जगभरातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सत्यसाईबाबा यांचे काल निधन झाले. त्यावेळी त्यांची संपत्ती,त्यांचे अनुयायी आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचीही चर्चा झाली.अशा बाबागिरीवर आम्हा मित्रांमध्ये यापूर्वीही खूपवेळा चर्चा वाद झाले आहेत. परंतु एका गोष्टीचे आश्चर्य राहून राहून वाटते ते म्हणजे बाबांचे अनुयायी सेलेब्रिटीज,खेळाडू,उद्योगपती,राजकारणी,गायक,संगीत क्षेत्रातले दिग्गज कोण कोण म्हणून सांगू सगळी बाप मानस.
ज्या लोकांना भेटण्यासाठी लोक महिनोन महिने त्यांच्या ऑफिसचे उंबरे झिझवतात असे मंत्री,राजकारणी या बाबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून रांगेत उभे राहतात त्यांचे पाय धरतात. काय कमी असते या लोकांना पैसा,प्रसिद्धी,अधिकार सर्व काही मनासारखे असते तरीही यांना बाबांची गरज का भासत असावी ?
बरे आपल्या देशातीलच सोडा बाहेरील देशातील लोकसुद्धा यांचे अनुयायी तेही एक दोन नाही हजारो लाखो तेही कित्येक देशामधले या गोष्टीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोदुगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो युटूबवरील त्याचे विडीओ शेअर करतो या गोष्टी या लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का? अशोक चव्हाण , सचिन तेंडूलकर,रतन टाटा यांना तरी कळायला हव ना, बर गेला बाजार अब्दुल कलाम यानाही हे समजत नसावे का ? कि या चमत्कारा व्यतिरिक्त दुसरी अशी काही गोष्ट असावी जी या लोकांना बाबांपर्यंत घेऊन जात असावी ? कारण हि सर्व लोक एवढी मूर्ख वाटत नाहीत. काय असावी ती गोष्ट... 'मानसिक समाधान' ?
मी सत्य साई बाबांचा एक कार्यक्रम 'आस्था'वर पाहिला होता त्यात कितीतरी आलिशान आणि लाखो करोडो किंमत असलेल्या नवीन गाड्या घेऊन मोठ मोठे उद्यागपति उभे होते फक्त बाबांनी त्यांच्या गाडीत बसावे म्हणून बाबा यायचे आणि फक्त जास्तीत जास्त आर्धा फुट गाडी चालली कि थांबवून उतरायचे कि लगेच पुढील गाडीत तिथेही सेम त्यानंतर सर्वजण येऊन त्यांच्या पायावर डोके टेकायचे ... अरे याला काय म्हणावे बाबा त्या माणसाची नाहीतर त्या गाडीची तरी किंमत ठेवा ना राव. त्यानंतर बाबा चालत चालत प्रसाद वाटत होते वाटत कसला फेकत होते आणि सर्व लोक तो मिळवण्यासाठी उड्या मारत होते जणू सलमानने आपला शर्ट काढून फेकावा आणि मुलीनी तो मिळवण्यासाठी उड्या माराव्यात.
अशा बाबांकडे आणि त्यांच्या अनुयायांकडे पाहिल्यावर मला त्या बाबांना दाद द्यावीशी वाटते त्यांच्यात असे काहीतरी वेगळे आहे, माणसे आपल्याकडे खेचण्याची ताकत आहे हे नक्की IAS ,IPS अधिकारीही उगीच आपली नोकरी सोडून यांची सेवा करत असतात का ? कूछ तो बात हें बॉस.
तसेही आपणही साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जातोच कि तेही बाबाच आहेत त्यांनीही त्याकाळी चमत्कारच दाखवले होते. स्वामी समर्थ हि बाबाच आणि गोंदवलेकरहि बाबाच ! आज आपल्या काळात सत्य साई होऊन गेले म्हणून नाहीतर आपणही शिर्डीला जातो तसे त्यांच्या समाधीच्या दर्शनाला गेलोच असतो कि किंवा काही वर्षानंतर आपली पुढची पिढी त्यांच्या समाधीच्या दर्शनाला जाणार नाही कशावरून ?
बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहत आलो आहोत आणि पहार राहणार आहोत असेच दिसून येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहुयात.
ज्या लोकांना भेटण्यासाठी लोक महिनोन महिने त्यांच्या ऑफिसचे उंबरे झिझवतात असे मंत्री,राजकारणी या बाबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून रांगेत उभे राहतात त्यांचे पाय धरतात. काय कमी असते या लोकांना पैसा,प्रसिद्धी,अधिकार सर्व काही मनासारखे असते तरीही यांना बाबांची गरज का भासत असावी ?
बरे आपल्या देशातीलच सोडा बाहेरील देशातील लोकसुद्धा यांचे अनुयायी तेही एक दोन नाही हजारो लाखो तेही कित्येक देशामधले या गोष्टीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
आपण सामान्य लोक अशा बाबांच्या भोदुगिरीबद्दल त्यांचे चमत्कार कसे खोटे आहेत याबद्दल बोलतो युटूबवरील त्याचे विडीओ शेअर करतो या गोष्टी या लोकांना माहिती नसतात का किंवा कळत नाहीत का? अशोक चव्हाण , सचिन तेंडूलकर,रतन टाटा यांना तरी कळायला हव ना, बर गेला बाजार अब्दुल कलाम यानाही हे समजत नसावे का ? कि या चमत्कारा व्यतिरिक्त दुसरी अशी काही गोष्ट असावी जी या लोकांना बाबांपर्यंत घेऊन जात असावी ? कारण हि सर्व लोक एवढी मूर्ख वाटत नाहीत. काय असावी ती गोष्ट... 'मानसिक समाधान' ?
मी सत्य साई बाबांचा एक कार्यक्रम 'आस्था'वर पाहिला होता त्यात कितीतरी आलिशान आणि लाखो करोडो किंमत असलेल्या नवीन गाड्या घेऊन मोठ मोठे उद्यागपति उभे होते फक्त बाबांनी त्यांच्या गाडीत बसावे म्हणून बाबा यायचे आणि फक्त जास्तीत जास्त आर्धा फुट गाडी चालली कि थांबवून उतरायचे कि लगेच पुढील गाडीत तिथेही सेम त्यानंतर सर्वजण येऊन त्यांच्या पायावर डोके टेकायचे ... अरे याला काय म्हणावे बाबा त्या माणसाची नाहीतर त्या गाडीची तरी किंमत ठेवा ना राव. त्यानंतर बाबा चालत चालत प्रसाद वाटत होते वाटत कसला फेकत होते आणि सर्व लोक तो मिळवण्यासाठी उड्या मारत होते जणू सलमानने आपला शर्ट काढून फेकावा आणि मुलीनी तो मिळवण्यासाठी उड्या माराव्यात.
अशा बाबांकडे आणि त्यांच्या अनुयायांकडे पाहिल्यावर मला त्या बाबांना दाद द्यावीशी वाटते त्यांच्यात असे काहीतरी वेगळे आहे, माणसे आपल्याकडे खेचण्याची ताकत आहे हे नक्की IAS ,IPS अधिकारीही उगीच आपली नोकरी सोडून यांची सेवा करत असतात का ? कूछ तो बात हें बॉस.
तसेही आपणही साई बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जातोच कि तेही बाबाच आहेत त्यांनीही त्याकाळी चमत्कारच दाखवले होते. स्वामी समर्थ हि बाबाच आणि गोंदवलेकरहि बाबाच ! आज आपल्या काळात सत्य साई होऊन गेले म्हणून नाहीतर आपणही शिर्डीला जातो तसे त्यांच्या समाधीच्या दर्शनाला गेलोच असतो कि किंवा काही वर्षानंतर आपली पुढची पिढी त्यांच्या समाधीच्या दर्शनाला जाणार नाही कशावरून ?
बाबागिरी आणि आपला देश कितीही प्रयत्न केलातरी वेगळा करता येणार नाही हे आपण पाहत आलो आहोत आणि पहार राहणार आहोत असेच दिसून येत आहे. चला बाबांच्या चमत्काराची नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहुयात.








