सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

पर्जन्यरोपण एक खरी गरज

नैऋत्य आणि ईशान्य मौसमी वारे दरवर्षी ११ हजार अब्ज घनमीटर आद्रता निर्माण करतात त्यापैकी २४०० अब्ज घनमीटरचे पावसात रुपांतर होते.
म्हणजे फक्त २२ % ढगांचा उपयोग पाऊस पडण्यासाठी होतो बाकी ७८ % ढग हे पाऊस न पाडता नसता गडगडात करून निघून जातात.
आद्रतायुक्त ढग आपल्या डोक्यावर आले कि कुशलतेने आणि योग्य उपकरणांचा वापर करून जगातील ४५ पेक्षा जास्त देश आपल्या भूमीवर पाऊस पाडून घेतात आणि दुष्काळाच्या संकटापासून आपले सवरक्षण आज करतात
या देशामध्ये अमेरिका ,रशिया ,चीन ,इंडोनेशिया ,जपान ,इस्राएल ,मेक्सिको , अरब राष्ट्रे आणि दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा समावेश आहे.

Flying Lengends 09Image by lee_kmp via Flickr



आज एकट्या महाराष्ट्र राज्यातील शेती उत्त्पन ४० हजार कोटी आहे मग सर्व देशाचे किती अब्ज्य कोटी असू शकते याचा अंदाज न बांधलेलाच बरा
तरीही आपले सरकार दुष्काळ निर्वानासाठी काय करत आहे असा प्रश्न पडतो
दुष्काळजन्य परिस्थिती आल्यानंतर फक्त धावाधाव केली जाते
दुष्काळ निवारण समितीची स्थापना , सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठका ,पाणीटंचाई साठीच्या मार्गदर्शक सूचना यांचे पेव फुटले जाते.
परंतु शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा दुष्काळ हिसकावून घेतो त्याचे काय ?
यावर उपाय योजायला नकोत का ?

ऑस्ट्रीलीअन कौन्सिल ऑफ सायनटीफिक अन् इंडस्त्रियल रिसर्च ऑर्गनायजेशन यांनी नुकतेच जाहीर केले आहे कि त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ते १५ ते २० % पाणी दरवर्षी जास्त मिळवतात तसेच चीन ने केलेल्या उपाययोजनामुळे त्यांना ५० अब्ज्य घनमीटर पाणी मागील वर्षी अधिक मिळाले असून यातून ३६ हजार वैज्ञानिकांना काम हि मिळाले आहे.

दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी आंध्रप्रदेश मधील १५ जिल्ह्यांची निवड करून तेथे दरवर्षी सतत पाऊस पाडण्याचा निर्णय आणि कार्यक्रम हाती घेतला होता त्यावेळी ते म्हणाले होते कि ‘ पर्जन्याच्या अभावामुळे पडणारा दुष्काळ आम्हाला इतिहास जमा करायचा असून आम्ही आंध्रप्रदेश मध्ये मागील वर्षी १० जिल्ह्यात १८ दक्षलक्ष्य घनफूट पाणी विविध उपाययोजना करून अधिक मिळवले आहे.
तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी चीकीस्तकपणे पर्जन्यारोपानाची तयारी करावी आणि राज्याचा विकास करावा ’
हे असेच संपूर्ण हिंदुस्तानमध्ये का होऊ शकत नाही ?

चीनमध्ये दरवर्षी गारांच्या पाऊसामुळे खूप नुकसान होते परंतु चीनने आता गारांचे रुपांतर पाऊसात करण्याचे तंत्र विकसित केल आहे.
मागील वर्षी आपण चीन मधील ऑलिम्पिकच्या वेळीही चीनचे या क्षेत्रातील तंत्रज्ञान पाहिले होते आठवते का ?
ऑलिम्पिकवर पाणी पडू नये म्हणून बीजिंगकडे येणारे पाऊसाचे ढग अलीकडेच पाऊस पाडून निकामी करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केल्याचे त्यांनी जगाला दाखवून दिले होते.

आपल्या देशातील वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ तसेच विकसित देह्साची मदत घेऊन आपण देशाची व राज्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन ढगांची DBZ क्षमता लक्षात घेऊन देशात भरपूर पाऊस पाडू शकतो (पाऊस पाडण्यासाठी ढगांची बाष्प कणांची DBZ क्षमता ४० असावी लागते )

जर ढगांतून नैसर्गिक पाऊस पडत नासेलतर त्यावर रासायनिक फवारणी करून पाऊस पाडता येऊ शकतो अशा ढगांची योग्य निवड अत्याधुनिक उपकरणांमुळे आता शक्य आहे फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे.

भूजल पातळी दरवर्षी १ ते ३ फुट खाली जात आहे हे कटू सत्य आहे
नद्या , नाले कोरड्या पडण्याची शक्यता, दुष्काळाचे सावट सतत देशावर असते अशावेळी सत्त्याधार्यांनी योग्यानियोजन करून पर्जन्यारोपानाचे महत्व जाणून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते.






Reblog this post [with Zemanta]

२ टिप्पण्या: