू यांच्यावर होती.त्या पथकातील काहीजन थंडी सहन झाल्याने मायदेशी परत आले होते.परंतु ते दोघे तेथून परतले नाहीत.१३ दिवसांच्या लढाईत त्यांनी हजारो चीनी सैनिकांवर उपचार केले.त्या काही अवघड शस्त्रक्रिया हि होत्या.औषधांचा अपुरा पुरवठा,खाण्याची आबाळ,जपानी बॉम्बचा वर्षाव अशा परिस्थित डॉ.कोटणीस आपली जबाबदारी निभावत होते.
याचदरम्यान त्यांनी कुओचींग लान या चीनी नर्सबरोबर लग्न केले.ते उत्तम चीनी बोलू लागले.जखमी सैनिकांच्या देखभालीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अतिश्रम,कुपोषण,दुषित हवामान यामुळे त्यांची तबियत खालावत गेली.त्यातून त्यांना फेफरे येऊ लगले.तरीही ते थोडे बरे वाटले कि रुग्णांची सेवा करत.खेड्यातील लोक्तर त्यांना देवदूत मानू लागले.
अखेर एका खेड्यात त्यांचा मृत्यू झाला.तो दिवस होता डिसेंबर १९४२.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारक असून आंतरराष्ट्रीय बंधुत्वाच्या भावनेचे प्रतिक असणार्या डॉ.कोटणीस यांच्या जीवनाची कथा व्ही.शांताराम यांनी अजरामर केली.त्यांनी काढलेला 'डॉ.कोटणीस कि अमरकहाणी' हा चित्रपट केवळ हिंदुस्तानात नव्हेतर जगभर गाजला आहे.
परंतु अशा एका 'सच्चा मित्र' असलेल्या माणसाचे स्मारक आपल्या देशात नसावे हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
(यातील माहिती काही वृत्तपत्रातून घेतली आहे)